शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

सरकारी कंपनीकडे ‘अमृत’ची जबाबदारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 07, 2018 10:17 PM

केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका प्रशासनाने सहावेळा निविदा काढल्या. परंतु खासगी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी निविदा सादर केल्या परंतु त्या ३५ टक्केहून अधिक दराच्या होत्या. मात्र आता शासनाच्या वाप्कोस कंपनी प्रकल्पाच्या २३ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देनागपूर मनपाच्या स्थायी समितीच्या बैठकीत प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यताखासगी कंपन्यांचा प्रतिसाद नाही : वाप्कोस २३ टक्के अधिक दरावर काम करणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्या अमृत योजनेंतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी महापालिका प्रशासनाने सहावेळा निविदा काढल्या. परंतु खासगी कंत्राटदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. काहींनी निविदा सादर केल्या परंतु त्या ३५ टक्केहून अधिक दराच्या होत्या. मात्र आता शासनाच्या वाप्कोस कंपनी प्रकल्पाच्या २३ टक्के अधिक दराने काम करण्याची तयारी दर्शविली आहे. स्थायी समितीच्या पुढील बैठकीत या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे.शहरातील अधिकृत व अनधिकृत वस्त्या व झोपडपट्टी भागात पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारने २२६.६९ कोटींच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेला २८ आॅक्टोबर २०१६ रोजी मंजुरी दिली आहे. त्यानंतर १९ एप्रिल २०१७ ला २२७.७९ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली. मंजुरी मिळाल्यानंतर महापालिका प्रशासनाने प्रकल्पाच्या चारवेळा संयुक्त निविदा काढल्या. सुरुवातीला कंत्राटदारांचा प्रतिसाद मिळाला नाही. गेल्या दीड वर्षात सहावेळा निविदा काढण्यात आल्या. परंतु कंत्राटदारांनी निर्धारित दरात काम करण्याची तयारी दर्शविली नाही. त्यामुळे या प्रकल्पाचे काम रखडले आहे.नंतर ३५ टक्के अधिक दराच्या निविदा आल्या. त्यामुळे महापालिका प्रशासनाने अमृत योजनेच्या कामाची सहा टप्प्यात विभागणी क रून निविदा काढली. शेवटी २२.१४ टक्के अधिक दराने २७८.२१ कोटीत हा प्रकल्प राबविण्याची तयारी खासगी कंत्राटदाराने दर्शविली. दरम्यान ३० जानेवारी २०१८ रोजी जलसंपदा मंत्र्यांच्या बैठकीत हा प्रकल्प महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून राबविण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर केंद्र सरकारच्या वाप्कोस लिमिटेड कंपनीने काम करण्याची तयारी दर्शविली. अखेर या कंपनीच्या माध्यमातून हा प्रकल्प राबविला जाणार आहे. महापालिकेच्या सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे.प्रकल्पाच्या खर्चात वारंवार बदलसुुरुवातील वाफ्कोस कंपनीने प्रकल्पाचे प्राकलन २२ टक्के अधिक दराचे म्हणजेच २२६.६९ कोटीचे व सल्लागार शुल्क ८ टक्के असा एकूण २९८.६९ कोटींचा प्रस्ताव महापालिकेला दिला. चर्चेत कंपनीने २० टक्के अधिक दर व सल्लागार शुल्क ५ टक्के कमी करण्याची तयारी दर्शविली. आता या प्रकल्पाचा खर्च २८५.६२ कोटी झाला आहे. हा प्रस्ताव २७ मार्च २०१८ रोजी शासनाकडे पाठविण्यात आला. १ जून २०१८ जीवन प्राधिकरणने सुधारित आराखडा तयार केला. त्यानुसार राज्य सरकारने २५ जून २०१८ ला २७३.७८ कोटींच्या सुधारित प्रस्तावाला मंजुरी दिली.सल्लागाराचे शुल्कही कमी केलेराज्य सरकारने हिरवी झेंडी दिल्यानतंर २९ जून २०१८ रोजी आयुक्तांनी वाफ्कोस कंपतीच्या अधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले. यात सल्लागार शुल्क ५ टक्केवरून ३ टक्के कमी करण्याला कंपनीने संमती दर्शविली. आता वाप्कोस कंपनी २८०.१८ कोटीत हा प्रकल्प राबविणार आहे.मनपाचा वाटा १३६.८९ कोटींचाअखेर अमृत योजनेच्या सुधारित २७३.७८ कोटींच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. यात केंद्र सरकारचा वाटा ३३.३३ टक्के म्हणजेच ९१.२५ कोटी, राज्य सरकार १६.६७ टक्के म्हणजेच ४५.६४ कोटी तर महापालिकेला ५० टक्के वाटा उचलावयाचा असून यावर १३६.८९ कोटी खर्च करावे लागतील. राज्य सरकारकडून या प्रकल्पासाठी २२.३० कोटी प्राप्त झाले आहे.

 

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाWaterपाणी