शहरं
Join us  
Trending Stories
1
"साहेब, परप्रांतियांची दादागिरी वाढली, ठाकरे ब्रँड टिकला पाहिजे", कार्यकर्त्यांची 'मनसे' भावना; राज ठाकरे काय म्हणाले?
2
मनात आले तर डोनाल्ड ट्रम्प मस्कना अमेरिकेबाहेरही घालवू शकतात? बड्या हस्तीने वर्मावर बोट ठेवले...
3
“उद्धव यांनी एक फोन करावा, राज ठाकरे १०० पावले पुढे येतील, पण...”; मनसेची स्पष्ट भूमिका
4
IND vs ENG: आता रंगणार कसोटी मालिकेचा थरार! शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंडला रवाना
5
"अमावस्येला नारळ चुकला अन्...", ऋतुजा बागवेने सांगितला भयावह अनुभव
6
विजय मल्ल्याच्या लेकासोबत होतं दीपिकाचं अफेअर; अभिनेत्रीला ताज हॉटेलमध्ये घेऊन गेला अन्...
7
ऐतिहासिक! १३४ वर्षांनी स्वप्नपूर्ती; PM मोदींनी श्रीनगर वंदे भारत ट्रेनला दाखवला हिरवा झेंडा
8
Corona Virus : सावधान! कोरोना वाढवतोय टेन्शन; १५ दिवसांत २० पटीने वाढली एक्टिव्ह रुग्णांची संख्या
9
NEET-PG Exam Date: अखेर नीट पीजी परीक्षेची तारीख निश्चित, सर्वोच्च न्यायालयाने NBEला दिली परवानगी
10
आधी घाबरवलं, मग जज बनून व्हिडीओ कॉल केला, विलेपार्ल्यातील महिलेच्या खात्यातून चोरट्यांनी उडवले 'इतके' कोटी!
11
जमिनीचे आरक्षण रद्द करून मुलाच्या मद्यउद्योगाला जागा; इम्तियाज जलीलांचा शिरसाटांवर आरोप
12
Vijay Mallya: "मी प्रणव मुखर्जींकडे गेलो होतो..," बँक कर्जावर विजय मल्ल्याचा मोठा दावा
13
“दोन शिवराज्याभिषेक सोहळे होताच कामा नयेत, तुम्हाला जनतेला एक होऊ द्यायचे नाही”: मनोज जरांगे
14
ओरेश्निक मिसाइल म्हणजे ब्रह्मोसची कॉपी...? ज्याच्या सह्यायने रशियानं केला युक्रेनवर पलटवार, एकाच वेळी 6 ठिकाणी करू शकते हल्ला
15
युतीसाठी उद्धव ठाकरे-राज ठाकरे यांच्यात फोनवरून चर्चा झाली का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Raja Raghuvanshi : "माझी हत्या झालीय", भावाच्या स्वप्नात आला राजा; कुटुंबीयांनी केली CBI चौकशीची मागणी
17
आयफेल टॉवरपेक्षाही उंच, भव्यता पाहून विस्फारतील डोळे; चिनाब रेल्वे पूल पाहिलात का?
18
सिंधू पाणी कराराबाबत बिलावल भुट्टोंनी गरळ ओकली; भारताला पुन्हा दिली अणुयुद्धाची धमकी
19
RBI MPC Meeting : EMI चा भार आणखी कमी होणार, रिझर्व्ह बँकेचं सर्वसामान्यांना मोठं गिफ्ट; रेपो दरात केली कपात
20
चीनला धोबीपछाड, जगात सर्वाधिक पदवीधर भारतात; नव्या रिपोर्टमध्ये काय?

सत्तेला बाबासाहेबांचे विचार स्वीकारण्याची भीती वाटते

By admin | Updated: April 15, 2017 02:14 IST

आज प्रत्येकजण समानतेच्या केवळ गोष्टीच करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू करण्यापूर्वी सामाजिक व आर्थिक समानतेचे महत्त्व विषद केले होते.

पुण्यप्रसून वाजपेयी : विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती नागपूर : आज प्रत्येकजण समानतेच्या केवळ गोष्टीच करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू करण्यापूर्वी सामाजिक व आर्थिक समानतेचे महत्त्व विषद केले होते. ते तत्त्वज्ञान जगासमोर येणे आवश्यक आहे. आज सर्वच राजकीय पक्ष त्यांच्याशी भावनिकतेने जोडू पाहतात. मात्र सत्ताकेंद्रित झालेली व्यवस्था डगमगेल या भीतीने त्यांचे विचार स्वीकारले व प्रकाशात येऊ दिले जात नाही, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यप्रसून वाजपेयी यांनी डॉ. आंबेडकरांद्वारे लिखित अनेक पुस्तक व त्यांच्या भाषणांचे दाखले दिले. ब्राह्मणी जात नसून ती एक व्यवस्था आहे, असे मानणारी व तिला मजबुतीने टक्कर देणारी ती एकमेव व्यक्ती होती. जगभरातील आर्थिक व सामाजिक व्यवस्थेचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारेही ते एकमेव होते. देशात सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर लोकशाही फार काळ तग धरणार नाही. संपूर्ण व्यवस्था सत्ताकेंद्रित झाली तर देशातील सर्व संस्था मोडकळीस येतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते आणि दुर्देवाने त्यांचे खरे ठरताना दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. १९५२ पासून विविध पॅकेज देऊनही गरीब अधिक गरीब झाले व शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्याचा विचार दिला होता. त्यांना अधिकार दिल्याशिवाय त्यांची स्थिती सुधारणार नाही, असे बाबासाहेबांनी सुचविले होते. मात्र सत्तेत राहणाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आज हिंदूराष्ट्राची त्वेषाने संकल्पना मांडली जाते. अशा अवस्थेत आपण विकसित देशांशी स्पर्धा कशी करणार, असा सवालही वाजपेयी यांनी यावेळी केला. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार, तत्त्वज्ञान जगासमोर मांडण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी यावेळी शिक्षण म्हणजे पदव्या घेणे नसून व्यवहार शिकणे होय. बाबासाहेबांनी संविधानात दिलेले स्वातंत्र्य आपण उपभोगतो, मात्र बंधुत्वाचा व्यवहार विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूरणचंद्र मेश्राम यांनी केले तर संचालन डॉ. प्रमोद शर्मा यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) बाबासाहेब पंतप्रधान झाले असते तर... बाबासाहेबांना जातीय व्यवस्थेची चिड होती. त्याचप्रमाणे उद्योगजगताच्या भरवशावर चालणारे राजकारण त्यांना मान्य नव्हते. वर्तमान काळात उद्योजकांच्या भरवशावर निवडणुका लढविल्या जातात व जातीय समीकरण महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला असून गरीब अधिक गरीब होत आहे आणि राजकारण्यांची संपत्ती शेकडो पटीने वाढत आहे. बाबासाहेब पंतप्रधान असते तर त्यांनी सर्वात आधी व्यवस्थेवर प्रहार केला असता व आजच्या राजकीय व्यवस्थेचे स्वरूप वेगळे असते. याच कारणामुळे ‘नेहरू ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर...’ असा विचार केला जातो, मात्र ‘बाबासाहेब पंतप्रधान झाले असते तर...’ हा विचार स्वीकारला किंवा चर्चा केली जात नाही, असे मत वाजपेयी यांनी व्यक्त केले.