शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

ग्रामीण महिला सक्षमीकरणाची ‘उमेद’ वाऱ्यावर, मानधन थकले; ७ दिवसांपासून नागपुरात उपोषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 11:14 IST

पोटापाण्याबरोबरच महिला सुरक्षेचाही प्रश्न ऐरणीवर; वर्धा जिल्ह्यातील ४२ प्रभाग संघ व्यवस्थापिकांचे संविधान चौकात उपोषण

नागपूर : ग्रामीण भागातील महिलांचे बचतगट तयार करून त्यांच्या हाताला कामे देऊन त्यांचा आर्थिक स्तर उंचविण्यासाठी महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती अभियान प्रत्येक जिल्ह्यात राबविले जाते. या अभियानाचा पायलट प्रोजेक्ट २००८ मध्ये वर्धा जिल्ह्यातून सुरू झाला. त्याला ‘उमेद’ असे नाव देण्यात आले. या उमेदमध्ये कार्यरत असलेल्या प्रभाग संघ व्यवस्थापिकांचे मानधन शासनाच्या धोरणामुळे अडचणीत आले आहे. तुटपुंजा मानधनासाठी वर्धा जिल्ह्यातील ४२ व्यवस्थापिका गेल्या ७ दिवसांपासून संविधान चौकात दिवसरात्र उपोषणावर बसल्या आहेत. कुटुंब सोडून उघड्यावर उपोषणावर बसलेल्या या महिलांना पोटापाण्याबरोबरच सुरक्षेचाही प्रश्न भेडसावत आहे.

केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियानाच्या धर्तीवर महाराष्ट्रात जीवनोन्नती अभियान राबविण्यात येत आहे. वर्धा जिल्हा या अभियानाचा पायलट प्रोजेक्ट आहे. यात कार्यरत असलेल्या ४२ प्रभाग संघ व्यवस्थापिकांनी १४ हजार महिला बचतगट जिल्ह्यात तयार केले आहेत. त्यांना सक्षम करण्याचे कार्य या महिला करीत आहेत. त्या मोबदल्यात त्यांना १० हजार रुपये मानधन मिळत होते. परंतु २०२२ च्या अखेरपासून या महिलांची मानधन वितरणाची पॉलिसी शासनाने बदलविली. आता त्यांना अभियानातून मानधन सरकार देणार नसून, महिला बचत गटाच्या प्रभाग संघातूनच त्यांना मानधन काढायचे आहे. परंतु प्रभाग संघ आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्याने या महिलांच्या मानधनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या या प्रोजेक्टला २०२७ पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. पण या महिलांच्या मानधनाचे वांधे झाले आहेत. युवा परिवर्तन की आवाजचे अध्यक्ष निहाल पांडे यांच्या नेतृत्वात या महिला उपोषणाला बसल्या आहे.

- उपेक्षेबरोबर वेदनाही

वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागातून असलेल्या या महिला कुटुंब सोडून ७ दिवसांपासून संविधान चौकात रस्त्यावर आहेत. रात्रीच्या बोचऱ्या थंडीत रस्त्यावरच रात्र काढत आहे. महिलांना प्रातर्विधीच्या समस्या भेडसावत आहे. कुठल्यातरी एका पोलिसाने अभद्र भाषेत त्यांच्यावर चिखलफेक केली. रविवारी तर सकाळपासून त्यांची जेवणाची सोय नव्हती. अखेर पोलिसांनीच रात्रीला त्यांच्या जेवणाची सोय केली. कुटुंबाला आधार व्हावा यासाठी दोन पैशासाठी मोठ्या उमेदीने दिवसरात्र काम करणाऱ्या या महिलांची शासनाकडून उपेक्षा होत असल्यामुळे त्या रस्त्यावर आल्या, पण रस्त्यावरही कुचंबना आणि वेदना त्यांना सहन कराव्या लागत असल्याची भावना दीपमाला तिजारे, शालिनी पाटील, शीला घोरपडे, वंदना राऊत, सुनीता केचे यांनी व्यक्त केली.

टॅग्स :Womenमहिलाagitationआंदोलनnagpurनागपूरwardha-acवर्धाGovernmentसरकारStrikeसंप