शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ताधारी, निवडणूक आयोगाने देशाला फसवले; संपूर्ण निवडणूक प्रणालीची झाली चोरी; राहुल गांधी यांचा आरोप
2
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
3
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
4
अमेरिकेत महागाईचा भडका; टॅरिफमुळे भारतीय वस्तूंवर लावलेले ५०% आयात शुल्क ग्राहकांना भोवणार
5
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
6
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
7
गजलक्ष्मी सौभाग्य योगात रक्षाबंधन: ५ मूलांक लकी, बंपर कमाई; प्रसन्न होईल लक्ष्मी, शुभच घडेल!
8
रक्षाबंधन २०२५: गणपती, स्वामींना राखी नक्की बांधा; सदैव रक्षण-कृपा, कायम सोबत असतील स्वामी!
9
उत्तरकाशीच्या धरालीत १००हून अधिक लोक बेपत्ता; ४०० जणांना वाचवले, ३०० यात्रेकरू सुरक्षित
10
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
11
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
12
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
13
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
14
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
15
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
16
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
17
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
18
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
19
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
20
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...

पाऊस खेळतोय लपाछपी, पेरण्या गेल्यात लांबणीवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2022 07:45 IST

Nagpur News निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.

ठळक मुद्देमहागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी?

अभय लांजेवार

नागपूर : मृग नक्षत्र कोरडा गेला. हवामान खात्याचा अंदाजसुद्धा चुकला. दुसरीकडे अद्यापही पाऊस लपाछपीचा खेळच खेळतोय. कधी कडाक्याची ऊन, कधी काळ्याकुट्ट आभाळाची छाया तर मध्येच १०-१५ मिनिटांच्या पावसाच्या सरी. निसर्गाच्या या लहरीपणाचा फटका खरीप हंगामाच्या अगदी प्रारंभापासूनच बसत आहे. यामुळे पेरण्यासुद्धा लांबणीवर गेल्या आहेत.

बी-बियाणे आणि रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतकरी पेचात अडकले आहेत. पेरणी केली आणि पावसाने वाकोल्या दाखविल्या तर मग कसे होणार, महागडी बियाण्यांची ‘रिस्क’ घेणार तरी कशी? असा सवाल शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे.

उमरेड तालुक्यात खरिपाचे एकूण क्षेत्र ४५,५०० हेक्टरच्या आसपास आहे. यामध्ये सर्वाधिक कपाशी २१,४०० हेक्टर क्षेत्रात तर सोयाबीनचे क्षेत्र १६,९०० हेक्टर आहे. अन्य पिकांमध्ये भात, तूर आदी पिकांचा समावेश आहे. पेरणीबाबतचा अंदाज घेण्यासाठी तालुका कृषी अधिकारी सोनाली गजबे यांच्याशी चर्चा केली असता, सध्या तालुक्यात ५० टक्के कपाशीची लागवड झाली असून, ३० टक्क्यांच्या आसपास शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी उरकविली असल्याचे त्यांनी सांगितले.

पावसाचा अंदाज घेऊनच शेतकऱ्यांनी पेरणी करावी, असेही त्या म्हणाल्या. कपाशी लागवडीसाठी फारशी अडचण उद्भवत नसली तरी पावसाने अचानकपणे दांडी मारल्यास सोयाबीन पेरणीवर त्याचा प्रभाव नक्कीच पडणार असल्याचे चित्र आहे. एकीकडे दिवसागणिक सोयाबीनची पेरणी लांबल्यास उत्पादनावरसुद्धा फटका बसणार आहे. दुसरीकडे पेरणी झाली आणि पावसाने दडी मारली तरीसुद्धा नुकसानीला सामोरे जावे लागेल. या हंगामाच्या प्रारंभापासूनच शेतकरी दुहेरी चक्रव्यूहात सापडले आहेत.

पाऊस कमीच !

उमरेड तालुक्यात एकूण सात सर्कल आहेत. यामध्ये २३ जूनपर्यंत उमरेड सर्कलमध्ये ८२.२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यापाठोपाठ हेवती सर्कल (६९.६ मिलिमीटर), पाचगाव (५१.२), मकरधोकडा (४६.९), सिर्सी (४६.४) आणि सर्वात कमी बेला सर्कलला केवळ २६.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. डव्हा सर्कलमध्ये पर्जन्यमापक यंत्राची सुविधा नाही. यामुळे या परिसरात किती पाऊस झाला, याची नोंद होत नाही. पर्जन्यमापक यंत्र प्रस्तावित असल्याची माहिती आहे. तालुक्यात साधारणत: १८ जूनपासून (२१.९६ मिलिमीटर) पाऊस सुरू झाल्याचे दिसून येते. तालुक्याची सरासरी काढली असता २३ जूनपर्यंत केवळ ५४.३३ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

मागील वर्षीचा पाऊस

मागील हंगामात ११ जूनपासून पावसाचा जोर सुरू झाला. सुरुवातीला पावसाने चांगली साथ दिली. यामुळे सोयाबीनची पेरणी आणि कापसाची लागवड सुनियोजित झाली. मागीलवर्षी २३ जूनपर्यंत १९९.३५ मिलिमीटर असा समाधानकारक पाऊस झाला होता.

टॅग्स :agricultureशेती