शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

'क्वारंटाईन'केंद्र की 'पिकनिक'चे स्थळ? : 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:09 IST

लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे.

ठळक मुद्दे संशयितांचे राहणे, खाणे सोबतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’वर अद्यापही लस किंवा औषध निघाले नसल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच प्रभावी उपाय मानण्यात येत आहे. विशेषत: ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्यांनी तर याचे पालन करणे अनिवार्यच आहे. परंतु लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे. एकमेकांच्या थाळ्यांमध्ये जेवण करणे, गच्चीवर एकत्रित येऊन गप्पा हाकणे असे प्रकार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे प्रकार सुरू असूनदेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे ‘क्वारंटाईन’ केंद्र आहे की सहलीचे ठिकाण, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.लोणारा येथील एका महाविद्यालयात ‘क्वारंटाईन’ केंद्र स्थापित करण्यात आले आहे. येथे एकूण ११६ संशयित ठेवण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. येथील बºयाच लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’देखील निघाली. ‘कोरोना’चा संसर्ग लवकर होतो, हे माहिती असूनदेखील हे सर्व लोक एकत्रितच राहत आहेत. सायंकाळच्या सुमारास तर बहुतांश जण इमारतीच्या गच्चीवर एकत्रित येतात व गप्पांचा फड रंगतो. याशिवाय अनेक जण सोबतच बसून जेवण करत आहेत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीला लागण झालेली नाही, त्यालादेखील संसर्ग होण्याचा धोका आहे.सोमवारी या केंद्रातून ७० हून अधिक जणांना सोडण्यात आले. तर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्यांना उपचारासाठी नेण्यात आले. तर दोन आणखी केंद्रात लोक दाखल झाले. सद्यस्थितीत येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेले ३९ लोक आहेत.गंभीर कधी होणार?शहरात ‘कोरोना’बाधितांची संख्या शंभरच्या जवळ पोहोचली आहे. अशा स्थितीत ‘क्वारंटाईन’ असलेल्यांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु लोणारा येथील केंद्रातील प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. प्रशासन यासंदर्भात गंभीर कधी होणार तसेच लोकदेखील स्वत:ची जबाबदारी कधी ओळखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्मचारीदेखील धोक्यातलोणारा येथील केंद्रावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरविण्यात आलेली नाही. इतर ‘क्वॉरंटाईन’ केंद्रात रात्रपाळीत असलेल्यांसाठी झोपण्यासाठी सोय आहे. लोणाऱ्यात तीदेखील सोय नाही. त्यामुळे नाईलाजाने उघड्यावर झोपावे लागत आहे. शिवाय अर्ज भरुन घेण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अस्थमा व ह्रद्यविकाराची समस्या आहे. मात्र तरीदेखील त्यांनाच सर्वांना सामोरे जावे लागत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर