शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोनाच्या उसळीनंतरही वाढेना ‘वॉरिअर्स’च्या लसीकरणाचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 07:00 IST

यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही.

नागपूर : एकीकडे यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असताना दुसरीकडे कोरोना योद्ध्यांनीच लसीकरणाकडे कानाडोळा केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कोरोनाचा झपाट्याने फैलाव होणाऱ्या या जिल्ह्यांत कुठेही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. कोरोना योद्धेच जर लसीबाबत इतके उदासीन असतील, तर उद्या सामान्यांचा प्रतिसाद कसा असेल, असा प्रश्न उपस्थित होतो.

यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही. रविवारी आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेल्या अमरावतीत केवळ ५६ टक्के व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला. नागपुरात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद होता. पण, प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण वाढले. अकोल्यात तर पहिला टप्पा सुरूच आहे, वर्धेत ६४ टक्के असा थोडाफार समाधानकारक आकडा आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात केवळ १२ हजार ९१० जणांनाच लस देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना फोन करून लसीकरणासाठी बोलाविले जात आहे. पण तरी प्रतिसाद नाही. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त ५६.०१ टक्के लसीकरण झाले. दुसऱ्या टप्प्यात शनिवारपर्यंत २.९५ टक्के लोकांनी लस घेतली. अकोला जिल्ह्यात ११ हजार ८८५ लाभार्थींनी लस घेतली. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६२४ आहे. 

तांत्रिक दोष, अन्य व्यक्तींना लस व चोरीही

ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक दोष सध्याही येत आहेत. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी आता करता येत नाही.  अचलपूर येथे आरोग्य सेवेतील व्यक्तीच्या नावावर अन्य तीन व्यक्तींना लसीकरण केल्याची तक्रार झालेली आहे.  नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसोबतच नातेवाईक, मित्रांना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांना लस दिली. यातील काहींनी फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.   अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यातील चतारी आरोग्य केंद्रातून कोविड लसीचे ७ डोस चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात सुरूवातीच्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद असताना प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण होऊ लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ७१७ लक्ष्यापैकी १५ हजार ३१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.  वर्धा जिल्ह्यात पहिल्या फळीतील १६ हजार ५५ कोविड योद्ध्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार २५५ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

भंडारा जिल्ह्यात प्रथम टप्प्यात ६८२६ तर दुसरा टप्प्यात ९०१ आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८० टक्के कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण झाले आहे.  वाशिम जिल्ह्यात १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ११३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात ६४३ डोस देण्यात आले.

लस घेऊन कोरोना झाल्याने अल्प प्रतिसाद

लसीबाबत सुरुवातीपासूनच अनेक समज-गैरसमज आहेत. आरोग्य विभागातीलच अधिकारी, कर्मचारी स्वत:हून लसीकरणाला पुढे येण्यास तयार नव्हते. त्यातच लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झालेली अनेक रुग्ण निघत आहेत. त्यामुळे लसीवरचा विश्वासच उडत आहे. उलट ही लस घेतल्याने आपल्याला इतर त्रास होतो, असा गैरसमज कायम आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस