शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
3
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
4
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
5
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
6
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
7
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
8
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
9
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
10
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
11
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
12
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
13
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
14
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
15
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
16
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
17
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप
18
Uddhav Thackeray: निवडणूक आयोग हे राष्ट्रपतींपेक्षाही मोठे झाले का? उद्धव ठाकरेंचा कडवट सवाल!
19
दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा, बंदुकीच्या धाकावर हिसकावू लागला पैसे, पण कर्मचाऱ्यांनी हिंमत दाखवली आणि...  
20
राहुल गांधींविरोधात वक्तव्य भोवले; काँग्रेसच्या मंत्र्याला द्यावा लागला राजीनामा, नेमकं काय म्हणाले?

स्वच्छ हवा योजनेसाठी जनसहभाग महत्त्वाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 01:22 IST

महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केले.

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महाराष्ट्रातील प्रदूषित शहरांपैकी एक असलेल्या नागपूर शहराच्या स्वच्छ हवा कृती योजनेच्या प्रभावी व पारदर्शक अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र प्रदूषण मंडळ, महानगरपालिका यांसोबत शहरामध्ये वायू प्रदूषणावर काम करणाऱ्या संस्था आणि नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असल्याचे मत या क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्थांनी व्यक्त केले.कोरोनानंतर शहरातील ‘हवेचा दर्जा सुधारण्यासाठीच्या कृती आराखड्याची निश्चिती’ या विषयावर नुकतेच ऑनलाईन परिषदेचे आयोजन करण्यात आले. सेंटर फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेण्ट (सीएफएसडी) आणि वातावरण फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परिषदेत अनेक मान्यवर तज्ज्ञांचा सहभाग होता. यामध्ये नीरीचे संचालक डॉ. राकेश कुमार, प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक अधिकारी हेमा देशपांडे, व्हीएनआयटीच्या स्थापत्यशास्त्र व नगर नियोजन विभागाचे सहायक प्रा. समीर देशकर, विदर्भ पर्यावरण कृती समितीचे संयोजक सुधीर पालिवाल, सीएफएसडीच्या संचालिका लीना बुद्धे, सीईईडब्ल्यूच्या प्रोग्राम असोसिएट तनुश्री गांगुली, वातावरण फाऊंडेशनचे संस्थापक भगवान केसभट आदींचा सहभाग होता. यावेळी मंडळाच्या वेबसाईटवरील १०२ शहरांच्या स्वच्छ हवा कृती आराखड्याचे विश्लेषण करण्यात आले. लीना बुद्धे यांनी लोकांना जागरूक ठेवून प्रदूषणमुक्त शहराच्या अंमलबजावणीसाठी त्यांनाच सहभागी करून घेण्याचे आवाहन केले. शिवाय महापौर आणि लोकप्रतिनिधींनाही कृती समितीचे सदस्य बनविल्यास जबाबदारी निश्चित होईल, असेही त्या म्हणाल्या. सुधीर पालिवाल यांनी या मागणीला दुजोरा देत लोकांसाठी योजना राबविताना लोकांचाच विचार केला जात नसल्याची खंत व्यक्त केली.परिषदेदरम्यान आंतरविभागीय आणि आंतरराज्यीय समन्वय प्रणालीसोबतच वातावरणीय आणि तत्कालीन प्रदूषणाची एकात्मिक शहरनिहाय माहिती उपलब्ध करणे आणि पायाभूत सार्वजनिक वाहतुकीची व्यवस्था उभी करण्याच्या सूचना करण्यात आल्या. शहरनिहाय लक्ष्य ठरवावे आणि त्यातील प्रत्येक कृती धोरणाचा स्वतंत्र आर्थिक गरजांनुसार विचार केला जावा. डॉ. राकेश कुमार म्हणाले, कोविड लॉकडाऊन काळात अनेक नव्या गोष्टी आपण कशा शिकलो, हवेतील प्रदूषणाशी दोन हात करण्यासाठी सामान्य लोकांचा सहभागही महत्त्वाचा असल्याचे त्यांनी सांगितले. हेमा देशपांडे यांनी, लॉकडाऊन काळात शहरातील प्रदूषणात कमालीची घट झाल्याचा उल्लेख करीत यानुसार धोरण ठरवावे लागेल, अशी भावना व्यक्त केली. समीर देशकर यांनी प्रदूषणमुक्त वाहतुकीला चालना महत्त्वाची असून त्यासाठी सार्वजनिक वाहतूक सुदृढ व प्रभावी करण्याचे मत व्यक्त केले.

टॅग्स :pollutionप्रदूषणnagpurनागपूर