शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

रेल्वे मंत्र्यांचा दोन महिन्यात दुसऱ्यांदा टळला रेल्वेस्थानकाचा दाैरा, थेट निघाले दिल्लीला; तर्कवितर्काला उधाण

By नरेश डोंगरे | Updated: November 26, 2024 22:20 IST

दोन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा नागपूर स्थानकावरचा दाैरा, कार्यक्रम रद्द झाल्याने विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. या संबंधाने वारंवार संपर्क करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही...

 

नागपूर : केंद्रीय रेल्वे मंत्र्यांचा नागपूर दाैऱ्याचा कार्यक्रम निश्चित होतो. प्रशासन तयारीला लागते. उणिवा, त्रुट्या राहू नये म्हणून झाकझूक करण्यात येते. विविध ठिकाणी चकाकी अन् झळाळी देण्यासाठी लाखो रुपये खर्च होतात. मात्र, काय होते कळायला मार्ग नाही. रेल्वे मंत्र्याचा दाैरा ऐनवेळी रद्द होतो. गेल्या दोन महिन्यात दुसऱ्यांदा हा प्रकार घडला आहे. हाईट म्हणजे, यावेळी रेल्वे मंत्री नागपुरात आले, येथे त्यांनी एका कार्यक्रमाला संबोधितही केले. मात्र, हाकेच्या अंतरावर असलेल्या मुख्य रेल्वे स्थानकावर जाण्याऐवजी ते विमानतळाकडे निघाले. त्यामुळे नेमक्या वेळी असे का झाले, असा प्रश्न आता चर्चेला आला आहे.रेल्वे मंत्र्यांच्या कार्यालयातून २२ नोव्हेंबरला अधिकृत दाैरा पत्रक आले. त्यानुसार, ते २४ नोव्हेंबरच्या रात्री दिल्लीहून नागपूरला पोहचतील. येथे मुक्काम करतील. २५ नोव्हेंबरला अजनीतील कार्यक्रम आणि नंतर नागपूर रेल्वे स्थानकावर येतील. येथील कार्यक्रमानंतर ते रायपूरला (छत्तीसगड) जातील आणि तेथून ते दिल्लीला पोहचतील, असे त्यात नमूद होते. मात्र, २४ ला रात्री आलेल्या दाैरा कार्यक्रमात ते २५ नोव्हेंबरला सकाळी ९.१५ वाजता नागपुरात येतील आणि येथील कार्यक्रम आटोपून विशेष विमानाने दिल्लीला रवाना होतील, असे नमूद होते. अर्थात, अजनी स्टेडिअममधील अधिवेशनाला संबोधित करणारे रेल्वे मंत्री तेथून पाच मिनिटांसाठी का होईना रेल्वेस्थानकावर येऊन प्रवासी अॅपचे उद्घाटन करतील, असा अंदाज होता. त्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात आली होती. मात्र, रेल्वे मंत्र्यांनी अजनीतील अधिवेशनाचा कार्यक्रम झाल्यानंतर रेल्वे स्थानकाऐवजी विमानतळाकडे जाणे पसंत केले. अर्थात रेल्वे स्थानकावरील कार्यक्रम नंतर मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक धर्मवीर मिना यांनी आटोपला. यापूर्वी विजयादशमीच्या दिवशी ते येथे येणार म्हणून जाहिर झाले होते. मात्र, त्याहीवेळी त्यांचा येथील कार्यक्रम ऐनवेळी रद्द झाला होता. दोन महिन्यात दुसऱ्यांदा रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचा नागपूर स्थानकावरचा दाैरा, कार्यक्रम रद्द झाल्याने विविध प्रकारची चर्चा सुरू झाली आहे. या संबंधाने वारंवार संपर्क करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यावर प्रतिक्रिया मिळू शकली नाही.पंतप्रधानांनी दाखवली होती हिरवी झेंडीविशेष म्हणजे, देशाच्या सर्व दिशांना जोडणारे रेल्वे स्थानक म्हणून आणि दहशतवादी संघटनांच्या टार्गेटवर असल्याने एक संवेदनशिल स्थानक म्हणून रेल्वे मंत्रालयाच्या नकाशावर नागपूर रेल्वे स्थानकाचे नाव आहे. मध्य नागपूर आणि दक्षिण पूर्व मध्य नागपूर असे दोन रेल्वेचे विभागीय मुख्यालयंदेखिल नागपुरात आहे. ब्रिटीश राजवटीपासून तो स्वातंत्र्य मिळाल्यापासून नागपूर रेल्वेे स्थानकावर अनेक महनीय व्यक्ती आलेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याच रेल्वे स्थानकावरून नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवी झेंडी दाखवली होती. 

टॅग्स :Ashwini Vaishnawअश्विनी वैष्णवrailwayरेल्वे