शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
2
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
3
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
4
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
5
'घरी जा, टीव्हीवर पाहा, माल पकडताहेत मोदी...'; झारखंडच्या छाप्यात नोटांच्या ढिगाऱ्याबाबत पंतप्रधान म्हणाले,...
6
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
7
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
8
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
9
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
10
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
11
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
12
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
13
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा
14
T20 World Cup : बाबरने केली रोहितची कॉपी; वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पाकिस्तानची सांगितली रणनीती
15
'साहेब, तब्येतीला जपा! विजय तुमच्या पायावर आणून ठेवतो',शरद पवारांसाठी बजरंग सोनवणेंची पोस्ट
16
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
17
Income Tax Saving Tips: EEE कॅटेगरीत येतात 'या' ४ स्कीम्स, यात पैसे गुंतवाल तर ३ पद्धतीनं वाचेल टॅक्स
18
नवग्रहांची ‘कुंडली’कथा: बुध म्हणजे 'राजकुमार'; उत्तम वाणी, प्रखर बुद्धी, चिरतारुण्याचं वरदान
19
‘पुंछमध्ये IAF च्या ताफ्यावर झालेला हल्ला ही स्टंटबाजी, जेव्हा निवडणुका येतात तेव्हा..’ काँग्रेस नेते चरणजीत सिंग चन्नी यांचं विधान
20
PHOTOS : मोकळे केस अन् घायाळ करणाऱ्या अदा; धनश्री वर्माचा बोल्ड लूक!

धक्कादायक ! २०० मिलियन भारतीयांचा डाटा असुरक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2018 9:56 PM

सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अ‍ॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देफेसबुक ही डाटा विक्रीची कंपनी : सोशल मीडियावर अ‍ॅक्टीव्ह राहणाऱ्यांना सावधानतेचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोशल मीडियावर शेअर होणाऱ्या माहितीचा दुरुपयोग होऊ शकतो, असे नागपुरातील सायबरतज्ज्ञ अ‍ॅड. महेंद्र लिमये यांचे मत आहे. फेसबुक, टिष्ट्वटरसारख्या सोशल साईड ह्या डाटा विक्रीच्या कंपन्या असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. फेसबुकचा डाटा चोरीला गेल्याचे उघडकीस आल्यानंतर, फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग यांना युएस सिनेटरने विचारलेल्या ४४ प्रश्नांवर अ‍ॅड. लिमये यांनी अभ्यास करून काढलेल्या निष्कर्षातून फेसबुक वापरणारे भारतातील २०० मिलियन लोकांचा डाटा असुरक्षित असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.फेसबुककडून ‘केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका’ कंपनीने डाटा विकत घेऊन, त्याचा निवडणुकीत वापर केला होता. हा डाटा ‘केम्ब्रिज अ‍ॅनालॅटिका’ कंपनीने २०१५ मध्ये विकत घेतला होता. ८७ मिलियन फेसबुक युजर्सच्या डाटाचा दुरुपयोग झाल्याचे २०१८ मध्ये उघडकीस आल्यानंतर सोशल मीडियावर ही चर्चा चांगलीच रंगली होती. सोशल साईटचा असा दुरुपयोग होत असल्याबद्दल युएस संसदेने याची दखल घेऊन, युएस सिनेटरच्या माध्यमातून फेसबुकचे मालक मार्क झुकेरबर्ग याची चौकशी केली. यात त्याला ४४ प्रश्न विचारण्यात आले. यातील काही प्रश्नांची उत्तरे देण्यात झुकेरबर्ग असमर्थ ठरला. काही प्रश्नांवर त्याने दिलगिरी व्यक्त केली. युएस सिनेटरने विचारलेले प्रश्न आणि मार्क झुकेरबर्गने दिलेली उत्तरे याचा सखोल अभ्यास अ‍ॅड. लिमये यांनी केला. त्यांनी केलेल्या अभ्यासातून सोशल मीडियावर शेअर होत असलेली माहिती असुरक्षित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांच्यामते भारतात २०० मिलियन लोक फेसबुकचा वापर करतात. भारतीय हे डिजिटली निरीक्षर असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. लिमये यांच्या मते निव्वळ फेसबुकचा डाटा स्टोअर होत नाही तर फेसबुक ज्या माध्यमातून आपण वापरतो, त्या माध्यमातून जे काही अ‍ॅपस वेबसाईटवर आपण काम करतो, वापरतो तो सर्व डाटा सुद्धा फेसबुकला स्टोअर होतो. जसे मोबाईलवरून आपण बँकेचे व्यवहार करतो आणि त्या मोबाईलवरून फेसबुकसुद्धा वापरत असेल तर बँकिंग व्यवहाराची सर्व माहिती फेसबुककडे स्टोअर होते.लिमयेंच्या मते भारतात २०१४ मध्ये झालेल्या निवडणुकीत फेसबुक, गुगलने सर्वाधिक पैसा कमविला आहे. आता सरकार आपली प्रत्येक स्कीम सोशल मीडियावर आणते आहे. सोशल मीडियावरील डाटाचा असा दुरुपयोग होत असेल तर सरकारी माहितीसुद्धा सुरक्षित नाही. त्यामुळे सरकारनेदेखील त्याबाबत सतर्क राहणे गरजेचे आहे.- डाटा सोशल मीडियावर शेअर करू नकाअ‍ॅड. लिमये यांच्या मते त्रास होईल असा डाटा सोशल मीडियावर शेअर करू नका. मोबाईलवरून बँकेचे व्यवहार टाळावे. सरकारनेसुद्धा सोशल मीडियाचा अपेक्षित वापर टाळावा.

 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर