शहरं
Join us  
Trending Stories
1
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
2
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
3
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
4
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
5
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
6
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
7
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
8
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
9
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
10
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
11
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त
12
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
13
भारतीय रेल्वेने चीन, ब्रिटन, अमेरिका यासारख्या देशांनाही टाकलं मागे; कामगिरी पाहून कराल सलाम
14
सामना राजस्थानकडे झुकलेला, पण १३व्या षटकात विराटने एक इशारा केला आणि बाजी पलटली, नेमकं घडलं काय?  
15
ना लॉक इन पीरिअड, ना पेनल्टी; जोपर्यंत मन करेल FD मध्ये पैसे ठेवा, हवं असल्यास ATM मधून काढून घ्या
16
"आमचं त्यांच्यासोबत भांडण झालं होतं, त्यानंतर…’’, पहलगामध्ये हल्ला करणाऱ्या दहशतावाद्याचा फोटो काढणाऱ्या महिलेचा दावा
17
आधी रुग्णालयात अरेरावी करणारी 'मनीषा' रात्री तोंड लपवून आली; शेवटच्या भेटीचा सीन रीक्रिएट
18
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
19
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
20
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?

CoronaVirus News: कोरोनाच्या उसळीनंतरही वाढेना ‘वॉरिअर्स’च्या लसीकरणाचा वेग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2021 07:00 IST

यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही.

नागपूर : एकीकडे यवतमाळ, अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांत कोरोनाने पुन्हा उसळी घेतली असताना दुसरीकडे कोरोना योद्ध्यांनीच लसीकरणाकडे कानाडोळा केल्याचे धक्कादायक वास्तव आहे. कोरोनाचा झपाट्याने फैलाव होणाऱ्या या जिल्ह्यांत कुठेही शंभर टक्के लसीकरण झालेले नाही. कोरोना योद्धेच जर लसीबाबत इतके उदासीन असतील, तर उद्या सामान्यांचा प्रतिसाद कसा असेल, असा प्रश्न उपस्थित होतो.

यवतमाळात तर चाळीस टक्क्यांचाही टप्पा गाठता आलेला नाही. रविवारी आठ दिवसांचा लॉकडाऊन घोषित करण्यात आलेल्या अमरावतीत केवळ ५६ टक्के व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला. नागपुरात तर ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद होता. पण, प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण वाढले. अकोल्यात तर पहिला टप्पा सुरूच आहे, वर्धेत ६४ टक्के असा थोडाफार समाधानकारक आकडा आहे. 

यवतमाळ जिल्ह्यात केवळ १२ हजार ९१० जणांनाच लस देण्यात आली आहे. आरोग्य कर्मचाऱ्यांना फोन करून लसीकरणासाठी बोलाविले जात आहे. पण तरी प्रतिसाद नाही. अमरावती जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात फक्त ५६.०१ टक्के लसीकरण झाले. दुसऱ्या टप्प्यात शनिवारपर्यंत २.९५ टक्के लोकांनी लस घेतली. अकोला जिल्ह्यात ११ हजार ८८५ लाभार्थींनी लस घेतली. दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या केवळ ६२४ आहे. 

तांत्रिक दोष, अन्य व्यक्तींना लस व चोरीही

ऑनलाइन पोर्टलमध्ये तांत्रिक दोष सध्याही येत आहेत. ज्या आरोग्य कर्मचाऱ्यांची नोंदणी झालेली नाही त्यांची नोंदणी आता करता येत नाही.  अचलपूर येथे आरोग्य सेवेतील व्यक्तीच्या नावावर अन्य तीन व्यक्तींना लसीकरण केल्याची तक्रार झालेली आहे.  नागपुरातील काही खासगी हॉस्पिटलने आपल्या कर्मचाऱ्यांसोबतच नातेवाईक, मित्रांना हॉस्पिटलचे कर्मचारी दाखवून त्यांना लस दिली. यातील काहींनी फोटो सोशल मीडियावर अपलोड केल्यानंतर ही बाब उघडकीस आली.   अकोला जिल्ह्यात पातुर तालुक्यातील चतारी आरोग्य केंद्रातून कोविड लसीचे ७ डोस चोरीला गेल्याची घटना घडली होती. या प्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून, एकाला अटक करण्यात आली आहे.

नागपूर जिल्ह्यात सुरूवातीच्या टप्प्यात ५० टक्क्यांपेक्षाही कमी प्रतिसाद असताना प्रादुर्भाव वाढताच ८० ते ९० टक्क्यांवर लसीकरण होऊ लागले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत १९ हजार ७१७ लक्ष्यापैकी १५ हजार ३१८ लाभार्थ्यांना लस देण्यात आली.  वर्धा जिल्ह्यात पहिल्या फळीतील १६ हजार ५५ कोविड योद्ध्यांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येत कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर १ हजार २५५ व्यक्तींनी लसीचा दुसरा डोस घेतला आहे. 

भंडारा जिल्ह्यात प्रथम टप्प्यात ६८२६ तर दुसरा टप्प्यात ९०१ आरोग्य कर्मचारी यांना लस देण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यात ८० टक्के कर्मचाऱ्यांचे पहिल्या टप्प्यात लसीकरण झाले आहे.  वाशिम जिल्ह्यात १० हजार ५४१ कर्मचाऱ्यांपैकी ४ हजार १६७ जणांनी अद्याप लस घेतलेली नाही. गोंदिया जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ११३०० आरोग्य कर्मचाऱ्यांना तर दुसऱ्या टप्प्यात ६४३ डोस देण्यात आले.

लस घेऊन कोरोना झाल्याने अल्प प्रतिसाद

लसीबाबत सुरुवातीपासूनच अनेक समज-गैरसमज आहेत. आरोग्य विभागातीलच अधिकारी, कर्मचारी स्वत:हून लसीकरणाला पुढे येण्यास तयार नव्हते. त्यातच लस घेतल्यानंतरही कोरोनाची लागण झालेली अनेक रुग्ण निघत आहेत. त्यामुळे लसीवरचा विश्वासच उडत आहे. उलट ही लस घेतल्याने आपल्याला इतर त्रास होतो, असा गैरसमज कायम आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस