शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
2
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
3
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
4
रोहितसह दुखापतीमुळे शतकवीरही OUT! MI कडून ओपनिंगचा नवा प्रयोग, मोठ्या बदलांसह मैदानात उतरला संघ
5
पश्चिम बंगाल निवडणुकीत मोठा राडा, ईव्हीएमवरील भाजपच्या बटणावर 'टेप'! मतदान थांबलं, आयोगाकडून फेरमतदानाचे संकेत
6
भोंदू अशोक खरातला सातव्या गुन्ह्यात न्यायालयीन कोठडी; आठव्या गुन्ह्यात SIT ने घेतला ताबा
7
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
8
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
9
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
10
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
11
कितीही वाढूद्या, आम्ही खरेदी करणार...! १,५०,००० पार असूनही भारतात सोन्याची मागणी १० टक्क्यांनी वाढली
12
लग्नाला नकार दिल्याच्या रागातून प्रेयसीसह तिच्या आईची हत्या; दुहेरी हत्याकांडाने विरार हादरले
13
सिगरेट शौकिनांना धक्का... गुंतवणूकदारांची चांदी...! १ मे पासून किमतीत १७ टक्क्यांपर्यंत वाढ; कंपन्यांचे शेअर्स मात्र सुसाट
14
आरपीएफ जवानाच्या सतर्कतेमुळे आईसह बाळाला जीवनदान; कल्याण रेल्वे स्थानकावरील घटना
15
IPL मधील 'कमबॅक किंग' आहे Mumbai Indians! पाचवेळचा चॅम्पियन संघ Playoffs साठी किती वेळा ठरलाय पात्र?
16
१ महिन्यात २ अंगारक योग: संकष्ट-विनायक चतुर्थी ठरेल खास, गणपती बाप्पा शुभच करेल; काय करावे?
17
महाराष्ट्राचे AI धोरण जाहीर, हरित आयोग स्थापन, लंडन येथे अध्यासन केंद्र; मंत्रिमंडळाचे ७ मोठे निर्णय
18
महाराष्ट्राचे कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण नेमके आहे तरी काय? AI मुळे किती नोकऱ्या मिळणार? वाचा
19
मोठी बातमी! उद्धव ठाकरे विधानपरिषदेवर जाणार नाहीत, अंबादास दानवे यांना उमेदवारी; आदित्य ठाकरेंची घोषणा
20
लग्नासाठी तयार व्हायला नवरी ब्युटी पार्लरमध्ये गेली अन् घडलं आक्रित; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
Daily Top 2Weekly Top 5

दीड कोटीच्या प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सकाची स्वाक्षरीच नव्हती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:16 IST

नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग ...

नागपूर : हृदय पिळवटून टाकणाऱ्या भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील घटनेतील हलगर्जीपणाच्या एक-एक बाबी आता समोर येऊ लागल्या आहेत. आग प्रतिबंधक उपाययोजना करण्याकरिता १,५२, ४४, ७८३ इतक्या किमतीच्या अंदाजपत्रक प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे आरोग्य सेवा संचालकांकडून प्रस्तावाला मंजुरीच मिळाली नाही. नंतर तो धूळखात पडून राहिल्याने अग्निशमन यंत्रणेची खरेदीच झाली नाही.

अतिदक्षता नवजात केअर युनिटमध्ये (एसएनसीयू) शनिवारी पहाटे लागलेल्या आगीत दहा बालकांचा अत्यंत वेदनादायी मृत्यू झाला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. आरोग्य सेवा संचालकांच्या अध्यक्षतेखाली सहा सदस्यांची चौकशी समिती तयार करण्यात आली आहे. पुढील तीन दिवसात ही समिती सदर घटनेची कारणमीमांसा करून त्रुटी शोधून काढणार आहे. परंतु रुग्णालय स्थापन होऊन २५ वर्षांपेक्षा जास्त कालावधी होऊनही अग्निशमन यंत्रणा खरेदी करण्याला कुणीच गंभीरतेने घेतले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या घटनेवर प्रकाश टाकणारे एक पत्र ‘लोकमत’चा हाती लागले. त्यानुसार, भंडारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी आरोग्य विभागाचे संचालक डॉ. साधना तायडे यांना आग प्रतिबंधक उपाययोजनेचा अंदाजपत्रकाला प्रशासकीय मान्यता व निधी उपलब्ध करुन देण्याचा प्रस्ताव पाठविला होता. १५ सप्टेंबर २०२० रोजी पाठविण्यात आलेल्या या प्रस्तावात अग्निशमन यंत्रणा खरेदीसाठी १,५२, ४४, ७८३ इतक्या किंमतीची मागणी करण्यात आली होती. परंतु प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक व सार्वजनिक बांधकाम विभागाची स्वाक्षरीच नव्हती. यामुळे संचालक डॉ. तायडे यांनी प्रस्तावावर जिल्हा शल्यचिकित्सक यांनी स्वाक्षरी करून व सार्वजनिक बांधकाम विभागाची तांत्रिम सहमती घेऊन तो आयुक्त कार्यालयात सादर करावा, जेणेकरुन पुढील कार्यवाही करणे सुलभ होईल असे पत्र, १३ नोव्हेंबर २०२० रोजी आरोग्य सेवा नागपूर मंडळचे उपसंचालक डॉ. संजय जयस्वाल यांना पाठविले. या पत्राचा आधार घेऊन डॉ. जयस्वाल यांनी २० नोव्हेंबर रोजी डॉ. खंडाते यांना अंदाजपत्रक त्रुटीची दुरुस्ती करून फेरसादर करण्याचा सूचना केल्या. परंतु नंतर हा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालक कार्यालयात पोहचलाच नाही. यामुळे अग्निशमन यंत्रणेची खरेदीच होऊ शकली नाही. यंत्रणा उपलब्ध असती आणि ‘एसएनसीयू’ कक्षात डॉक्टर, परिचारिका व अटेन्डंट उपस्थित असते तर १० बालके आज जिवंत असती, असे बोलले जात आहे.