शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
2
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
3
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
4
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
5
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
6
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
7
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
8
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
9
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
10
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
11
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
12
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
13
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
14
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
15
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

पाऊस खेळतोय लपाछपी, पेरण्या गेल्यात लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 07:45 IST

Nagpur News निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.

ठळक मुद्देमहागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी?

अभय लांजेवार

नागपूर : मृग नक्षत्र कोरडा गेला. हवामान खात्याचा अंदाजसुद्धा चुकला. दुसरीकडे अद्यापही पाऊस लपाछपीचा खेळच खेळतोय. कधी कडाक्याची ऊन, कधी काळ्याकुट्ट आभाळाची छाया तर मध्येच १०-१५ मिनिटांच्या पावसाच्या सरी. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.

बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी पेचात अडकले आहेत. पेरणी केली आणि पावसाने वाकोल्या दाखविल्या तर मग कसे होणार, महागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी? असा सवाल शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

उमरेड तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ४५,५०० हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये सर्वाधिक कपाशी २१,४०० हेक्टर क्षेत्रात तर सोयाबीनचे क्षेत्र १६,९०० हेक्टर आहे. अन्य पिकांमध्ये भात, तूर आदी पिकांचा समावेश आहे. पेरणीबाबतचा अंदाज घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांच्याशी चर्चा केली असता, सध्या तालुक्यात ५० टक्के कपाशीची लागवड झाली असून, ३० टक्क्यांच्या आसपास शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उरकविली असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही त्या म्हणाल्या. कपाशी लागवडीसाठी फारशी अडचण उद्भवत नसली तरी पावसाने अचानकपणे दांडी मारल्यास सोयाबीन पेरणीवर त्याचा प्रभाव नक्कीच पडणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे दिवसागणिक सोयाबीनची पेरणी लांबल्यास उत्पादनावरसुद्धा फटका बसणार आहे. दुसरीकडे पेरणी झाली आणि पावसाने दडी मारली तरीसुद्धा नुकसानीला सामोरे जावे लागेल. या हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी दुहेरी चक्रव्यूहात सापडले आहेत.

पाऊस कमीच !

उमरेड तालुक्यात एकूण सात सर्कल आहेत. यामध्ये २३ जूनपर्यंत उमरेड सर्कलमध्ये ८२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हेवती सर्कल (६९.६ मिलिमीटर), पाचगाव (५१.२), मकरधोकडा (४६.९), सिर्सी (४६.४) आणि सर्वात कमी बेला सर्कलला केवळ २६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डव्हा सर्कलमध्ये पर्जन्यमापक यंत्राची सुविधा नाही. यामुळे या परिसरात किती पाऊस झाला, याची नोंद होत नाही. पर्जन्यमापक यंत्र प्रस्तावित असल्याची माहिती आहे. तालुक्यात साधारणत: १८ जूनपासून (२१.९६ मिलिमीटर) पाऊस सुरू झाल्याचे दिसून येते. तालुक्याची सरासरी काढली असता २३ जूनपर्यंत केवळ ५४.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

मागील वर्षीचा पाऊस

मागील हंगामात ११ जूनपासून पावसाचा जोर सुरू झाला. सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली. यामुळे सोयाबीनची पेरणी आणि कापसाची लागवड सुनियोजित झाली. मागीलवर्षी २३ जूनपर्यंत १९९.३५ मिलिमीटर असा समाधानकारक पाऊस झाला होता.

टॅग्स :agricultureशेती