शहरं
Join us  
Trending Stories
1
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
2
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
5
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
6
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
7
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
8
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
9
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
10
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
11
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
12
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
13
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
14
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?
15
आंध्र प्रदेशातील दगड खाणीत स्फोट, ओडिशातील ६ कामगारांचा मृत्यू; १० हून अधिक जण गंभीर जखमी
16
'सनातन नसता तर जितेंद्र ‘जित्तुद्दीन’ झाले असते', आव्हाडांच्या वादग्रस्त वक्तव्यावर निरुपम संतापले
17
सूत जुळलं! मावशीच्या नणंदेवर प्रेम जडलं, कुटुंबीयांनी खोलीत पकडलं; एकमेकींसाठी घरदार सोडलं
18
"आयुष्य उद्ध्वस्त झालं, सर्व संपलं..."; अपघातातून वाचलेल्या मुलीने सांगितलं नेमकं काय घडलं?
19
WI vs PAK 2nd T20I : होल्डरनं शेवटच्या चेंडूवर जिंकून दिली मॅच; शाहीन शाह आफ्रिदीवर तोंड लपवण्याची वेळ
20
"मी माझी कबर खोदतोय, इथेच दफन..."; हमासने दाखवला इस्रायली ओलिसाचा भयानक Video

सत्तेला बाबासाहेबांचे विचार स्वीकारण्याची भीती वाटते

By admin | Updated: April 15, 2017 02:14 IST

आज प्रत्येकजण समानतेच्या केवळ गोष्टीच करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू करण्यापूर्वी सामाजिक व आर्थिक समानतेचे महत्त्व विषद केले होते.

पुण्यप्रसून वाजपेयी : विद्यापीठात डॉ. आंबेडकर जयंती नागपूर : आज प्रत्येकजण समानतेच्या केवळ गोष्टीच करतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लागू करण्यापूर्वी सामाजिक व आर्थिक समानतेचे महत्त्व विषद केले होते. ते तत्त्वज्ञान जगासमोर येणे आवश्यक आहे. आज सर्वच राजकीय पक्ष त्यांच्याशी भावनिकतेने जोडू पाहतात. मात्र सत्ताकेंद्रित झालेली व्यवस्था डगमगेल या भीतीने त्यांचे विचार स्वीकारले व प्रकाशात येऊ दिले जात नाही, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार पुण्यप्रसून वाजपेयी यांनी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते. पुण्यप्रसून वाजपेयी यांनी डॉ. आंबेडकरांद्वारे लिखित अनेक पुस्तक व त्यांच्या भाषणांचे दाखले दिले. ब्राह्मणी जात नसून ती एक व्यवस्था आहे, असे मानणारी व तिला मजबुतीने टक्कर देणारी ती एकमेव व्यक्ती होती. जगभरातील आर्थिक व सामाजिक व्यवस्थेचे अभ्यासपूर्ण विवेचन करणारेही ते एकमेव होते. देशात सामाजिक व आर्थिक समानता आली नाही तर लोकशाही फार काळ तग धरणार नाही. संपूर्ण व्यवस्था सत्ताकेंद्रित झाली तर देशातील सर्व संस्था मोडकळीस येतील, असे भाकीत त्यांनी वर्तविले होते आणि दुर्देवाने त्यांचे खरे ठरताना दिसत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. १९५२ पासून विविध पॅकेज देऊनही गरीब अधिक गरीब झाले व शेतकऱ्यांची स्थिती वाईट झाली. बाबासाहेबांनी शेतकऱ्यांची क्षमता वाढविण्याचा विचार दिला होता. त्यांना अधिकार दिल्याशिवाय त्यांची स्थिती सुधारणार नाही, असे बाबासाहेबांनी सुचविले होते. मात्र सत्तेत राहणाऱ्यांनी याकडे लक्ष दिले नाही. आज हिंदूराष्ट्राची त्वेषाने संकल्पना मांडली जाते. अशा अवस्थेत आपण विकसित देशांशी स्पर्धा कशी करणार, असा सवालही वाजपेयी यांनी यावेळी केला. त्यामुळे बाबासाहेबांचे विचार, तत्त्वज्ञान जगासमोर मांडण्याची नितांत गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांनी यावेळी शिक्षण म्हणजे पदव्या घेणे नसून व्यवहार शिकणे होय. बाबासाहेबांनी संविधानात दिलेले स्वातंत्र्य आपण उपभोगतो, मात्र बंधुत्वाचा व्यवहार विसरल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक पूरणचंद्र मेश्राम यांनी केले तर संचालन डॉ. प्रमोद शर्मा यांनी केले. डॉ. प्रदीप आगलावे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी) बाबासाहेब पंतप्रधान झाले असते तर... बाबासाहेबांना जातीय व्यवस्थेची चिड होती. त्याचप्रमाणे उद्योगजगताच्या भरवशावर चालणारे राजकारण त्यांना मान्य नव्हते. वर्तमान काळात उद्योजकांच्या भरवशावर निवडणुका लढविल्या जातात व जातीय समीकरण महत्त्वाचे झाले आहे. त्यामुळे भ्रष्टाचार वाढला असून गरीब अधिक गरीब होत आहे आणि राजकारण्यांची संपत्ती शेकडो पटीने वाढत आहे. बाबासाहेब पंतप्रधान असते तर त्यांनी सर्वात आधी व्यवस्थेवर प्रहार केला असता व आजच्या राजकीय व्यवस्थेचे स्वरूप वेगळे असते. याच कारणामुळे ‘नेहरू ऐवजी सरदार पटेल पंतप्रधान झाले असते तर...’ असा विचार केला जातो, मात्र ‘बाबासाहेब पंतप्रधान झाले असते तर...’ हा विचार स्वीकारला किंवा चर्चा केली जात नाही, असे मत वाजपेयी यांनी व्यक्त केले.