शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
4
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
5
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
6
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
7
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
8
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
9
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
10
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
11
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
12
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
13
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
14
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
15
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
16
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
17
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
18
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
19
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक

नागपूर जिल्ह्यातील शाळाही १३ डिसेंबरपर्यंत बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 26, 2020 00:39 IST

Schools closed till December 13, nagpur news कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्याहून अधिक कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, उद्या गुरुवार २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. परंतु आता नागपूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शाळाही न उघडण्याचा निर्णय तूर्तास १३ डिसेंंबरपर्यंत रोखण्यात आला आहे.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे : शिक्षकांना मात्र यावे लागेल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाचा पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्याहून अधिक कालावधीपासून बंद असलेल्या शाळा, उद्या गुरुवार २६ नोव्हेंबरपासून सुरू करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी केल्या होत्या. परंतु आता नागपूर शहराप्रमाणेच ग्रामीण भागातील शाळाही न उघडण्याचा निर्णय तूर्तास १३ डिसेंंबरपर्यंत रोखण्यात आला आहे. यानंतर पुढील परिस्थितीनुसार शाळा उघडण्याबाबतचा निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी दिली. शाळा सुरु होत नसल्या तरी शासनाने सर्व शाळांमध्ये नियमांनुसार शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य राहणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

यापूर्वी राज्य शासनाने २३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू करण्याचे निर्देश दिले होते. परंतु त्यात शासनाने स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन शाळा सुरु करण्याची जबाबदारी स्थानिक वरिष्ठ प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर सोपविली होती. पहिल्या टप्प्यात इयत्ता ९ ते १२ वीचेच वर्ग सुरू होणार होते. परंतु नागपूर ग्रामीण मधील ६५७ शाळांमध्ये कोविड-१९ संदर्भातील सर्व नियमांची खबरदारी घेऊन तसेच पालकांच्या संमतीनंतरच वर्ग येत्या २६ नोव्हेंबरपासून सुरु होणार होते. परंतु बहुतांश पालक यासाठी तयार नव्हते. तसेच शिक्षकांच्या संघटनांचाही विरोध होता. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने शहराप्रमाणेच ग्रामीण भागातीलही शाळा १३ डिसेंबर २०२० पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. शाळा सुरु करण्यासंदर्भात सर्व संबंधितांची बैठक घेऊनच शाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले

 

 

 

१०६ शिक्षकांना कोरोनाची बाधा

 

नागपूर ग्रामीण भागामध्ये इयत्ता ९ ते १२ वीपर्यंतच्या एकूण ६५७ शाळा असून, येथे ५९४४ शिक्षक कार्यरत आहेत. तर ३२०३ शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत. शासनाच्या निर्देशानुसार शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षकांच्या कोरोना चाचण्या करणे गरजेचे होते. त्यानुसार आजवर ४८६२ शिक्षकांच्या कोरोनाच्या आरटीपीसीआर तपासण्या झाल्या असून, त्यापैकी १०६ शिक्षकांना कोरोनाची बाधा झाल्याचे चाचणी अहवालातून स्पष्ट झाले आहे.

 

 

७४ टक्के पालकांचा हाेता विरोध

जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील सर्व व्यवस्थापनाच्या ६५७ शाळांमध्ये जवळपास १ लाख ३० हजार ४५४ विद्यार्थी प्रवेशित असून, यापैकी २६ टक्के पालकांनी पाल्याला शाळेत पाठविण्याचे संमतीपत्र दिले आहे. म्हणजेच केवळ ३४ हजार २१३ पालकांनीच शाळेमध्ये आपल्या पाल्यास पाठविण्याला व शाळा सुरू करण्याबाबत संमतीपत्राव्दारे होकार दर्शविला आहे. तर तबब्ल ७४ टक्के पाालकांचा नकार होता. इतकेच नव्हे ५६ शाळांमधील पालकांनी तर चक्क शाळा सुरूच करु नये म्हणून संमतीपत्र दिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा