शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

CoronaVirus News: कोरोनाच्या उसळीनंतरही वाढेना ‘वॉरिअर्स’च्या लसीकरणाचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 07:00 IST

यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही.

नागपूर : एकीकडे यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असताना दुसरीकडे कोरोना योद्ध्यांनीच लसीकरणाकडे कानाडोळा केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कोरोनाचा झपाट्याने फैलाव होणाऱ्या या जिल्ह्यांत कुठेही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. कोरोना योद्धेच जर लसीबाबत इतके उदासीन असतील, तर उद्या सामान्यांचा प्रतिसाद कसा असेल, असा प्रश्न उपस्थित होतो.

यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही. रविवारी आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेल्या अमरावतीत केवळ ५६ टक्के व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला. नागपुरात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद होता. पण, प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण वाढले. अकोल्यात तर पहिला टप्पा सुरूच आहे, वर्धेत ६४ टक्के असा थोडाफार समाधानकारक आकडा आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात केवळ १२ हजार ९१० जणांनाच लस देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना फोन करून लसीकरणासाठी बोलाविले जात आहे. पण तरी प्रतिसाद नाही. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त ५६.०१ टक्के लसीकरण झाले. दुसऱ्या टप्प्यात शनिवारपर्यंत २.९५ टक्के लोकांनी लस घेतली. अकोला जिल्ह्यात ११ हजार ८८५ लाभार्थींनी लस घेतली. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६२४ आहे. 

तांत्रिक दोष, अन्य व्यक्तींना लस व चोरीही

ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक दोष सध्याही येत आहेत. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी आता करता येत नाही.  अचलपूर येथे आरोग्य सेवेतील व्यक्तीच्या नावावर अन्य तीन व्यक्तींना लसीकरण केल्याची तक्रार झालेली आहे.  नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसोबतच नातेवाईक, मित्रांना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांना लस दिली. यातील काहींनी फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.   अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यातील चतारी आरोग्य केंद्रातून कोविड लसीचे ७ डोस चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात सुरूवातीच्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद असताना प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण होऊ लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ७१७ लक्ष्यापैकी १५ हजार ३१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.  वर्धा जिल्ह्यात पहिल्या फळीतील १६ हजार ५५ कोविड योद्ध्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार २५५ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

भंडारा जिल्ह्यात प्रथम टप्प्यात ६८२६ तर दुसरा टप्प्यात ९०१ आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८० टक्के कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण झाले आहे.  वाशिम जिल्ह्यात १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ११३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात ६४३ डोस देण्यात आले.

लस घेऊन कोरोना झाल्याने अल्प प्रतिसाद

लसीबाबत सुरुवातीपासूनच अनेक समज-गैरसमज आहेत. आरोग्य विभागातीलच अधिकारी, कर्मचारी स्वत:हून लसीकरणाला पुढे येण्यास तयार नव्हते. त्यातच लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झालेली अनेक रुग्ण निघत आहेत. त्यामुळे लसीवरचा विश्वासच उडत आहे. उलट ही लस घेतल्याने आपल्याला इतर त्रास होतो, असा गैरसमज कायम आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस