शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
2
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
3
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
4
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
5
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
6
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
7
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
8
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
9
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
10
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
11
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
12
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
13
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
14
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
15
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
16
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
17
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
18
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
19
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
20
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती

पाऊस खेळतोय लपाछपी, पेरण्या गेल्यात लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 07:45 IST

Nagpur News निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.

ठळक मुद्देमहागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी?

अभय लांजेवार

नागपूर : मृग नक्षत्र कोरडा गेला. हवामान खात्याचा अंदाजसुद्धा चुकला. दुसरीकडे अद्यापही पाऊस लपाछपीचा खेळच खेळतोय. कधी कडाक्याची ऊन, कधी काळ्याकुट्ट आभाळाची छाया तर मध्येच १०-१५ मिनिटांच्या पावसाच्या सरी. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.

बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी पेचात अडकले आहेत. पेरणी केली आणि पावसाने वाकोल्या दाखविल्या तर मग कसे होणार, महागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी? असा सवाल शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

उमरेड तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ४५,५०० हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये सर्वाधिक कपाशी २१,४०० हेक्टर क्षेत्रात तर सोयाबीनचे क्षेत्र १६,९०० हेक्टर आहे. अन्य पिकांमध्ये भात, तूर आदी पिकांचा समावेश आहे. पेरणीबाबतचा अंदाज घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांच्याशी चर्चा केली असता, सध्या तालुक्यात ५० टक्के कपाशीची लागवड झाली असून, ३० टक्क्यांच्या आसपास शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उरकविली असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही त्या म्हणाल्या. कपाशी लागवडीसाठी फारशी अडचण उद्भवत नसली तरी पावसाने अचानकपणे दांडी मारल्यास सोयाबीन पेरणीवर त्याचा प्रभाव नक्कीच पडणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे दिवसागणिक सोयाबीनची पेरणी लांबल्यास उत्पादनावरसुद्धा फटका बसणार आहे. दुसरीकडे पेरणी झाली आणि पावसाने दडी मारली तरीसुद्धा नुकसानीला सामोरे जावे लागेल. या हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी दुहेरी चक्रव्यूहात सापडले आहेत.

पाऊस कमीच !

उमरेड तालुक्यात एकूण सात सर्कल आहेत. यामध्ये २३ जूनपर्यंत उमरेड सर्कलमध्ये ८२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हेवती सर्कल (६९.६ मिलिमीटर), पाचगाव (५१.२), मकरधोकडा (४६.९), सिर्सी (४६.४) आणि सर्वात कमी बेला सर्कलला केवळ २६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डव्हा सर्कलमध्ये पर्जन्यमापक यंत्राची सुविधा नाही. यामुळे या परिसरात किती पाऊस झाला, याची नोंद होत नाही. पर्जन्यमापक यंत्र प्रस्तावित असल्याची माहिती आहे. तालुक्यात साधारणत: १८ जूनपासून (२१.९६ मिलिमीटर) पाऊस सुरू झाल्याचे दिसून येते. तालुक्याची सरासरी काढली असता २३ जूनपर्यंत केवळ ५४.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

मागील वर्षीचा पाऊस

मागील हंगामात ११ जूनपासून पावसाचा जोर सुरू झाला. सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली. यामुळे सोयाबीनची पेरणी आणि कापसाची लागवड सुनियोजित झाली. मागीलवर्षी २३ जूनपर्यंत १९९.३५ मिलिमीटर असा समाधानकारक पाऊस झाला होता.

टॅग्स :agricultureशेती