शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
4
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
5
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
6
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
7
...तर मी ट्रेनमधून पडून मेलो असतो; एक चूक अन् आयुष्य संपलं असतं, 'मुरांबा'मधील अभिनेत्याने सांगितला धक्कादायक प्रसंग
8
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
9
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्यधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
10
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
11
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
12
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
13
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
14
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
15
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
16
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
17
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
18
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
19
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
20
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल

नागपुरात दहा वर्षात १८७ आगीच्या घटना : फटाक्यामुळे ४९ आगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2019 00:06 IST

दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या.

ठळक मुद्देफटाके फोडताना खबरदारी घेण्याचे मनपाचे आवाहन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : दिवाळीच्या उत्साहात फटाक्यांची आतषबाजी केली जाते. परंतु यादरम्यान सुरक्षेकडे दुर्लक्ष केले जाते. दिवाळीच्या कालावधीत दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. २००९ ते २०१८ यादरम्यान १० वर्षामध्ये १८७ आगीच्या घटना घडल्या. यात फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या. त्यामुळे २ कोटींचे नुकसान झाल्याची माहिती अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.दिवाळी हा आनंदाचा सण आहे. या आनंदाच्या क्षणी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी प्रत्येकाने सजग राहणे आवश्यक आहे. विशेषत: फटाके उडविताना प्रत्येकाने सावधता बाळगावी, असे आवाहन अग्शिनमन विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.दिवाळीच्या कालावधीत फटक्यांमुळे आगीच्या घटना घडतात. यात दुर्घटनांचा समावेश असतो. त्यामुळे याबाबत विशेष काळजी घेण्याची गरज आहे. फटाके उडविताना दाट वस्तीच्या ठिकाणी उडवू नये, रस्त्यावर फटाके उडविताना रस्ता निर्मनुष्य असल्याची खात्री करण्यात यावी. मोठ्या आवाजाचे फटाके उडवू नये, हातात धरून फटाके उडवू नये, फटाके उडविताना सुरक्षित अंतर राखावे, असे आवाहनही अग्निशमन विभागातर्फे करण्यात आले आहे.आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधादिवाळी साजरी करताना अनपेक्षितपणे घडणाºया दुर्घटनांवर आळा आणण्यासाठी मनपा अग्निशमन विभाग तत्पर आहे. अनुचित घटनांप्रसंगी मदतीसाठी अग्निशमन पथक सज्ज असून आपत्कालीन प्रसंगी अग्निशमन सेवेसाठी ०७१२-२५६७७७७,०७१२-२५६७१०१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनापातर्फे करण्यात आले आहे. दिवाळी सणाचा आनंद लहान थोरांच्या चेहऱ्यावर कायम राहावा यासाठी प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांच्या मार्गदर्शनात अग्निशमन विभागाची चमू अविरत कार्यरत आहे.प्रदूषण विरहीत दिवाळी साजरी करामागील दहा वर्षांमध्ये दिवाळीदरम्यान फटाक्यामुळे ४९ आगीच्या घटना घडल्या आहेत. दिवाळीदरम्यान दरवर्षी शहरात विविध भागात आगीच्या घटना घडतात. अशा घटनांवर निर्बंध यावे यासाठी प्रत्येकाने काळजी घेण्याची गरज आहे. फटाक्यांमुळे होणारे प्रदूषण आणि त्यामुळे होणारा त्रास लक्षात घेता प्रदूषण विरहीत फटाके उडवून दिवाळी साजरी करावी व दिवाळीचा आनंद द्विगुणीत करावा.अभिजित बांगर, आयुक्त महापालिकाफटाक्यामुळे घडलेल्या आगीच्या घटनावर्ष           घटना२००९         ५२०१०         ०२०११         ५२०१२         ९२०१३         ५२०१४        ४२०१५        ५२०१६        ६२०१७        ८२०१८         २एकूण ४९

टॅग्स :Diwaliदिवाळीfireआगnagpurनागपूर