शहरं
Join us  
Trending Stories
1
भीषण अपघात! चित्रदुर्गात ट्रकशी धडक झाल्यानंतर स्लीपर बसला आग, १७ जणांचा मृत्यू
2
'आता हिशोब सरळ आहे'; राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येताच भाजपने मांडलं मतांचे गणित, आकडेवारीत कोण वरचढ?
3
३ तासांत चेकद्वारे पैसे मिळणार का? आरबीआयने ऐनवेळी घेतला मोठा निर्णय, वाचा नवे परिपत्रक
4
तैवानमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, समोर आला इमारत हलतानाचा धडकी भरवणारा VIDEO
5
तुम्ही आम्हाला मतदान केले, तरच...; सहायक आयुक्तांना व्यासपीठावर बसवून मंत्री राणे यांची प्रचारसभा
6
मेहुण्याचा जाच आणि भावाचा राग! दारू पाजली अन् सपासप केले वार; वादाचं कारण ऐकून होईल संताप
7
घटस्फोटानंतर मुलांपासून दूर झाली अभिनेत्री, पतीने ख्रिसमसलाही भेटू दिलं नाही; म्हणाली...
8
एक दोन नाही...! पंधरा राज्यांमध्ये बहिणी झाल्या लाडक्या; त्या कुठे कुठे करतात खर्च...
9
तामिळनाडू हादरलं! कडलूरमध्ये भीषण अपघात; भरधाव बसने दोन कारना चिरडले, ९ जणांचा मृत्यू
10
'धुरंधर'च्या FA9LA गाण्यावर स्वत:च्याच लग्नात नाचला मराठी अभिनेता, सगळे बघतच राहिले, व्हिडीओ व्हायरल
11
महास्फोट! एपस्टीनच्या 'त्या' १० लाख कागदपत्रांमध्ये दडलंय काय? नेमकं सत्य काय? जगभरात खळबळ!
12
वर्षानुवर्षांची स्क्रिप्ट बदला, विकासावर बोला, हजार रुपये मिळवा : देवेंद्र फडणवीस
13
हमास प्रमुख इस्माईल हानियाला हत्येच्या काही वेळ आधीच गडकरी भेटलेले...; पहाटे ४ वाजता हॉटेलवर अधिकारी आले...
14
तारिक रहमान परतण्यापूर्वी बांगलादेशात पुन्हा हिंसाचार उफाळला; ढाका बॉम्बस्फोटात एकाचा मृत्यू
15
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
16
संपादकीय: निवडणूक कामात शिक्षकच का? समोर दहावी, बारावीच्या परीक्षाही...
17
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २५ डिसेंबर २०२५: आनंदाची बातमी मिळेल, कुटुंबातील वातावरण सुखावह राहील!
18
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
19
‘निवडून आलो, तर पक्ष बदलणार नाही’, असे लिहून देता का?
20
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
Daily Top 2Weekly Top 5

शाळा बंद असल्याने मुलांसोबत पालकांचे मानसिक आरोग्य बिघडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:10 IST

नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत ...

नागपूर : शाळा बंद होऊन गेल्या दीड वर्षाचा कालावधी लोटला आहे. त्यामुळे मुले घरीच बसून ऑनलाईनच्या माध्यमातून शिक्षण घेत आहेत. पण हे शिक्षण मुलांबरोबरच पालकांसाठी आता डोकेदुखी ठरत आहे. शाळा होती तर बरं होतं असा सूर आता पालकांमधून निघत आहे.

कोरोनाची दुसरी लाट ओसरली तरी शाळा अद्यापही सुरू झाल्या नाहीत. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही ऑनलाईन शिक्षण सुरूच आहे. मुलांना घरी सांभाळतांना पालकांच्याही नाकीनऊ आल्या आहेत. मुलांना मोबाईलची सवय लागली असून, त्यांना या सवयीपासून कसे दूर करावे, अशी चिंता पालकांना भेडसावत आहे.

कोरोनामुळे विस्कळीत झालेल्या जनजीवनाला अनेक शारीरिक, मानसिक आणि सामाजिक वेदनांना सामोरे जावे लागत आहे. पालक आणि मुले घरी असल्याने मुलांना वाटायला लागले आहे की पालकांचा जास्त हस्तक्षेप वाढत आहे. दुसरीकडे पालकांची गोची झाली की मुले शिक्षणाच्या नावाखाली दिवसभर मोबाईलवर व्यस्त असतात. ऑनलाईनमुळे क्वॉलिटी एज्युकेशन मिळत नसल्याची चिंता पालकांना भेडसावत आहे. जास्त वेळ मुले पालकांच्या संपर्कात असल्याने मुलांची चिडचिड वाढली आहे. ते पालकांच्या तोंडाला तोंड देऊ लागले आहेत.

- दृष्टीक्षेपात

नागपुरात पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या

८,७२,६३२

- मुलांच्या समस्या

१) शाळा बंद असल्याने मुले घरीच राहून खाणे, झोपणे, मोबाईलवर गेम खेळणे इथपर्यंत सिमित झाली आहेत.

२) मुले घरात राहून लठ्ठ झाली आहेत. चिडचिडेपणा वाढला आहे. आग्रह, हट्ट करायला लागली आहे. त्यांना घरातच असल्याने कंटाळा येऊ लागला आहे.

३) मुले एकलकोंडी, बुजरी झाली आहेत. त्यांच्यातील आत्मविश्वास हरवला आहे. मुलांची दैनंदिनी बिघडल्याने आजार वाढले आहेत.

- पालकांच्या समस्या

२) मुलांचा स्क्रीन टाईम वाढल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. मुले ऐकतच नाहीत अशी ओरड पालकांकडून होत आहे.

२) ऑनलाईन शिक्षणामुळे मुलांना वाईट सवयी तर लागणार नाहीत ना? अशी भीती पालकांमध्ये आहे. घरात असताना ती आमच्यासोबत बोलतच नाहीत. सतत मोबाईलमध्ये राहते, अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

३) ऑनलाईन एज्युकेशन हे क्वॉलिटी एज्युकेशन नाही, हे पालकांना कळले आहे. मुलांमध्ये शिस्त राहिलेली नाही. अभ्यासाचे गांभीर्य नाही अशा पालकांच्या तक्रारी आहेत.

- सततच्या बंधनात मानसिकता खालावते. लहान मुलांना मुक्तसंचार आवडत असतो. मात्र, कोरोनामुळे काही महिन्यांपासून शाळा बंद असल्याने मुले मोबाईलवर अभ्यास करीत आहेत. त्यांचा स्क्रीन टाईम वाढल्याने आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत. शाळा होती तर ८ तास मुले शाळेत रहायची. आता तर टीव्ही, मोबाईल यात गुरफटलेली असल्याने आता पालकही चिडायला लागले आहे.

सोनाली गुरवगुर, वरिष्ठ समुपदेशक