शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

शाळेतील तांदूळ संपतोय, खिचडी शिजणार कशी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:32 PM

शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादि मालाबरोबरच आता तांदळाचा पुरवठाही बंद झाला आहे. तांदळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा करार ३० नोव्हेंबरला संपल्यामुळे शाळांना तांदळाचा पुरवठा करणे बंद झाले आहे. आॅक्टोबरमध्ये शाळांना दोन महिन्याचा तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता. हा तांदूळ आता संपतोय. शाळेकडून तांदळासाठी मागण्या येऊ लागल्या आहेत. पण पुरवठाच बंद असल्याने विद्यार्थ्यांची खिचडी शिजणार कशी, असा सवाल विविध शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला आहे.

ठळक मुद्देनागपुरातील मुख्याध्यापकांचा सवाल : पुरवठादाराचा करार संपल्याने पुरवठा थांबला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शालेय पोषण आहार योजनेतील धान्यादि मालाबरोबरच आता तांदळाचा पुरवठाही बंद झाला आहे. तांदळाचा पुरवठा करणाऱ्या कंत्राटदाराचा करार ३० नोव्हेंबरला संपल्यामुळे शाळांना तांदळाचा पुरवठा करणे बंद झाले आहे. आॅक्टोबरमध्ये शाळांना दोन महिन्याचा तांदळाचा पुरवठा करण्यात आला होता. हा तांदूळ आता संपतोय. शाळेकडून तांदळासाठी मागण्या येऊ लागल्या आहेत. पण पुरवठाच बंद असल्याने विद्यार्थ्यांची खिचडी शिजणार कशी, असा सवाल विविध शाळेच्या मुख्याध्यापकांनी केला आहे.महाराष्ट्र स्टेट को-आॅपरेटिव्ह क न्झुमर फेडरेशनला नागपूर विभागांतर्गत येणाऱ्या शाळांना तांदळाचा पुरवठा करण्याचा कंत्राट दिला होता. सरकारच्या एफसीआय गोदामातून पुरवठादार तांदळाची उचल करून, शाळांना त्याचा पुरवठा करीत होते. ३० नोव्हेंबर रोजी फेडरेशनचा करार संपला. नव्या करारासंदर्भात पुढची पावले शासनाने उचलली नाही. त्यामुळे फेडरेशनने ३० नोव्हेंबरनंतर शाळांना तांदळाचा पुरवठा करणे थांबविले आहे. अशीच अवस्था धान्यादि मालाच्या संदर्भातही झाली आहे. ‘शापोआ’ योजनेंतर्गत विद्यार्थ्यांना द्यावयाच्या मध्यान्ह भोजनाकरिता आवश्यक धान्यादि माल पुरवठा करण्याचा कंत्राटसुद्धा संपला आहे. शिक्षण विभागाने मुख्याध्यापकांना धान्यादि मालाची खरेदी करण्याचे निर्देश दिले आहे. शिक्षण विभागाच्या या निर्णयाला शिक्षकांनी विरोध केला आहे. प्रशासनाच्या बेपर्वाईचा फटका आम्ही का भोगावा, असा सवाल शिक्षकांचा आहे.शाळांना धान्यादि मालाचा पुरवठा नाही, तांदळाचा पुरवठा बंद झाला आहे. शासनाने शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना नियमित द्यावा, असे स्पष्ट निर्देश आहे. शासनाकडून साहित्यच उपलब्ध होत नसेल तर विद्यार्थ्यांना पोषण आहार देणार कसे, असा सवाल शिक्षकांकडून विचारण्यात येत आहे. शासनाने पुरवठ्यासंदर्भात कुठलाच निर्णय अद्यापही न घेतल्याने शिक्षण अधिकारीसुद्धा हतबल आहेत.शालेय पोषण आहार योजना ही सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार सुरू आहे. पुरवठादाराशी करार संपणे, तांदूळ व धान्यादी मालाचा पुरवठा बंद होणे हे प्रकार सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाची अवहेलनाच आहे. शालेय पोषण आहार ही महत्त्वपूर्ण योजना असल्यामुळे शासनाने पर्यायी व्यवस्था करणे गरजेचे आहे. पण तसे होत नसल्यामुळे त्याचा फटका मुख्याध्यापकांना बसतो आहे.परसराम गोंडाणे, सरचिटणीस, कास्ट्राईब शिक्षक संघटना

 

टॅग्स :Studentविद्यार्थीnagpurनागपूर