शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
3
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
4
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
5
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
6
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
7
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
8
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
9
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
10
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
11
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
12
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
13
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
14
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
15
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
16
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
17
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
18
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
19
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
20
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा

नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:06 IST

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्देफटाके फोडताना खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु यादरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.दिवाळीच्या कालावधीत फटक्यांमुळे आगीच्या घटना घडतात. यात दुर्घटनांचा समावेश असतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके उडविताना दाट वस्तीच्या ठिकाणी उडवू नये, रस्त्यावर फटाके उडविताना रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री करण्यात यावी. मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नये, हातात धरून फटाके उडवू नये, फटाके उडविताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधादिवाळी साजरी करताना अनपेक्षितपणे घडणाºया दुर्घटनांवर आळा आणण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग तत्पर आहे. अनुचित घटनांप्रसंगी मदतीसाठी अग्निशमन पथक सज्ज असून आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन सेवेसाठी ०७१२-२५६७७७७,०७१२-२५६७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनापातर्फे करण्यात आले आहे. दिवाळी सणाचा आनंद लहान थोरांच्या चेहऱ्यावर कायम राहावा यासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाची चमू अविरत कार्यरत आहे.प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करामागील दहा वर्षांमध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीदरम्यान दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. अशा घटनांवर निर्बंध यावे यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता प्रदूषण विरहीत फटाके उडवून दिवाळी साजरी करावी व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा.अभिजित बांगर, आयुक्त महापालिकाफटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटनावर्ष           घटना२००९         ५२०१०         ०२०११         ५२०१२         ९२०१३         ५२०१४        ४२०१५        ५२०१६        ६२०१७        ८२०१८         २एकूण ४९

टॅग्स :Diwaliदिवाळीfireआगnagpurनागपूर