शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
4
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
5
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
6
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
7
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
8
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
9
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
10
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
11
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
12
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
13
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
14
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
15
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
16
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
17
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
18
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
19
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
20
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
Daily Top 2Weekly Top 5

'क्वारंटाईन'केंद्र की 'पिकनिक'चे स्थळ? : 'सोशल डिस्टन्सिंग'चा फज्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2020 21:09 IST

लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे.

ठळक मुद्दे संशयितांचे राहणे, खाणे सोबतच

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’वर अद्यापही लस किंवा औषध निघाले नसल्याने ‘सोशल डिस्टन्सिंग’ हाच प्रभावी उपाय मानण्यात येत आहे. विशेषत: ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेल्यांनी तर याचे पालन करणे अनिवार्यच आहे. परंतु लोणारा येथील ‘क्वारंटाईन’ केंद्रात ‘सोशल डिस्टन्सिंग’चा पूर्णत: फज्जा उडाल्याचे चित्र आहे. येथे असलेल्या सर्व संशयितांचे राहणे, खाणे सर्व सोबतच होत आहे. एकमेकांच्या थाळ्यांमध्ये जेवण करणे, गच्चीवर एकत्रित येऊन गप्पा हाकणे असे प्रकार सुरू असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. प्रशासनाच्या डोळ्यादेखत हे प्रकार सुरू असूनदेखील कुठलीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे हे ‘क्वारंटाईन’ केंद्र आहे की सहलीचे ठिकाण, असाच प्रश्न उपस्थित होत आहे.लोणारा येथील एका महाविद्यालयात ‘क्वारंटाईन’ केंद्र स्थापित करण्यात आले आहे. येथे एकूण ११६ संशयित ठेवण्यात आले होते. पहिल्या व दुसऱ्या माळ्यावरील सभागृहात त्यांच्या राहण्याची सोय करण्यात आली. येथील बºयाच लोकांची चाचणी ‘पॉझिटिव्ह’देखील निघाली. ‘कोरोना’चा संसर्ग लवकर होतो, हे माहिती असूनदेखील हे सर्व लोक एकत्रितच राहत आहेत. सायंकाळच्या सुमारास तर बहुतांश जण इमारतीच्या गच्चीवर एकत्रित येतात व गप्पांचा फड रंगतो. याशिवाय अनेक जण सोबतच बसून जेवण करत आहेत. अशा स्थितीत ज्या व्यक्तीला लागण झालेली नाही, त्यालादेखील संसर्ग होण्याचा धोका आहे.सोमवारी या केंद्रातून ७० हून अधिक जणांना सोडण्यात आले. तर ‘पॉझिटिव्ह’ आलेल्यांना उपचारासाठी नेण्यात आले. तर दोन आणखी केंद्रात लोक दाखल झाले. सद्यस्थितीत येथे ‘क्वारंटाईन’ करण्यात आलेले ३९ लोक आहेत.गंभीर कधी होणार?शहरात ‘कोरोना’बाधितांची संख्या शंभरच्या जवळ पोहोचली आहे. अशा स्थितीत ‘क्वारंटाईन’ असलेल्यांनी जास्त काळजी घेण्याची आवश्यकता आहे. परंतु लोणारा येथील केंद्रातील प्रकार अनेक प्रश्न उपस्थित करणारा आहे. प्रशासन यासंदर्भात गंभीर कधी होणार तसेच लोकदेखील स्वत:ची जबाबदारी कधी ओळखणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.कर्मचारीदेखील धोक्यातलोणारा येथील केंद्रावर कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुरक्षेची साधने पुरविण्यात आलेली नाही. इतर ‘क्वॉरंटाईन’ केंद्रात रात्रपाळीत असलेल्यांसाठी झोपण्यासाठी सोय आहे. लोणाऱ्यात तीदेखील सोय नाही. त्यामुळे नाईलाजाने उघड्यावर झोपावे लागत आहे. शिवाय अर्ज भरुन घेण्याचे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अस्थमा व ह्रद्यविकाराची समस्या आहे. मात्र तरीदेखील त्यांनाच सर्वांना सामोरे जावे लागत आहे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर