शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
4
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
5
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
6
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
7
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
8
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
9
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
10
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
11
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
12
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
13
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
15
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
16
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
17
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
18
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
19
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
20
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

मास्कच्या वापराने व्हायरलचे रुग्ण कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:24 IST

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्कच्या वापराची सवय गरजेची झाली आहे. या सवयीमुळे कोरोनाच नव्हे तर विषाणूजन्य आजारांनाही दूर ठेवणे ...

नागपूर : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मास्कच्या वापराची सवय गरजेची झाली आहे. या सवयीमुळे कोरोनाच नव्हे तर विषाणूजन्य आजारांनाही दूर ठेवणे शक्य झाले आहे. विशेष म्हणजे, बदलत्या वातावरणामुळे व्हायरलच्या रुग्णांत दरवर्षी मोठी वाढ होते, परंतु मास्कचा उपयोग वाढल्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी विषाणूजन्य आजारांचे रुग्ण कमी झाले आहेत. मास्कचा वापर व सुरक्षित अंतराचे आपण नेहमी पालन केल्यास क्षयरोगाच्या नव्या रुग्णांतही घट येऊ शकते, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

मार्च महिन्यापासून कोरोनाचा संसर्ग वाढताच मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग व वारंवार हात धुणे या त्रिसूत्रींचे आवाहन केले जात आहे. आता तर हा एक जीवनशैलीचा भाग झाला आहे. घराबाहेर पडताना मास्क वापरण्यास प्राधान्य दिले जात आहे. याचा फायदा कोरोनासोबतच इतर विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यास मदत होत आहे. परंतु दरम्यानच्या काळात कोरोनाचे रुग्ण कमी होताच मास्कचा वापर कमी झाल्याचे दिसून आले. परिणामी, महानगरपालिका व पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली. दंडाची रक्कम वाढवून ५०० रुपये केली. यामुळे कारवाईच्या भितीने का होईना, मास्कचा वापर पुन्हा वाढला आहे. कोरोनासोबतच इतर विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यास त्याचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे.

अ‍ॅलर्जी सारख्या रुग्णांची संख्याही कमी

पावसाळ्यात व हिवाळ्यात सर्वाधिक रुग्ण अ‍ॅलर्जीचे दिसून यायचे. सर्दी, खोकल्याने नागपुरकर हैराण व्हायचे. परंतु शासकीयसह खासगी रुग्णालयांमध्ये आता या आजाराचे फार कमी रुग्ण दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. दरवर्षी दिसणाºया संसर्गजन्य आजार स्वाईन फ्लूचे रुग्ण नसल्यासारखेच आहेत.

-श्वसनाच्या आजारांच्या रुग्णांतही घट

या दिवसांत धुर व धुळीमुळे वाढणाºया अस्थमाचे रुग्ण कमी झाल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. श्वसनाचा आजार असलेल्यांसाठी मास्क वापरण्याचे आवाहन पूर्वीपासून केले जात होत होते. परंतु आता त्याचा उपयोग करणाºयांची संख्या वाढल्याने याचा फायदा रुग्णांना होता दिसून येत आहे.

-ओपीडीत मोठी घट

मेडिकल व मेयोमध्ये हिवाळाच्या दिवसांत २५०० ते ३००० वर ओपीडी असायची. यात बहुसंख्य रुग्ण हे व्हायरल व श्वसनाशी संबंधित आजाराचे असायचे. परंतु आता १००० ते १५००वर ओपीडी आली आहे. सध्या लॉकडाऊनच्या दरम्यान अंगावर आजार काढलेले रुग्ण मोठ्या संख्येत दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

विषाणूजन्य आजारांना दूर ठेवण्यासाठी मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग आणि वारंवार हात धुणे ही त्रिसूची महत्त्वाची ठरते. कोरोनाचा दहशतीमुळे का होईना याचा वापर वाढला आहे. परिणामी, सर्दी, खोकला, व्हायरलचे रुग्ण कमी दिसून येत आहे.

-डॉ. प्रशांत पाटील, प्रमुख, औषधवैद्यकशास्त्र विभाग, मेडिकल

मागीलवर्षी ओपीडी-२५००

या वर्षीची ओपीडी १५००

(मागील वर्षी आणि या वर्षी हिवाळ्यातील मेडिकलमधील एका दिवसाची आकडेवारी)