शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil ...तर आपल्याला सत्तेत जावं लागेल; जातीवादावरून मनोज जरांगे पाटलांचं मोठं विधान
2
KKR चे विजेतेपद ठरणार गौतम गंभीरच्या टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्याचा मार्गातील अडथळा!
3
"ससून रुग्णालय आहे की गुन्हेगारांना वाचवणारा अड्डा?"; ललित पाटीलचा उल्लेख करत काँग्रेसचा सवाल
4
मुनव्वर फारुकीने केला दुसरा निकाह? सोशल मीडियावर चर्चांना उधाण; दुसरी पत्नी कोण?
5
पापुआ न्यू गिनीत भूस्खलनाने हाहाकार; 2000 लोक जिवंत जमिनीखाली गाडली गेली...
6
हृदयद्रावक! एक आठवड्यापूर्वीच झालेलं लग्न; राजकोट गेमिंग झोन आगीत पती-पत्नीचा मृत्यू
7
भाजपला आताच सांगा...! लोकसभेच्या निकालापूर्वीच भुजबळांनी विधानसभेच्या जागावाटपाची ठिणगी टाकली
8
“यूपीत एनडीएला ७५ प्लस जागा मिळतील, महाराष्ट्रात...”; रामदास आठवलेंनी थेट आकडा सांगितला
9
राहुल गांधी-अखिलेश यादव यांच्या पक्षाला किती जागा मिळतील? अमित शाहंनी केली भविष्यवाणी
10
सेम टू सेम! जुळ्या भावांचे यशही जुळं; सार्थक अन् स्वप्नीलने दहावीत मिळविले १०० टक्के गुण
11
इमरान हाश्मी नव्हता 'मर्डर'साठी पहिली पसंती, या अभिनेत्याची झाली होती निवड
12
१९९१ साली जे घडलं ते पुन्हा नको म्हणून २००४ ला CM पद नाकारलं; अजित पवारांचा दावा
13
पाकिस्तानचे पुन्हा एकदा दोन तुकडे होतील; माजी PM इम्रान खान यांनी व्यक्त केली चिंता
14
SRH च्या पराभवानंतर काव्या मारन रडली; आता संघातील 'या' खेळाडूंची होणार गच्छंती...
15
Sensex पहिल्यांदाच ७६ हजार पार, निफ्टीनंही रचला इतिहास; निवडणूक निकालांपूर्वी VIX ५% वाढला
16
"कितीही मोठी किंमत मोजावी लागली तरी..."; मनु्स्मृतीबाबत बोलताना अजित पवारांचे मोठं विधान
17
Gold-Silver Price Today : सोन्या-चांदीच्या दरानं वाढवली सराफा बाजारातली गरमी, घसरणीनंतर पुन्हा वाढले दर
18
भारतात पहिल्यांदाच आले सर्वात मोठे जहाज; चार फुटबॉलचे मैदान होतील एवढी आहे जागा
19
"स्वाती मालीवाल जबरदस्तीने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानात घुसल्या", विभव कुमारांच्या वकिलाचा न्यायालयात युक्तिवाद! 
20
Anurag Thakur : "काँग्रेसचं पाकिस्तानवर प्रेम, भारताच्या भागाला PoK बनवलं"; अनुराग ठाकूर कडाडले

नागपूर जिल्ह्यात पाऊस थांबला, पुराचा धोका कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2020 10:13 AM

संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संततधार पाऊस आणि पेंच (ता. पारशिवनी) व तोतलाडोह (ता. रामटेक) या जलाशयांसोबतच चौराई (मध्य प्रदेश) धरणातील पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असल्याने, पेंच आणि कन्हान नदीला आलेला पूर कायम आहे.पुराचे पाणी सखल भागासह गावांमध्ये शिरल्याने एनडीआरएफ (नॅशनल डिझास्टर रिस्पॉण्ड फोर्स), एसडीआरएफ (स्टेट डिझास्टर रिस्पॉण्ड फंड) आणि सैन्याच्या जवानांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा,कामठी, पारशिवनी आणि कुही या चार तालुक्यांमधील या दोन्ही नदीकाठच्या ४८ गावांमधील ४५४७ कुटुंबातील २६,४९० नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविले आहे. या पुरात हजारो लोक पाण्यात अडकले आहेत.इकडे रविवारी पावसाने उसंत घेतली असली तरी जिल्ह्याला पुराचा धोका कायम आहे. 

पूरग्रस्तांना हेलिकॉप्टरने फूड पॅकेट्स पुरविलेपूरग्रस्त भागात जिल्हा प्रशासनातर्फे मदत कार्य सुरू आहे. एसडीआरएफ, एनडीआरएफ, एनएमसी, तसेच स्थानिक शोध बचाव पथक यांची सेवा घेण्यात आली आहे. यांच्या मदतीने आतापर्यंत चार तालुक्यातील २६,४९० लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. मदत कार्य अजूनही सुरूच आहे. रविवारी पारशिवनी तालुक्यातील सिंगारदीप या गावाात ७५० फूड पॅकेट व पाण्याची बॉटल हेलिकॉप्टरमधून जवळपास २५० पूरग्रस्तांना पुरवण्यात आली. कुही तालुक्यात एनडीआरएफ, व एसडीआरएफच्या पथकासह आर्मीचेही पथक तैनात आहेत.

एनडीआरएफच्या टीम दाखलबचावकार्याला वेग देण्यासाठी पुणे येथून एनडीआरएफच्या चार टीम जिल्ह्यात दाखल झाल्या आहेत. या पथकांनी टेकेपार येथे एनडीआरएफ तर चिचघाट, चिकना, सोनेगाव येथे एसडीआरएफच्या जवानांनी बचावकार्य केले. चिचघाट येथे सैन्याच्या जवानांची मदत घेण्यात आली होती, अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आली आहे. 

टॅग्स :floodपूर