शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
3
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
4
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
5
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
6
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
7
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
8
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
9
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
10
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
11
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
12
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
13
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
14
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
15
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
16
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
17
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
18
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
19
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
20
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही

शाळा बंद असल्याने मुलांसोबत पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत ...

नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पण हे शिक्षण मुलांबरोबरच पालकांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. शाळा होती तर बरं होतं असा सूर आता पालकांमधून निघत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. मुलांना घरी सांभाळतांना पालकांच्याही नाकीनऊ आल्या आहेत. मुलांना मोबाईलची सवय लागली असून, त्यांना या सवयीपासून कसे दूर करावे, अशी चिंता पालकांना भेडसावत आहे.

कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. पालक आणि मुले घरी असल्याने मुलांना वाटायला लागले आहे की पालकांचा जास्त हस्तक्षेप वाढत आहे. दुसरीकडे पालकांची गोची झाली की मुले शिक्षणाच्या नावाखाली दिवसभर मोबाईलवर व्यस्त असतात. ऑनलाईनमुळे क्वॉलिटी एज्युकेशन मिळत नसल्याची चिंता पालकांना भेडसावत आहे. जास्त वेळ मुले पालकांच्या संपर्कात असल्याने मुलांची चिडचिड वाढली आहे. ते पालकांच्या तोंडाला तोंड देऊ लागले आहेत.

- दृष्टीक्षेपात

नागपुरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या

८,७२,६३२

- मुलांच्या समस्या

१) शाळा बंद असल्याने मुले घरीच राहून खाणे, झोपणे, मोबाईलवर गेम खेळणे इथपर्यंत सिमित झाली आहेत.

२) मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. चिडचिडेपणा वाढला आहे. आग्रह, हट्ट करायला लागली आहे. त्यांना घरातच असल्याने कंटाळा येऊ लागला आहे.

३) मुले एकलकोंडी, बुजरी झाली आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास हरवला आहे. मुलांची दैनंदिनी बिघडल्याने आजार वाढले आहेत.

- पालकांच्या समस्या

२) मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुले ऐकतच नाहीत अशी ओरड पालकांकडून होत आहे.

२) ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना वाईट सवयी तर लागणार नाहीत ना? अशी भीती पालकांमध्ये आहे. घरात असताना ती आमच्यासोबत बोलतच नाहीत. सतत मोबाईलमध्ये राहते, अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

३) ऑनलाईन एज्युकेशन हे क्वॉलिटी एज्युकेशन नाही, हे पालकांना कळले आहे. मुलांमध्ये शिस्त राहिलेली नाही. अभ्यासाचे गांभीर्य नाही अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

- सततच्या बंधनात मानसिकता खालावते. लहान मुलांना मुक्तसंचार आवडत असतो. मात्र, कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुले मोबाईलवर अभ्यास करीत आहेत. त्यांचा स्क्रीन टाईम वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शाळा होती तर ८ तास मुले शाळेत रहायची. आता तर टीव्ही, मोबाईल यात गुरफटलेली असल्याने आता पालकही चिडायला लागले आहे.

सोनाली गुरवगुर, वरिष्ठ समुपदेशक