शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

रिपोर्ट द्या; अन्यथा अ‍ॅक्शन : सत्तापक्षाची मनपा प्रशासनाला तंबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 10:08 PM

तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.

ठळक मुद्देसात दिवसात रिपोर्ट न दिल्यास निलंबन : पाणीटंचाईवर विरोधक आक्रमक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तोतलाडोह धरणामधील पाण्याचा ‘डेड स्टॉक’ कमी झाला आहे. शहराला होणाऱ्या पाणीपुरवठ्यात ४० ते ४५ एमएलडीने घट झाली आहे. शहरात पाण्याची समस्या आहे. नागरिक त्रस्त आहेत. सहा महिन्यापूर्वी डिसेंबर महिन्यात सभागृहात पाणीटंचाईवर चर्चा झाली. परंतु जलप्रदाय विभागाने ‘अ‍ॅक्शन टेकन रिपोर्ट’ अद्याप सादर केलेला नाही. पाणीकपात व दूषित पाण्याच्या मुद्यावर गुरुवारी सभागृहात वादळी चर्चा झाली. यामुळे सत्ता पक्षनेते संदीप जोशी नाराज झाले. २८ जूनपूर्वी सभागृहात रिपोर्ट ठेवला नाही तर शहरातील पाणीटंचाईला आयुक्तांना जबाबदार धरू, तसेच सर्वोच्च सभागृहाच्या आदेशाचे पालन न केल्याने अधिकाऱ्यांनी निलंबन कारवाईसाठी तयार राहावे, असा इशारा जोशी यांनी दिला.तीन महिन्यानंतर आयोजित सर्वसाधारण सभेत काँग्रेसचे नगरसेवक प्रफुल्ल गुडधे व भाजपाचे धरमपाल मेश्राम यांनी स्थगन प्रस्ताव आणून पाणीटंचाईवर चर्चेची मागणी केली. चर्चेला सुरुवात झाली, परंतु सभागृहात सदस्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांना जलप्रदाय विभागातील अधिकारी समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. यामुळे विरोधकांसोबतच सत्तापक्षाने प्रशासनाला धारेवर धरले.डिसेंबर महिन्यात पाणीटंचाई निवारणासाठी चर्चा झाली होती. आता जूनचा दुसरा पंधरवडा सुरू आहे. परंतु अद्याप प्रशासनाने अ‍ॅक्शन रिपोर्ट सादर केलेला नाही. मोर्चे, धरणे व निदर्शने होत नाहीत. याचा अर्थ शहरात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा होतोय असा नाही. नागरिकांच्या संयमाचा अंत पाहू नका, असा इशारा सदस्यांनी दिला.शहराला आता ७३० ऐवजी ६७० एमएलडी पाणीपुरवठा होत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. चर्चेदरम्यान गुडधे व धरमपाल मेश्राम यांच्यात वारंवार खडाजंगी झाली. भाजपाचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी त्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.शहरात समान पाणी वितरण होत नाही. चेहरा बघून पाणीपुरवठा होत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते तानाची वनवे यांनी केला. ज्या भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे, अशा भागातील दोषी अधिकाऱ्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी केली. पाणी गळती वेळीच रोखली असती तर १५ दिवस पुरेल इतके पाणी वाचले असते, असे मत त्यांनी मांडले. काँग्रेसचे नगरसेवक पार्षद जुल्फेकार भुट्टो यांनी मोमीनपुरा भागातील पाणीटंचाईचा मुद्दा उपस्थित केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाwater scarcityपाणी टंचाई