शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

विशिष्ट प्रणाली नव्हे तर साधनेतून संघ कार्यकर्ता घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:30 IST

समर्पित भावनेने जगणारे अनेक कार्यकर्ते संघ परिवारात दिसून येतात. आजच्या कालखंडात अशा व्यक्ती नेमक्या कुठल्या ‘मेथडॉलॉजी’तून घडतात असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देमोहन भागवत : उषाताई चाटी यांना वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समर्पित भावनेने जगणारे अनेक कार्यकर्ते संघ परिवारात दिसून येतात. आजच्या कालखंडात अशा व्यक्ती नेमक्या कुठल्या ‘मेथडॉलॉजी’तून घडतात असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र नि:स्वार्थ भावनेतून सेवाकार्य करणाºया व्यक्ती घडविण्याची कुठलीही प्रणाली संघाकडे नाही. अशा प्रणालीतून नव्हे तर स्वत:च्या पुढाकाराने केलेल्या निरंतर साधनेतूनच कार्यकर्ता घडतो. राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी या याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. उषाताई चाटी यांना १७ आॅगस्टला देवाज्ञा झाली. संघ परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.धंतोली येथील अहल्या मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम्, साध्वी ऋतंभरा प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय महिलांत वात्सल्य हे सर्वात मोठे शक्तिस्थान आहे. उषाताई चाटी खºया अर्थाने वात्सल्यमूर्तीच होत्या. आपल्या कार्यातून त्यांंनी नेहमी सर्वांना प्रेरणा दिली. मौलिक कार्य करत असताना कधीच स्वत:बद्दल कुणाला सांगितले नाही. सूर्यासम प्रकाश देणारे कार्य करत असतानादेखील गुप्त राहणे ही कठीण बाब असते. कठीण परिस्थितीतदेखील त्यांच्या चेहºयावर हास्य असायचे. त्यांच्या विचारांच्या मार्गावरुन चालत स्वत:सोबत समाजाला घडविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दांत सरसंघचालकांनी उषाताई चाटी यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपर्कात येणाºया लोकांच्या मनातील नैराश्याचा अंधकार दूर करणाºया त्या ‘उषा’ होत्या. एखादा संकल्प घेतल्यावर त्याला पूर्ण करणे हेच त्यांचे ध्येय असायचे. स्वयंसेविकत्व त्यांनी निर्माण केले, अशा भावना शांताक्का यांनी व्यक्त केल्या. उषाताई चाटी या वटवृक्षाप्रमाणे होत्या. बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केल्या. समाजातील अनेक यशवंतांच्या त्या खºया शक्ती व प्रेरणास्रोत होत्या, असे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराजांनी केले. यावेळी संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उषाताई चाटी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. चित्रा जोशी यांनी प्रास्ताविक केले तर लीना गहाणे यांनी संचालन केले.आईच्या निधनानंतर दिला मायेचा आधारसरसंघचालकांनी यावेळी उषाताई चाटींच्या आठवणींना उजाळा दिल्या. विद्यार्थी असतानापासून त्यांच्या घरी जायचो. संघाच्या अनेक बैठका त्यांच्या घरी व्हायच्या व त्यांनी बनविलेल्या गोळाभाताची प्रतीक्षा असायची. कारण त्यात चवीसोबतच त्यांचे वात्सल्य सामावले असायचे. जम्मूला एका कार्यक्रमादरम्यान माझ्या आईच्या निधनाची बातमी समजली. ही बाब फारशी कुणाला माहीत नव्हती. जम्मूहून रेल्वेत बसल्यावर त्याच गाडीतून परतणाºया उषाताई माझ्याजवळ आल्या. तू जेवण कर, कारण येथून तुला थेट चंद्रपूरला जायचे आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांना सर्वकाही कळले होते, मात्र चेहºयावर दु:खाचे भाव न दाखविता त्यांनी मला आधार देण्याचे काम केले. त्यांचे मायेचे बोल हृदयाला स्पर्शून गेले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.