शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
2
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
3
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
4
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
5
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
6
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
7
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
8
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
9
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
10
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
11
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
12
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
13
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
14
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
15
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
16
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
17
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
18
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
19
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
20
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
Daily Top 2Weekly Top 5

संघभूमीत राहुल गांधी आखणार रणनीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2015 02:39 IST

भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करीत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी ...

नागपूर : भूमी अधिग्रहण विधेयकाला विरोध करीत संकटग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधण्यासाठी अ.भा. काँग्रेस समितीचे उपाध्यक्ष राहुल गांधी हे ३० एप्रिल रोजी अमरावती जिल्ह्यात ‘किसान पदयात्रा’ काढत आहेत. यासाठी बुधवारी, २९ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता दिल्लीहून विमानाने त्यांचे नागपुरात आगमन होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात राज्य व विदर्भातील निवडक नेत्यांशी रविभवनात रात्री चर्चा करून ते रणनीती आखणार आहेत. दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांना विदर्भानेच बळ दिले होते. आता लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी तीच ऊर्जा मिळविण्यासाठी विदर्भात येत असल्याची चर्चा आहे. निवडणुकीपूर्वी राहुल गांधी यांनी सुराबर्डी येथे विदर्भातील पदाधिकाऱ्यांशी जिल्हानिहाय चर्चा केली होती. ही भेट पदाधिकाऱ्यांपुरती मर्यादित होती. आता ते थेट शेतकऱ्यांच्या भेटीला येत आहेत. नागपूर मुक्कामी त्यांच्याकडे कमी वेळ आहे. ३० एप्रिल रोजी ते पहाटेच अमरावती जिल्ह्यातील गुंजी या गावासाठी रवाना होतील. त्यामुळे कमी वेळात राहुल गांधी यांच्यापुढे विदर्भातील चित्र मांडण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. महाराष्ट्र प्रभारी मोहन प्रकाश, प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण हे दुपारी १२ वाजता नागपुरात दाखल होत आहेत. दोन्ही नेते विदर्भातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन ‘किसान पदयात्रा’ यशस्वी करण्यासाठी सूचना देतील. रविभवनात विदर्भातील प्रमुख व निवडक नेत्यांनाच प्रवेश दिला जाणार असून संबंधित नेत्यांशी राहुल गांधी हे चर्चा करतील. (प्रतिनिधी)