शहरं
Join us  
Trending Stories
1
वाघ समोरून हल्ला करतो, झुडपात बसून कारस्थान करत नाही; राऊतांचा विश्वजित कदमांना खोचक टोला
2
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
3
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाण्यात नरेश म्हस्के आज उमेदवारी अर्ज भरणार
5
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
6
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
7
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
8
KL Sharma : स्मृती इराणींच्या विरोधात निवडणुकीच्या रिंगणात काँग्रेसने उतरवलेले केएल शर्मा कोण आहेत?
9
मोबाईल फेकला, एकानंतर एक रिक्षा बदलल्या अन्...; 'तारक मेहता' फेम सोढीने स्वतःच बनवला अपहरणाचा प्लॅन?
10
RBI ने निर्बंध हटवले; Bajaj Finance च्या शेअर्समध्ये मोठी तेजी, ब्रोकरेजचा विश्वास वाढला
11
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
12
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
13
हाताला दुखापत अन्...; अंकिता लोखंडेला काय झालं? हॉस्पिटलमधील फोटो शेअर करत म्हणते...
14
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
15
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
16
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
17
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
18
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
19
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
20
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!

दिवाळीनंतर होणार राजकीय ‘धमाका’, शत्रुघ्न सिन्हा यांचे संकेत; यवतमाळ हाऊस येथे विजय दर्डा यांची घेतली भेट

By ऑनलाइन लोकमत | Published: October 08, 2018 3:14 AM

लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली.

नागपूर : लोकसभा निवडणुकाच्या तोंडावर दिवाळीनंतर देशातील राजकीय समीकरणे वेगाने बदलतील. सर्वांनाच आश्चर्यचकित करणारा राजकीय ‘धमाका’देखील होईल. बिहारमध्ये याचा प्रभाव स्पष्टपणे पहायला मिळेल, अशी माहिती बिहारमधील प्रभावी नेता व भाजपाचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी दिली. रविवारी नागपुरात आले असताना शत्रुघ्न सिन्हा यांनी यवतमाळ हाऊस येथे लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन माजी खासदार विजय दर्डा यांची भेट घेतली. यावेळी दर्डा यांनी खा.सिन्हा व मुंबई कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय निरुपम यांचे स्वागत केले.नागपुरात रविवारी उत्तर भारतीय सभेच्या माध्यमातून हिंदी भाषिक नेत्यांना एका मंचावर आणून हिंदी ‘व्होटबँक’ मजबूत करण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमासाठी शत्रुघ्न सिन्हा व संजय निरुपम आले होते.‘लोकमत’शी संवाद साधताना सिन्हा यांनी विविध राजकीय मुद्यांवर भाष्य केले. बिहारमध्ये भाजपासोबत हातमिळावणी केल्यानंतर नितीश कुमार यांना अस्वस्थता जाणवत आहे. दुसरीकडे राष्ट्रीय पातळीवर तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जी, ‘आरजेडी’प्रमुख लालूप्रसाद यादव यांच्यासह विविध नेते एकत्र येत आहेत. भाजपाबाबत लोकांमध्ये संताप आहे. मीदेखील निर्णायक टप्प्यावर पोहोचलो आहे. मात्र पुढील पावलांबाबत योग्य वेळ आल्यावर दिवाळीनंतरच घोषणा करेल, असे सिन्हा यांनी सांगितले.दिल्ली व बिहार येथे भाजपाच्या झालेल्या पराभवावर बोलत असताना सिन्हा म्हणाले की, भाजपाविरोधात नकारात्मक वातावरण तयार होत आहे. तेथे पैसे खर्च केल्यानंतरदेखील भाजपाचा पराभव झाला.‘व्हीव्हीपॅट’मुळे पारदर्शकता येईल‘बॅलेट पेपर’च्या काळात ‘बूथ कॅप्चरिंग’ व्हायचे. आता ‘ईव्हीएम’चा काळ आहे. मात्र यावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. निवडणूक आयोगाने ‘ईव्हीएम’सोबत ‘व्हीव्हीपॅट’ मशीन लावल्याने पारदर्शकता येईल. निवडणुकांचे निकाल पूर्णत: जनतेच्या हाती असतील, असे सिन्हा यांनी सांगितले.पाकिस्तानमध्ये इम्रान खान चक्रव्यूहात फसले आहेत. त्यांना ‘डेड इकॉनॉमी’ हाती मिळाली आहे. ते सैन्याच्या हातातील बाहुले आहेत. पाकिस्तानने चर्चेसाठी भारतासमोर हात पुढे केला होता. मात्र केंद्राने त्याला नकार दिला. हे पाऊल अयोग्य आहे. पाकिस्तान भिक्षा मागत आहे. तेथे केवळ दोन महिन्यांचेच धान्य उरले आहे, अशी भावना सिन्हा यांनी व्यक्त केली.

टॅग्स :nagpurनागपूरVijay Dardaविजय दर्डाShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा