शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

शाळा बंद असल्याने मुलांसोबत पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत ...

नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पण हे शिक्षण मुलांबरोबरच पालकांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. शाळा होती तर बरं होतं असा सूर आता पालकांमधून निघत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. मुलांना घरी सांभाळतांना पालकांच्याही नाकीनऊ आल्या आहेत. मुलांना मोबाईलची सवय लागली असून, त्यांना या सवयीपासून कसे दूर करावे, अशी चिंता पालकांना भेडसावत आहे.

कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. पालक आणि मुले घरी असल्याने मुलांना वाटायला लागले आहे की पालकांचा जास्त हस्तक्षेप वाढत आहे. दुसरीकडे पालकांची गोची झाली की मुले शिक्षणाच्या नावाखाली दिवसभर मोबाईलवर व्यस्त असतात. ऑनलाईनमुळे क्वॉलिटी एज्युकेशन मिळत नसल्याची चिंता पालकांना भेडसावत आहे. जास्त वेळ मुले पालकांच्या संपर्कात असल्याने मुलांची चिडचिड वाढली आहे. ते पालकांच्या तोंडाला तोंड देऊ लागले आहेत.

- दृष्टीक्षेपात

नागपुरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या

८,७२,६३२

- मुलांच्या समस्या

१) शाळा बंद असल्याने मुले घरीच राहून खाणे, झोपणे, मोबाईलवर गेम खेळणे इथपर्यंत सिमित झाली आहेत.

२) मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. चिडचिडेपणा वाढला आहे. आग्रह, हट्ट करायला लागली आहे. त्यांना घरातच असल्याने कंटाळा येऊ लागला आहे.

३) मुले एकलकोंडी, बुजरी झाली आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास हरवला आहे. मुलांची दैनंदिनी बिघडल्याने आजार वाढले आहेत.

- पालकांच्या समस्या

२) मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुले ऐकतच नाहीत अशी ओरड पालकांकडून होत आहे.

२) ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना वाईट सवयी तर लागणार नाहीत ना? अशी भीती पालकांमध्ये आहे. घरात असताना ती आमच्यासोबत बोलतच नाहीत. सतत मोबाईलमध्ये राहते, अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

३) ऑनलाईन एज्युकेशन हे क्वॉलिटी एज्युकेशन नाही, हे पालकांना कळले आहे. मुलांमध्ये शिस्त राहिलेली नाही. अभ्यासाचे गांभीर्य नाही अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

- सततच्या बंधनात मानसिकता खालावते. लहान मुलांना मुक्तसंचार आवडत असतो. मात्र, कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुले मोबाईलवर अभ्यास करीत आहेत. त्यांचा स्क्रीन टाईम वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शाळा होती तर ८ तास मुले शाळेत रहायची. आता तर टीव्ही, मोबाईल यात गुरफटलेली असल्याने आता पालकही चिडायला लागले आहे.

सोनाली गुरवगुर, वरिष्ठ समुपदेशक