शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

नागपुरात ‘मास्क’च्या प्रदूषणाचा पर्यावरणाला फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 00:02 IST

कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळेपर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापडाचे वगळता इतर सर्व प्रकारच्या मास्कमध्ये प्लास्टिकचा अंश असतो आणि योग्यरीतीने नष्ट केले नाही तर अनेक वर्षे वातावरणात राहतो. त्याचे कलेक्शन व नष्ट करण्यात येणाऱ्या अडचणीमुळे हा प्रदूषणाचा विळखा अनेक वर्ष त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ग्रीन व्हिजिलचे संयोजक व पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी मास्कच्या धोक्याकडे लक्ष वेधले. मास्कचा समावेश बॉयोमेडिकल वेस्टमध्ये होतो. सध्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता इतरांच्या मास्कशी संपर्क येणे धोक्याचे कारण ठरू शकते. कोरोना काळातील मास्क आणि हातमोजे हे जैविक कचºयाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना जैविक कचऱ्यासोबत गोळा करणे अपेक्षित आहे. शहरात सुपर हायजेनिक संस्थेद्वारे रुग्णालयातील जैविक कचरा गोळा करण्यात येतो, मात्र असाच घरातील कचरा गोळा होत नाही. त्यासाठी शहरातील कचरा उचल करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे जैविक कचरा स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक असंवेदनशील माणसे कुठेही मास्क फेकतात. या प्रदूषित मास्कमुळे इतरांना किंवा प्राण्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. दुसरीकडे काही लोक तो कचºयाच्या डब्यात जमा करतात, पण तो घरगुती कचºयासोबतच टाकला जातो. पुढे भांडेवाडीमध्ये तो जमा केला जातो किंवा जाळला जातो. ही व्यवस्थासुद्धा प्रदूषणास कारणीभूत ठरणारी आहे. रिक्षाप्रमाणे ओढणाऱ्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाड्यामध्ये जैविक कचरा गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्थासुद्धा नाही. अशा अनेक अडचणींमुळे मास्कचा हा जैविक कचरा येत्या काळात अधिक अडचणीचा ठरण्याची भीती कौस्तुभ चटर्जी यांनी व्यक्त केली आहे.काय आहे पॉलिप्रॉपिलीन व त्याचा धोका?कापडाचे मास्क वगळता इतर सर्व प्रकारचे मास्क हे ‘पॉलिप्रॉपिलीन’चा वापर करून तयार केले जातात. पॉलिप्रॉपिलीन हा प्लास्टिकचा असा घटक आहे ज्याचे सहजासहजी विघटन होत नाही. काही वर्षानंतर याचे मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या कणांमध्ये रूपांतर होते. हे कण तलाव किंवा इतर जलसाठ्यात मिसळले तर तेथील सजीवांना धोकादायक आहेत. मात्र हे प्लास्टिक कण शेतात मिसळले तर माणसाच्या अन्नात पोहचण्याचा धोका आहे. हा घटक अनेक वर्षे वातावरणात राहत असल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.असा नष्ट करावा कचराचटर्जी यांनी सांगितले, नागरिकांनी सॅनिटरी नॅपकिन्सप्रमाणे मास्क व ग्लोव्हज स्वतंत्रपणे जमा करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही तो वेगळाच गोळा करावा. हा कचरा नष्ट करण्यासाठी भांडेवाडीत नेऊ नये. त्यापेक्षा रुग्णालयातील कचरा जिथे जातो, तेथे नेला जावा. या ठिकाणीइन्सिनरेटरमध्ये ८०० ते ११०० डिग्री तापमानात तो जाळला जावा. धूर बाहेर जाऊ नये म्हणून क्लीन डिव्हाईस लावणेही गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला.शहरातून दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. यात १५० ते २०० मेट्रिक टन प्लास्टिक वेस्ट असते. यात मास्क, ग्लोव्हजच्या कचऱ्याची भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण