शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

दोन वर्षांपासून केंद्राकडून शिष्यवृत्ती थकीत; अभियांत्रिकी महाविद्यालये आर्थिक संकटात

By निशांत वानखेडे | Updated: November 2, 2023 17:04 IST

न्यायालयाच्या निर्देशाचीही अवमानना

नागपूर : विविध अभियांत्रिकी महाविद्यालयांना सद्यस्थितीत प्रचंड आर्थिक संकटातून जावे लागत आहे. महाविद्यालयातील अनुसूचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांना देण्यात येणारी २०२१-२२ च्या ‘ट्यूशन फी’ शिष्यवृत्तीची रक्कम मिळालेली नाही. केंद्र शासनाकडे वारंवार मागणी करूनदेखील शिष्यवृत्तीचा एकही पैसा न मिळाल्याने महाविद्यालयेदेखील हवालदील झाली आहेत. ‘डीबीटी’च्या माध्यमातून ‘ऑनलाईन’ शिष्यवृत्ती कशी जमा होईल, याची विद्यार्थी व महाविद्यालयांना प्रतिक्षा आहे.

राज्यातील अभियांत्रिकी, औषधीनिर्माणशास्त्र, तंत्रनिकेतन, हॉटेल मॅनेजमेंट आणि आर्किटेक्चर या तांत्रिक अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ मिळावा यासाठी डीबीटी'(डायरेक्ट फंड ट्रान्सफर) योजना लागू करण्यात आली. २०१८-१९ मध्ये ‘डीबीटी’ योजना सुरळितपणे सुरू झाली. २०२०-२१ च्या अगोदर विद्यार्थ्यांच्या ही शिष्यवृत्ती थेट महाविद्यालयांच्या खात्यात जमा व्हायची. यातील ६० टक्के वाटा केंद्र शासनाकडून थेट डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याचे निर्देश जारी झाले. याविरोधात महाविद्यालयांनी न्यायालयात धाव घेतली होती व मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने महाविद्यालयांच्या बाजूने निर्णय दिला होता. सर्वोच्च न्यायालयानेदेखील तोच निर्णय कायम ठेवला होता. मात्र तरीदेखील केंद्र शासनाकडून २०२१-२२ पासून विद्यार्थ्यांची ट्यूशन फी शिष्यवृत्ती देण्यात आलेली नाही. तसेच अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांनादेखील मागील दोन वर्षांपासून निर्वाह भत्ता व परीक्षा शुल्काची रक्कम मिळालेली नाही.

महाराष्ट्र शासनाच्या शुल्क नियंत्रण समितीतर्फे अगोदरच मागील पाच वर्षांपासून शुल्क वाढविण्यात आलेले नाही. त्यामुळे महाविद्यालये आर्थिक अडचणीत असताना आता शिष्यवृत्तीची रक्कमदेखील थांबविण्यात आली आहे. त्यामुळे प्रचंड आर्थिक ताण सहन करावा लागत आहे. या धोरणाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेण्यात येणार आहे. तसेच हिवाळी अधिवेशनातदेखील हा मुद्दा योग्य मार्गांतून सरकारपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती विदर्भ अनएडेड इंजिनिअरींग कॉलेजेस मॅनेजमेंट असोसिएशनचे सरचिटणीस अविनाश दोरसटवार यांनी दिली.

महाविद्यालयांतील शिक्षक, कर्मचाऱ्यांचे वेतन खोळंबले

गेल्या काही वर्षांपासून शिष्यवृत्ती वाटपात सरकारकडून करण्यात येत असलेल्या लेटलतिफीमुळे बऱ्याच महाविद्यालयांवर आर्थिक संकट आले आहे. विशेष म्हणजे अनेकदा तांत्रिक कारण देत, शिष्यवृत्तीचे पैसे देण्यास सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे महाविद्यालये आर्थिक संकटात आहेत. याचा परिणाम महाविद्यालयात काम करणारे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनावरदेखील होत आहे. काही महाविद्यालयांत तर सहा महिन्यांपासून शिक्षक व कर्मचाऱ्यांचे नियमित वेतन झाले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली.

टॅग्स :Educationशिक्षणScholarshipशिष्यवृत्तीcollegeमहाविद्यालयCentral Governmentकेंद्र सरकार