शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
2
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
3
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
4
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
5
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
6
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
7
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
8
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
9
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
10
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
11
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
12
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
13
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
14
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
15
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
16
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
17
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
18
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
19
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
20
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार

परिस्थिती गंभीर; सर्व सुरळीत होईल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 1:51 AM

आशावाद । मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांचे मत

अंकिता देशकर ।

नागपूर : सगळीकडेच एक नैराश्याचे वातावरण आहे आणि बऱ्याच लोकांना असा प्रश्न पडतोय की आता पुढे काय; पण असे असतानादेखील एक आशेचा किरण कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटीतील प्राध्यापक बेईबेई ली यांनी दाखविला आहे. त्यांना असा विश्वास आहे की, गोष्टी आता बºयाच नकारात्मक आहेत आणि बाजारपेठदेखील मंदावली आहे; पण ही परिस्थिती फार काळ राहणार नाही, पुन्हा सगळं सुरळीत सुरू होईल, असा विश्वास त्यांनी ‘लोकमत’सोबत विविध विषयांवर चर्चा करीत असताना दाखवला. ‘लोकमत’ने कानेर्गी मेलन युनिव्हर्सिटी (सीएमयू)च्या प्राध्यापक बेईबेई ली यांच्यासोबत चर्चा करताना अमेरिका, भारत आणि चीन यांच्या संबंधांवरदेखील संवाद साधला.

ली म्हणाल्या, लोकांचे पगार कमी होत आहेत, तसेच त्यांच्या नोकºयादेखील चालल्या आहेत, बºयाच मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढले आहे. बाहेर विद्यार्थ्यांना इंटर्नशिपदेखील मिळत नाही. सगळ्यांनीच या परिस्थितीचे आव्हान स्वीकारावे आणि कौशल्यामध्ये वाढ होईल असे कार्य करावे, नवीन काहीतरी शिकावे. कोरोना महामारीवर ली म्हणाल्या, एखाद्याने अशी अपेक्षा केली असती की, अमेरिकेसारख्या देशाने कोरोना व्हायरसमध्ये परिस्थिती अधिक चांगल्या प्रकारे हाताळायला हवी होती; पण अपेक्षेप्रमाणे काही झाले नाही, त्यामुळे आता सध्याच्या सरकारने यातून एक धडा घ्यायला हवा. त्या म्हणाल्या, इतर देशांच्या तुलनेत चीनने चांगले कामगिरी केली आहे.बरेच देश भारतात गुंतवणूक करतीलच्इतर देश भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेत गुंतवणूक करण्यास इच्छुक असतील का, असे विचारले असता त्या म्हणाल्या, भारताकडे नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान संस्था आहेत, तसेच आता बरेच स्टार्टअप्स कौतुकास्पद काम करीत आहेत, त्यामुळे बरेच देश भारतात गुंतवणूक करतील, असा विश्वास त्यांना आहे.च्भारताच्या नवीन शैक्षणिक धोरणाबद्दल त्या म्हणाल्या, जर भारतातील विद्यापीठांना परदेशी स्वत:चा विस्तार करायचा असेल तर त्यांनी भारतीय संस्कृतीचा अभ्यासक्रमात समावेश करून विद्यार्थ्यांना आकर्षित करावे.