शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

विशिष्ट प्रणाली नव्हे तर साधनेतून संघ कार्यकर्ता घडतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 01:30 IST

समर्पित भावनेने जगणारे अनेक कार्यकर्ते संघ परिवारात दिसून येतात. आजच्या कालखंडात अशा व्यक्ती नेमक्या कुठल्या ‘मेथडॉलॉजी’तून घडतात असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे.

ठळक मुद्देमोहन भागवत : उषाताई चाटी यांना वाहिली आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : समर्पित भावनेने जगणारे अनेक कार्यकर्ते संघ परिवारात दिसून येतात. आजच्या कालखंडात अशा व्यक्ती नेमक्या कुठल्या ‘मेथडॉलॉजी’तून घडतात असे प्रश्न विचारण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र नि:स्वार्थ भावनेतून सेवाकार्य करणाºया व्यक्ती घडविण्याची कुठलीही प्रणाली संघाकडे नाही. अशा प्रणालीतून नव्हे तर स्वत:च्या पुढाकाराने केलेल्या निरंतर साधनेतूनच कार्यकर्ता घडतो. राष्ट्रसेविका समितीच्या तृतीय प्रमुख संचालिका उषाताई चाटी या याचे मूर्तिमंत उदाहरण आहेत, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी व्यक्त केले. उषाताई चाटी यांना १७ आॅगस्टला देवाज्ञा झाली. संघ परिवारातर्फे गुरुवारी सायंकाळी त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.धंतोली येथील अहल्या मंदिरात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रसेविका समितीच्या प्रमुख संचालिका शांताक्का, अंजनगाव सुर्जी येथील श्री देवनाथ मठाचे पीठाधीश जितेंद्रनाथ महाराज, समितीच्या प्रमुख कार्यवाहिका सीता अन्नदानम्, साध्वी ऋतंभरा प्रामुख्याने उपस्थित होते. भारतीय महिलांत वात्सल्य हे सर्वात मोठे शक्तिस्थान आहे. उषाताई चाटी खºया अर्थाने वात्सल्यमूर्तीच होत्या. आपल्या कार्यातून त्यांंनी नेहमी सर्वांना प्रेरणा दिली. मौलिक कार्य करत असताना कधीच स्वत:बद्दल कुणाला सांगितले नाही. सूर्यासम प्रकाश देणारे कार्य करत असतानादेखील गुप्त राहणे ही कठीण बाब असते. कठीण परिस्थितीतदेखील त्यांच्या चेहºयावर हास्य असायचे. त्यांच्या विचारांच्या मार्गावरुन चालत स्वत:सोबत समाजाला घडविणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल, या शब्दांत सरसंघचालकांनी उषाताई चाटी यांना श्रद्धांजली अर्पण केली. संपर्कात येणाºया लोकांच्या मनातील नैराश्याचा अंधकार दूर करणाºया त्या ‘उषा’ होत्या. एखादा संकल्प घेतल्यावर त्याला पूर्ण करणे हेच त्यांचे ध्येय असायचे. स्वयंसेविकत्व त्यांनी निर्माण केले, अशा भावना शांताक्का यांनी व्यक्त केल्या. उषाताई चाटी या वटवृक्षाप्रमाणे होत्या. बोलण्यापेक्षा कृतीतून त्यांनी इतरांसमोर आदर्श प्रस्थापित केल्या. समाजातील अनेक यशवंतांच्या त्या खºया शक्ती व प्रेरणास्रोत होत्या, असे प्रतिपादन जितेंद्रनाथ महाराजांनी केले. यावेळी संघ परिवारातील विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उषाताई चाटी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण केली. चित्रा जोशी यांनी प्रास्ताविक केले तर लीना गहाणे यांनी संचालन केले.आईच्या निधनानंतर दिला मायेचा आधारसरसंघचालकांनी यावेळी उषाताई चाटींच्या आठवणींना उजाळा दिल्या. विद्यार्थी असतानापासून त्यांच्या घरी जायचो. संघाच्या अनेक बैठका त्यांच्या घरी व्हायच्या व त्यांनी बनविलेल्या गोळाभाताची प्रतीक्षा असायची. कारण त्यात चवीसोबतच त्यांचे वात्सल्य सामावले असायचे. जम्मूला एका कार्यक्रमादरम्यान माझ्या आईच्या निधनाची बातमी समजली. ही बाब फारशी कुणाला माहीत नव्हती. जम्मूहून रेल्वेत बसल्यावर त्याच गाडीतून परतणाºया उषाताई माझ्याजवळ आल्या. तू जेवण कर, कारण येथून तुला थेट चंद्रपूरला जायचे आहे, असे त्यांनी म्हटले. त्यांना सर्वकाही कळले होते, मात्र चेहºयावर दु:खाचे भाव न दाखविता त्यांनी मला आधार देण्याचे काम केले. त्यांचे मायेचे बोल हृदयाला स्पर्शून गेले होते, असे सरसंघचालकांनी सांगितले.