शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
3
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
4
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
5
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
6
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

धक्कादायक! नागपुरात परराज्यातील कोरोनाबाधितांचा मृत्यूदर ७३ टक्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 10:31 AM

Nagpur News corona मेडिकल हब म्हणून ठरू पाहत असलेल्या नागपुरात विदर्भच नाही तर शेजाराच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांचा लोंढा वळला आहे.

ठळक मुद्दे६७३ रुग्ण, ४९१ मृत्यू पाच दिवसात २९ रुग्ण, २९ मृत्यू

सुमेध वाघमारे

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : मेडिकल हब म्हणून ठरू पाहत असलेल्या नागपुरात विदर्भच नाही तर शेजाराच्या राज्यातून मोठ्या संख्येत रुग्णांचा लोंढा वळला आहे. विशेषत: कोविडच्या या काळात आतापर्यंत जिल्हाबाहेरील ६७३ रुग्णांनी उपचार घेतला. मात्र, यातील ४९१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूची ही संख्या मोठी असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे. रुग्णसंख्येच्या तुलनेत मृत्यूचा हा दर ७३ टक्के आहे. धक्कादायक म्हणजे, मागील पाच दिवसांत जिल्हाबाहेरील २९ रुग्णांची नोंद झाली असून एवढ्याच संख्येत मृत्यूही झाले आहेत.

दिवाळीपूर्वी कमी झालेली करोनाबाधितांची संख्या दिवाळीनंतर वाढत असल्याचे दिसून येत आहे. शासकीयसह खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये दिवाळीपूर्वी बाधितांची संख्या हजाराखाली गेली होती, ती आता १३७४ वर पोहचली आहे. सध्या मेडिकलमध्ये २००, मेयोमध्ये ८०, एम्समध्ये ३१ तर उर्वरीत रुग्ण खासगी रुग्णालयात उपचाराखाली आहेत. नागपुरात विदर्भासह मध्य प्रदेश, छत्तीसगड व तेलंगाणा आदी राज्यातून येणाऱ्या बाधितांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. हे रुग्ण उशिरा रुग्णालयात पोहचत असल्याने यात गंभीर रुग्णांची संख्या अधिक आहे. शासकीय रुग्णालयाच्या तुलनेत खासगीमध्ये उपचार घेणाऱ्या जिल्हाबाहेरील रुग्णांची संख्या मोठी आहे.

-एकाच दिवशी ११ रुग्ण, ११ मृत्यू

जिल्हा शल्यचिकित्सक यांनी उपलब्ध करुन दिलेल्या माहितीनुसार, २० ते २५ नोव्हेंबर या पाच दिवसात २९ रुग्णांची नोंद झाली असून एवढ्याच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यात २० तारखेला ११ रुग्ण ११ मृत्यू, २१ तारखेला ५ रुग्ण ५ मृत्यू, २२ तारखेला १ रुग्ण १ मृत्यू, २३ तारखेला ७ रुग्ण ७ मृत्यू, २४ तारखेला ४ रुग्ण ४ मृत्यू तर २५ तारखेला १ रुग्ण व १ रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

-मेडिकलमध्ये ७ दिवसांत ११ मृत्यू

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) मागील ७ दिवसात जिल्हाबाहेरील ४३ रुग्ण आले असताना १२ रुग्णांचे मृत्यू झाले आहेत. यात भंडारा जिल्ह्यातील ३, यवतमाळ जिल्ह्यातील २, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली व नांदेड जिल्ह्यातील प्रत्येकी १ तर मध्य प्रदेशातील २ रुग्णांचा समावेश आहे.

-उशिरा उपचार व गंभीर रुग्णांची संख्या अधिक

जिल्हाबाहेरुन येणारे बहुसंख्य रुग्ण उशिरा रुग्णालयात येतात. परिणामी, या रुग्णांची प्रकृती गंभीर राहत असल्याने यांच्यामध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठे आहे. विशेषत: कोविड रुग्णांना नागपुरात आणताना ऑक्सिजनसह इतर बाबींची योग्य ती काळजी घेतली जात नसावी, हेही एक कारण असू शकते. लक्षणे दिसताच रुग्ण उपचाराखाली आल्यास जीवाचा धोका टाळता येऊ शकतो.

-डॉ. प्रशांत पाटील

प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस