शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

नागपूर शहरातील सांडपाण्यामुळे नदीतील पाणी दूषित होऊ नये : जिल्हाधिकारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2021 12:23 AM

River water should not be polluted शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : शहरातील सांडपाण्यामुळे नदी, नाले दूषित होऊ नयेत, यासाठी प्रशासनासोबतच नागरिकांनीही पुढाकार घ्यावा. त्यामुळे सर्वांना शुद्ध पाणी मिळू शकेल, यासंदर्भात प्रशासनाला नियोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी संबंधितांना दिल्या.

जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली नीरी येथे आज बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार व त्यांचे सहकारी शास्त्रज्ञ तसेच जिल्ह्यातील गटविकास अधिकारी व नगर परिषदेचे मुख्याधिकारी उपस्थित होते.

शहरातील नागरिकांसाठी नागनदीच्या पाण्याचा उपयोग करून भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. त्यामुळे दूषित भाजीपाला उत्पादित होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण होतो. या दूषित पाण्यामुळे भाजीपाल्यावर परिणाम होणार नाही, याबाबत शास्त्रज्ञ व अधिकाऱ्यांनी चर्चा करुन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले.

कामठी व कन्हान येथील जलशुध्दीकरणाच्या कामास प्राधान्य देऊन त्या क्षेत्राची शास्त्रज्ञांमार्फत पाहणी करावी तसेच या विषयावर सखोल चर्चा करून पुढील कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या दोन्ही क्षेत्राच्या पाहणीचे व्हिडिओ बनवून त्यानंतरच त्यावर कार्यवाही करण्याचे जिल्हाधिकारी यांनी निर्देश दिले.

या नदी क्षेत्रात घेण्यात येणाऱ्या पालक, वांगे, कोबी भाजीपाल्यांमध्ये नायट्रेटचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असल्याने त्याचा रंग गर्द हिरवा दिसतो, असे नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार यांनी सांगितले.

शोष खड्डे व शौचालयासाठी बांधण्यात आलेल्या खड्ड्यांमुळे पाणी प्रदूषणाबाबत विचारण्यात आले असता, या क्षेत्रातील पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्याबाबत तपास करुन अहवाल सादर करण्यात येणार असल्याचे बैठकीत चर्चेदरम्यान सांगण्यात आले. सांडपाण्यात झाडे लावल्यास पाण्यातील घाण झाडात अडून पाणी शुध्दीकरणास मदत होते तसेच पाणी मिळाल्यामुळे झाडांची वाढ होते असे त्यांनी सांगितले. सांडपाण्यात जाळी लावून पाणी शुध्दीकरण करण्याबाबत त्यांनी सूचना केल्या.

टॅग्स :Naag Riverनाग नदीpollutionप्रदूषणcollectorजिल्हाधिकारी