शहरं
Join us  
Trending Stories
1
EVM अनलॉक करण्यासाठी ओटीपी लागतो? वायकर प्रकरणात निवडणूक आयोगाचा मोठा खुलासा
2
इलॉन मस्क यांच्या EVM वरील विधानाला आदित्य ठाकरेंचे समर्थन; म्हणाले, “काहीही होऊ शकते”
3
पुन्हा पावसाने मारली दांडी! राज्यात विदर्भात पावसाची प्रतीक्षा, इतर जिल्ह्यातही जोर कमी झाला
4
Rohit Sharma Shubman Gill Story: ऑल इज् वेल!! रोहित शर्माशी वादाच्या चर्चांदरम्यान शुबमन गिलच्या स्टोरीने साऱ्यांची 'बोलती बंद'
5
आमचे ५७ आमदार, राष्ट्रवादीची २८८ जागा लढविण्याची तयारी...; प्रफुल्ल पटेलांनी सांगितला विधानसभा लढविण्याचा आकडा
6
“५०० पार गेला तरी देशाला हिंदूराष्ट्र घोषित करु शकत नाही”; अमोल मिटकरींचे भाजपला प्रत्युत्तर
7
इस्रायलला आठवली माणूसकी! गाझा पट्ट्यात 'या' वेळेत असणार युद्धबंदी, होणार नाही हल्ले
8
'EVM एक ब्लॅक बॉक्स आहे अन्...', लोकसभेच्या निकालांवर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
9
EVM वर आता इलॉन मस्क यांनी घेतली शंका; भाजपाचे प्रत्युत्तर, नेते म्हणाले, “आम्ही शिकवणी घेऊ”
10
EVM अनलॉक करणारा फोन वायकरांच्या नातेवाईकाकडे; भाजप म्हणतं, "शब्दांची फेरफार करुन..."
11
विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! शाळा- महाविद्यालयातच मिळणार एसटी बसचा प्रवासी पास
12
"एकदा जो गद्दारी करतो, तो कायम गद्दारच असतो," आदित्य ठाकरेंची रविंद्र वायकरांवर टीका
13
“१३ तारखेपर्यंत वाट पाहणार, कोण येते अन् कोण नाही याकडे आमचे लक्ष”: मनोज जरांगे पाटील
14
'फादर्स डे' निमित्त प्रसाद ओकच्या पत्नीची चेहऱ्यावर हसू आणि डोळ्यात पाणी आणणारी खास पोस्ट
15
“देशातील लोकशाही अन् संविधान वाचवायला आता RSSला भूमिका घ्यावी लागेल”: संजय राऊत
16
रवींद्र वायकरांच्या नातेवाईकाचा मोबाईल EVM सोबत का जोडला होता? काँग्रेसचा सवाल
17
“एनडीए सरकार स्थिर नाही, कधीही पडू शकते, भाजपा मित्र पक्षात फोडाफोडी करुन...”: संजय राऊत
18
निलेश लंकेंनीही घेतली मनोज जरांगे पाटलांची भेट; मराठा आरक्षणाबद्दल म्हणाले...
19
मोहन भागवत आणि योगी आदित्यनाथ यांच्यात बंद दाराआड चर्चा; राजकीय वर्तुळात तर्कवितर्क
20
INDW vs SAW Live : भारताने टॉस जिंकला! दीप्तीसाठी ऐतिहासिक सामना; आशा सोभनाचे पदार्पण

सेवानिवृत्त अनुत्सुक; शिक्षकांच्या रिक्त जागा भरण्याचा तिढा कायम

By गणेश हुड | Published: January 10, 2024 8:13 PM

विद्यार्थ्यांचे नुकसान : अर्धेसत्र संपले परंतु शिक्षक मिळाले नाहीत

नागपूर :  राज्य सरकारच्या सूचनानुसार जिल्हा परिषदेतील शिक्षकांच्या रिक्त जागांवर सेवानिवृत्त शिक्षकांची मानधनावर नियुक्तीची प्रक्रीया राबवली जात आहे. यासाठी २०२  सेवानिवृत्त शिक्षकांनी अर्ज केले होते. त्यातील  १७५ अर्ज पात्र ठरले आहे. परंतु नियुक्तीपूर्वीच्या समुपदेशनाला १२२ सेवानिवृत्त शिक्षक उपस्थित होते. नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षकांपैकी अनेक जण दुर्गम व नागपूर शहरापासून लांब अंतरावरील शाळांवर जाण्यास इच्छूक नसल्याने या भरतीनंतरही  शिक्षकांच्या रिक्त जागांचा तिढा कायम आहे.

जिल्ह्यात जि.प.च्या शाळांसाठी सुमारे साडेचार हजार शिक्षकांची पदे मंजूर करण्यात आली आहेत. यातील ९५० पदे रिक्त आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याने बरीच ओरड झाल्यानंतर  सरकारने सेवानिवृत्त शिक्षकांतून कंत्राटी शिक्षकांची पदभरती करण्याच्या सूचना केल्या. कंत्राटी शिक्षकाला दरमहा २० हजार रुपये मानधनावर देण्याचे निश्चितही झाले. परंतु नागपूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त जागा व सेवानिवृत्तांची करण्यात आलेली निवड याचा विचार करता सेवानिवृत्त शिक्षक या भरतीसाठी अनुच्छूक असल्याचे दिसून येते. 

एकट्या रामटेक तालुक्यात शिक्षकांची ९४ पदे रिक्त आहेत. यात प्रामुख्याने दुर्गम भागातील शाळांचा समावेश आहे. पेन्शनधारक शिक्षक २० हजार रुपयाच्या मानधनासाठी दुर्गम भागात वास्तव्यास जातील का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.  अर्ध्याहून अधिक शैक्षणिक सत्र संपले आहे. परंतु शिक्षक न मिळाल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :nagpurनागपूरSchoolशाळाTeacherशिक्षक