शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

‘आरटीई’चा खेळखंडोबा !

By admin | Updated: April 28, 2015 02:30 IST

गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या

प्रवेशप्रक्रियेत क्रमांक लागूनदेखील प्रवेश नाही : विद्यार्थी-पालक वैतागले नागपूर : गरीब व वंचित कुटुंबातील मुलांना चांगल्या शाळांमध्ये शिक्षणाची संधी मिळावी यासाठी राबविण्यात येत असलेल्या ‘आरटीई’ (राईट टू एज्युकेशन) प्रवेशप्रक्रियेत पालकांना समाधान कमी अन् मनस्ताप जास्त, अशी स्थिती निर्माण झाली आहे. ‘आॅनलाईन’ सोडतीमध्ये क्रमांक लागूनदेखील अनेक विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यास शहरातील मोठमोठ्या शाळांकडून चक्क नकार देण्यात येत आहे. काही शाळांनी तर त्या प्रकारचे फलकच लावून ठेवले आहेत. नामांकित शाळांच्या आडमुठेपणाच्या धोरणासमोर एरवी पालकांना नियमांचे धडे देणाऱ्या शिक्षण विभागानेदेखील मौन पत्करल्याचे चित्र आहे. दुसरीकडे दोष नसतानादेखील आमच्या मुलांच्या हक्काचे शिक्षण हिरावण्याचा प्रयत्न सुरू असून याला जबाबदार कोण, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शिक्षणमंत्री आहेत कुठे?शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी ‘आरटीई’ प्रक्रिया अतिशय पारदर्शकपणे राबविण्यात येईल, असा दावा केला होता. नागपूर दौऱ्यावर ते आले असताना ‘आरटीई’च्या संकेतस्थळाबाबत त्यांचे लक्ष वेधले असता कुठलेही ठोस उत्तर त्यांनी दिले नव्हते. आता शहरातील हजारो विद्यार्थ्यांचा प्रवेशाचा प्रश्न निर्माण झाला असताना तावडेंनी कुठलाही ठोस निर्णय का घेतलेला नाही. मुळात शिक्षणमंत्री आहेत तरी कुठे, असा प्रश्न ‘आरटीई अ‍ॅक्शन कमिटी’चे अध्यक्ष शाहिद शरीफ यांनी उपस्थित केला आहे. प्रवेशाच्या या गोंधळाबाबत सोमवारी मुंबई येथे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आढावा घेतला. परंतु यातदेखील कुठलाही ठोस निर्णय झाला नाही.शिक्षणाधिकाऱ्यांच्या इशाऱ्याला शाळांच्या वाकुल्याखासगी शाळांकडून टाळाटाळ करण्याच्या मुद्याला गंभीरतेने घेतल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी म्हटले होते. ज्या शाळा ‘आरटीई’अंतर्गत बालकांना प्रवेश नाकारतील, अशा शाळांवर शासकीय कारवाई करण्याचा इशारा प्राथमिक शिक्षणाधिकारी किशोर चौधरी यांनी दिला होता. परंतु पालकांच्या इतक्या तक्रारी आल्यानंतरदेखील शिक्षण विभागाने शाळांना जाब विचारण्याची हिंमत केलेली नाही.एक किलोमीटरच्या नियमांना हरताळशिक्षण हक्क कायद्यानुसार एक किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांना शाळेत प्रवेश दिले जावे, असा नियम आहे. हा नियम डावलून शहरातील नामांकित शाळांच्या प्रवेश यादीत तीन किलोमीटरपर्यंतच्या अंतरावर राहणाऱ्या विद्यार्थ्यांंची नावे आहेत. ‘आॅनलाईन’चा घोळ?हा सर्व घोळ ‘आॅनलाईन’ सोडतीमुळे निर्माण झाला असल्याची माहिती शिक्षण विभागातील एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. पुणे ‘एनआयसी’च्या ‘सॉफ्टवेअर’मध्ये नर्सरी व पहिली असे दोन वेगळे गट करण्याची आवश्यकता होती. परंतु त्यात संभ्रम निर्माण झाल्यामुळे हा प्रश्न निर्माण झाला असल्याचे त्यांनी सांगितले. वर्ष वाया जाणार का?घराजवळ शाळा असल्याने व नियमांनुसार प्रवेशासाठी पात्र असल्यामुळे आपल्या मुलांना चांगल्या ठिकाणी प्रवेश मिळेलच, अशी पालकांना खात्री होती. पैशाअभावी बहुतांश जणांनी इतर ठिकाणी प्रवेश घेतले नाहीत. परंतु आता ‘आरटीई’मध्ये क्रमांक लागूनदेखील शाळा प्रवेश नाकारत आहेत. अशास्थितीत दुसऱ्या शाळेत शुल्क भरुन प्रवेश मिळेल की नाही, तसेच त्यासाठी पैसे कुठून आणायचे ही चिंता पालकांना लागली आहे. कुठलीही चूक नसताना मुलांचे एक वर्ष वाया जाते की काय, असा प्रश्नदेखील त्यांना सतावत आहे.