शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
2
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
3
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
4
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
5
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
6
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
7
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
8
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
9
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
10
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
11
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
12
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
13
IND v PAK: हिंदुस्थान झिंदाबाद! भारत जिंकल्यावर काश्मीरमध्ये लष्करी जवान, नागरिकांचा जल्लोष
14
कोस्टल रोडवर पुन्हा अपघात; कारच्या धडकेत दोघे जखमी
15
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
16
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
17
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
18
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
19
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
20
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न

सरकारविरोधात असंतोषाचा लाल सलाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:28 IST

भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली.

ठळक मुद्देभाकपातर्फे विभागीय आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : भारतीय कम्युनिस्ट पार्टीच्यावतीने सोमवारी विराट मोर्चा काढण्यात आला. भाजपा सरकार कॉर्पोरेट व भांडवलदारांच्या हितासाठीच कार्यरत असल्याचा आरोप आणि सरकारविरोधात तीव्र घोषणाबाजी देत मोर्चाने विभागीय आयुक्त कार्यालयाकडे कूच केली.भाकपाचे राज्य सचिव कॉ. तुकाराम भस्मे यांच्या नेतृत्वात नेहरू बालोद्यान, सुभाष रोड येथून हा मोर्चा काढण्यात आला. यामध्ये नागपूरसह भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा या जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने आंदोलनकारी सहभागी झाले. शेतकरी, शेतमजूर, अंगणवाडी कर्मचारी, पोषण आहार कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, असंघटित कामगार,जबरान जोत आदिवासी, महिला, युवक, विद्यार्थी यांच्या ज्वलंत मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. संविधान चौकात सभा घेण्यात आली. यामध्ये कॉ. भस्मे यांनी सरकारला धारेवर धरले. गेल्या ७० वर्षांत देशातील ४८ टक्के संपत्ती १ टक्का लोकांच्या हातात होती. मात्र भाजपा सरकारच्या चार वर्षाच्या काळात यामध्ये प्रचंड वाढ झाली असून, आता देशाची ७३ टक्के संपत्ती एक टक्का लोकांच्या हातात गेल्याचा आरोप त्यांनी केला. या काळात शिक्षणाचे व्यापारीकरण झाले, बेरोजगारीत प्रचंड वाढ झाली, दलित, अल्पसंख्यांकावर हल्ले वाढले आणि पेट्रोल-डिझेल व जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत भरमसाट वाढ झाल्याची टीका त्यांनी केली.शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी, बोंडअळी व दुष्काळग्रस्त शेतक ऱ्याना तत्काळ मदत, शेतमालाला दीडपट भाव मिळावा, जबरान जोतधारकांना वनजमिनीचे हक्क देण्यात यावे, अंगणवाडी, पोषण आहार व ग्रामपंचायत कर्मचा  ऱ्या च्या मानधनात वाढ व्हावी,झोपडपट्टीधारकांना मालकी पट्टे, बेरोजगारांना काम अशा विविध मागण्या करण्यात आल्या. त्यानंतर शिष्टमंडळाने विभागीय आयुक्तांची भेट घेऊन मागण्यांचे निवेदन सोपविले. आंदोलनात कॉ. श्याम काळे, कॉ. अरुण वनकर, डॉ. महेश कोपुलवार, हिरालाल येरमे, प्रकाश खोब्रागडे, चंद्रभान मेश्राम, संजय वाकडे, होसलाल रहांगडाले, नामदेव कन्नाके, संतोष दास, प्रकाश रेड्डी, सदानंद इलमे, हिवराज उके, माधवराव बांते, असलम पठाण, सुधाकर वाघुके आदींचा सहभाग होता.

टॅग्स :agitationआंदोलनnagpurनागपूर