शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

संगणक परिचालकांचे मानधन सहा महिन्यापासून थकले

By निशांत वानखेडे | Published: April 29, 2024 5:17 PM

कुटुंबावर उपासमारीची वाईट वेळ : मानधनवाढीचे आश्वासनही फाेल

नागपूर : संपूर्ण महाराष्ट्रात ग्रामपंचायतमध्ये गावातील नागरिकांच्या दस्ताऐवजाबाबत महत्त्वाची कामे करणाऱ्या संगणक परिचालकांना मागील सहा महिन्यांपासून मानधनच मिळाले नसल्याची गंभीर बाब समाेर येत आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या परिचालकांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात १९,७३८ संगणक परिचालक कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या एकत्रीकरणामुळे २७ हजारापैकी ७ हजार परिचालकांची गच्छंती झाली हाेती. नागपूर जिल्ह्यात ही संख्या ७४० आहे. राज्य सरकारतर्फे नियुक्त कंत्राटदार कंपनीतर्फे परिचालकांची नियुक्ती करण्यात येते. परिचालकांना ८ हजार रुपये मानधन देण्यात येते. महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटनेच्यावतीने मानधनवाढ आणि शासकीय सेवेत नियमितीकरण करण्यासाठी डिसेंबरमध्ये नागपुरात झालेल्या हिवाळी अधिवेशनात आंदाेलन करण्यात आले हाेते. तेव्हापासून ते आता एप्रिल महिन्यापर्यंत या कर्मचाऱ्यांचे मानधन मिळाले नसल्याची माहिती आहे. सरकार व जिल्हा परिषद स्तरावर सततच्या पाठपुराव्यानंतर साेमवारी जानेवारीचे मानधन दिल्याची माहिती आहे. या काळात महत्त्वाचे सण उत्सव हाेऊन गेले पण या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबात गाेडधाेड झाले नाही की मुलांना कपडे घेता आले नाही, अशी व्यथा संघटनेच्या सदस्या माधुरी हटवार यांनी व्यक्त केली. राेजचा भाजीपाला, किरणा, गॅस, इलेक्ट्रीक बिल आणि औषधांचा खर्च कसा करावा, असा सवाल त्यांनी केला आहे.

परिचालकांच्या आंदाेलनानंतर ३ हजार रुपये मानधनवाढ करण्याचे आश्वासन सरकारने दिले हाेते. मानधन वाढले तर नाही पण असलेल्या मानधनाचा एक पैसा सहा महिन्यापासून मिळाला नव्हता. संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर आता जानेवारीचे मानधन जमा करण्यात आले आहे. अशा गंभीर स्थितीत परिचालकांनी त्यांचे कुटुंब कसे चालवावे.- नारायण माेठे, राज्य सचिव, ग्रामपंचायत संगणक परिचालक संघटना

संगणक परिचालकांचे मानधन हे ग्रामपंचायतच्या १५ व्या वित्त आयोग मार्फत १२,००० प्रति महिना याप्रमाणे संपूर्ण वर्षाचे एकत्रितपणे जिल्हा परिषदेला आरटीजीएस प्रणालीद्वारे अदा केले जाते. मात्र कंपनीकडून केवळ ६९०० रुपये परिचालकांना दिले जाते. कंत्राटदार काही न करता प्रत्येक संगणक परिचालकामागे ५ हजार रुपये कमावतो. हे कंपनी शाेषण हाेय.- राजानंद कावळे, कामगार नेते

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतsarpanchसरपंचEducationशिक्षण