शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
2
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
3
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
4
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
5
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
6
रक्षा बंधन २०२५: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!
7
सुप्रीम कोर्टाचा निकाल विरोधात जाण्याची भीती?; शिंदेंच्या दिल्लीवारीबाबत असीम सरोदेंचा मोठा दावा
8
लालू यादवांच्या मुलाची बिहार निवडणुकीसाठी अजब खेळी, अभिनेत्री दिशा पटानीशी कनेक्शन काय?
9
२५% ने बधला नाही, ट्रम्प भारताच्या वर्मावर घाव घालण्याच्या तयारीत; 'या' सेक्टरवर २५०% टॅरिफची धमकी
10
अभिमानास्पद! वडिलांची मित्रांनी उडवली खिल्ली, आईने केला सपोर्ट; लेक गाजवते फुटबॉलचं मैदान
11
"महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका VVPAT मशिनवरच घ्यावात’’, काँग्रेसची मागणी
12
मतदार यादीतून वगळलेले ६५ लाख कोण? तीन दिवसांत सादर करा; सर्वोच्च न्यायालयाचा निवडणूक आयोगाला आदेश
13
महेश मांजरेकरांच्या 'वेडात मराठे वीर दौडले सात' सिनेमाचं काय झालं? मुख्य अभिनेता म्हणाला...
14
मच्छर घुसला की काम तमाम...! घरासाठी लेझर गायडेड एअर डिफेन्स सिस्टीम आली; दिसताच आडवा करणार...
15
लाडक्या बहिणींच्या पैशांवर डल्ला मारणाऱ्यांचं आता काही खरं नाही, पुढील १५ दिवसांत...
16
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
17
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये उद्ध्वस्त झालेले मुख्यालय पुन्हा बांधण्यासाठी जैशचा प्रमुख पुन्हा सक्रिय; मसूद अझहरने अनेकांकडे देणग्या मागितल्या
18
नवजात लेकीला कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलं पण 'त्याने' जीवदान दिलं, शरीराला लागलेले किडे
19
RBI च्या निर्णयानंतर गुंतवणूकदारांना झटका! विप्रोसह 'या' क्षेत्रात मोठी घसरण, कुठे झाली वाढ?
20
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान

नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:06 IST

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्देफटाके फोडताना खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु यादरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.दिवाळीच्या कालावधीत फटक्यांमुळे आगीच्या घटना घडतात. यात दुर्घटनांचा समावेश असतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके उडविताना दाट वस्तीच्या ठिकाणी उडवू नये, रस्त्यावर फटाके उडविताना रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री करण्यात यावी. मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नये, हातात धरून फटाके उडवू नये, फटाके उडविताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधादिवाळी साजरी करताना अनपेक्षितपणे घडणाºया दुर्घटनांवर आळा आणण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग तत्पर आहे. अनुचित घटनांप्रसंगी मदतीसाठी अग्निशमन पथक सज्ज असून आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन सेवेसाठी ०७१२-२५६७७७७,०७१२-२५६७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनापातर्फे करण्यात आले आहे. दिवाळी सणाचा आनंद लहान थोरांच्या चेहऱ्यावर कायम राहावा यासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाची चमू अविरत कार्यरत आहे.प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करामागील दहा वर्षांमध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीदरम्यान दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. अशा घटनांवर निर्बंध यावे यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता प्रदूषण विरहीत फटाके उडवून दिवाळी साजरी करावी व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा.अभिजित बांगर, आयुक्त महापालिकाफटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटनावर्ष           घटना२००९         ५२०१०         ०२०११         ५२०१२         ९२०१३         ५२०१४        ४२०१५        ५२०१६        ६२०१७        ८२०१८         २एकूण ४९

टॅग्स :Diwaliदिवाळीfireआगnagpurनागपूर