शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

गडचिराेलीत रेड अलर्ट; भामरागडच्या ४० गावांचा संपर्क तुटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 10:31 IST

चंद्रपुरात सर्वाधिक पाऊस, शहर जलमय : पूर्व विदर्भात दाेन दिवस ऑरेंज अलर्ट

नागपूर/गडचिरोली/चंद्रपूर : जिल्ह्यात २४ तासांपासून सर्वदूर जोरदार पाऊस सुरू असून, जिल्हा प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला आहे. अतिदुर्गम भामरागड तालुक्याला पावसाचा सर्वाधिक फटका बसला. भामरागडमधील अंतर्गत आठ रस्त्यांसह मुख्य महामार्ग पाण्याखाली आल्यामुळे वाहतूक ठप्प झाली असून, ४० पेक्षा जास्त गावांचा संपर्क तुटला आहे. दरम्यान, मंगळवारी चंद्रपुरात सर्वाधिक २६० मिमी पावसाची नाेंद झाली असून, संपूर्ण जलमय झालेल्या शहरातील शेकडाे घरे पाण्याखाली गेल्याची स्थिती हाेती.

१७ जुलै रोजी रात्रीपासून जिल्ह्यात सर्वदूर धो-धो पावसाला सुरुवात झाली. आलापल्ली-भामरागड महामार्ग क्र. १३० ‘डी’वर भामरागड येथे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. याशिवाय, जिल्हाभरातील १५ रस्ते पाण्याखाली गेले असून, वाहतूक बंद केली आहे. सायंकाळनंतर पाणी ओसरण्यास सुरुवात झाली. चामाेर्शी तालुक्यातील रेगडी येथील कन्नमवार धरण पहिल्याच पावसात ओव्हरफ्लो झाले. चादरीवरून पाणी ओसंडून वाहत होते. यासोबतच इतर तालुक्यांतही पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतशिवारात पाणीच पाणी झाले होते. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.

दुसरीकडे, चंद्रपूर शहरालाही मंगळवारी जाेरदार पावसाचा तडाखा बसला. सकाळपासून धुवाधार पावसाने शहराला अक्षरश: झोडपून काढले आहे. येथे १२ तासांत तब्बल २६० मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक वाॅर्ड पाण्याखाली आले असून शेकडो घरांत पाणी शिरले. रस्त्यांवर तीन ते चार फूट पाणी साचल्याचे चित्र बघायला मिळाले. यामुळे वाहतूक विस्कळीत झाली. जिल्ह्यातील बहुतांश नदी-नाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे काही शेतांत पाणी साचले असून, मोठे नुकसान होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, राजुरा तालुक्यातील गोवरी येथील नाल्यावरील रपटा वाहून गेल्याने राजुरा-कवठाळा या मार्गावरील वाहतूक ठप्प पडली. गडचांदूर-जिवती मार्गावर झाड कोसळल्याने हा मार्ग बंद होता. तर, चंद्रपूर-मूल मार्गावरील घंटाचौकी परिसरात एका वाहनावर झाड कोसळल्याने हा मार्ग काही वेळासाठी बंद होता. यामुळे दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पावसाची काेसळधार सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू होती. दरम्यान, प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून, पाणीपातळी वाढल्यास जवळच्या महापालिका शाळांमध्ये आश्रय घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

इतरत्र हलका-मध्यम पाऊस, दाेन दिवस ऑरेंज अलर्ट

नागपूरसह विदर्भातील इतर जिल्ह्यांत हलक्या व मध्यम स्वरूपाचा पाऊस हाेता. वर्ध्यात दिवसा ३१ मिमी पावसाची नाेंद करण्यात आली. नागपूरला १२ मिमी पाऊस झाला. जिल्ह्यात सायंकाळपासून पावसाचा जाेर वाढला हाेता. दरम्यान, काही दिवसांच्या पावसाने पूर्व विदर्भातील बॅकलाॅग भरून काढला आहे. भंडारा, गाेंदिया व आता गडचिराेली, चंद्रपुरात पाऊस सरप्लस झाला असून, नागपूर व वर्ध्यात असलेली तूट सामान्य आहे. अकाेला, अमरावतीत मात्र तूट २५ टक्क्यांवर आहे. विदर्भात पुढचे दाेन दिवस पुन्हा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून, काही ठिकाणी अतितीव्र पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

वीज कोसळून एक ठार

धानोरा तालुक्यातील खांदाळी शेतशिवारात संजय देवशा उसेंडी (वय २८, रा. पवनी, धानोरा) हा झोपडीकडे गुरे घेऊन जात होता. वाटेत वीज अंगावर कोसळली. यात तो जागीच गतप्राण झाला. तर उत्तम हिरामण पदा (वय २५, रा. सालेभट्टी, ता. धानोरा) हा जखमी झाला. जखमीवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

भंडारा जिल्ह्यातही संततधार

भंडारा जिल्ह्यात गत तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. पावसाचा जोर तिसऱ्या दिवशीही कायम होता. जिल्ह्यातील सातही तालुके मिळून एकूण सरासरी ७१ मिमी पाऊस बरसला. वैनगंगा नदीला पूर आलेला नसून नदीची पातळी कायम ठेवण्याच्या उद्देशाने गोसेखुर्द धरणातून सातत्याने टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. सद्यस्थितीत गोसेखुर्द धरणाचे नऊ दरवाजे उघडले आहेत. भंडारा शहराला लागून वाहत असलेल्या कारधा-वैनगंगा नदीची पातळी इशारा व धोक्याच्या पातळीपेक्षा कमी वाहत आहे. लाखनी तालुक्यातील कवलेवाडा येथे झाडावर वीज कोसळल्याने जवळ बांधलेल्या दोन गायींपैकी एकीचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला.

पश्चिम विदर्भात पावसाची रिपरिप

पश्चिम विदर्भात आठ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरूच आहे. २४ तासांत सरासरी २.७ मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये अकोला जिल्ह्यात दिवसभर वाताव ढगाळ पण उघाड अशी स्थिती होती. पेरणीला व पिकांच्या वाढीसाठी पाऊस पोषक ठरला आहे. यवतमाळ जिल्ह्यातही रिमझिम पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सरासरी ३.५ मिमी इतका राहिला. सर्वाधिक १३ मिमी पाऊस उमरखेड तालुक्यात नोंदविण्यात आला. हवामान विभागाने २४ जुलैपर्यंत हलका ते मध्यम पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. विभागात अद्याप २५ टक्के पावसाची तूट आहे. या आठवड्यात ही तूट भरून निघण्याची शक्यता आहे. विभागात १ जूनपासून २८६६ मिमी. पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात २१३.६ मिमी. पावसाची नोंद झाली. ती ७४.५ टक्के आहे.

संजय सरोवर धरणाचे दरवाजे उघडले

गोंदिया जिल्ह्यात महिनाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसाने दमदार हजेरी लावली. त्यानंतर सोमवारी व मंगळवारी पावसाची रिपरिप कायम होती. गेल्या २४ तासांत २२.७ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तर धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याने मध्य प्रदेशातील संजय सरोवर धरणाचे ५ दरवाजे रात्री उघडण्यात आले. त्यामुळे नदीकाठालगतच्या गावकऱ्यांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला.

टॅग्स :floodपूरmonsoonमोसमी पाऊसRainपाऊसVidarbhaविदर्भnagpurनागपूरGadchiroliगडचिरोलीchandrapur-acचंद्रपूरgondiya-acगोंदियाbhandara-acभंडारा