शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

बंद दरम्यानही वीज कापण्याची मोहीम सुरूच, महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 28, 2021 01:14 IST

Power cut campaign continues वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बंद दरम्यानही महावितरणतर्फे थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम सुरूच होती. या मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो, त्यामुळे अनेक ठिकाणी याचा विरोधही झाला. दुसरीकडे १६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने या मोहिमेत सामील वीज कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे

ठळक मुद्देशनिवारीही ७०० थकबाकीदारांची वीज कापली 

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बंद दरम्यानही महावितरणतर्फे थकबाकीदारांची वीज कापण्याची मोहीम सुरूच होती. या मोहिमेतील कर्मचाऱ्यांचा नागरिकांशी थेट संपर्क येतो, त्यामुळे अनेक ठिकाणी याचा विरोधही झाला. दुसरीकडे १६ फेब्रुवारीपासून आतापर्यंत जिल्ह्यात महावितरणचे ९ कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने या मोहिमेत सामील वीज कर्मचाऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे; परंतु दबावामुळे त्यांना नाइलाजास्तव काम करावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

नागपुरात वाढता कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने शनिवार व रविवार या दोन दिवशी बंदचे निर्देश दिले आहेत. अत्यावश्यक सेवा सोडून सर्व व्यवहार बंद ठेवण्यास सांगितले आहे. तसे झालेसुद्धा; परंतु वीज कार्यालय अत्यावश्यक सेवा असल्याने सुरू होते. इतकेच नव्हे तर थकबाकीदारांचे वीज कनेक्शनही कापण्यात आले. जिल्ह्यात शनिवारी जवळपास ७०० थकबाकीदारांची वीज कापण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यात ४०० पेक्षा अधिक कनेक्शन शहरातील तर ३०० ग्रामीणमधील आहेत. यादरम्यान काही ठिकाणी मोहिमेला विरोध करीत बंदच्या दिवशी वीज का कापली जात आहे, असा प्रश्नही नागरिकांनी उपस्थित केला, तसेच १६ ते २६ फेब्रुवारी या दरम्यान जिल्ह्यात महावितरणचे ९ कर्मचारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. शहर सर्कलमधील ४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यात सोमलवाडा व हुडकेश्वरचे सहायक अभियंत्यांचाही समावेश आहे. यामुळे वीज कर्मचारी दहशतीत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मोहिमेमुळे ते सुद्धा पॉझिटिव्ह होऊ शकतात. कारण ते थेट नागरिकांच्या संपर्कात येताहेत.

दिशा-निर्देशांचे पालन

अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की, ही राज्यव्यापी मोहीम आहे. थकबाकी प्रचंड वाढली आहे. मोहिमेत सहभागी कर्मचाऱ्यांना दोन-दोन कर्मचाऱ्यांचे पथक बनवून जाण्यास सांगण्यात आले आहे. सर्व दिशा-निर्देशांचे पालन केले जात आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणelectricityवीजbillबिल