शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

नागपुरात ‘मास्क’च्या प्रदूषणाचा पर्यावरणाला फास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2020 00:02 IST

कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोविड १९ च्या धोक्यापासून स्वत:ला सुरक्षित ठेवण्यासाठी मास्क आणि सॅनिटायझर या आवश्यक गोष्टी झाल्या आहेत. मात्र वापरण्यात येणाऱ्या मास्कच्या प्रदूषणामुळेपर्यावरणाला फास लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कापडाचे वगळता इतर सर्व प्रकारच्या मास्कमध्ये प्लास्टिकचा अंश असतो आणि योग्यरीतीने नष्ट केले नाही तर अनेक वर्षे वातावरणात राहतो. त्याचे कलेक्शन व नष्ट करण्यात येणाऱ्या अडचणीमुळे हा प्रदूषणाचा विळखा अनेक वर्ष त्रासदायक ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.ग्रीन व्हिजिलचे संयोजक व पर्यावरण तज्ज्ञ कौस्तुभ चटर्जी यांनी मास्कच्या धोक्याकडे लक्ष वेधले. मास्कचा समावेश बॉयोमेडिकल वेस्टमध्ये होतो. सध्या कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेता इतरांच्या मास्कशी संपर्क येणे धोक्याचे कारण ठरू शकते. कोरोना काळातील मास्क आणि हातमोजे हे जैविक कचºयाचा भाग आहेत. त्यामुळे त्यांना जैविक कचऱ्यासोबत गोळा करणे अपेक्षित आहे. शहरात सुपर हायजेनिक संस्थेद्वारे रुग्णालयातील जैविक कचरा गोळा करण्यात येतो, मात्र असाच घरातील कचरा गोळा होत नाही. त्यासाठी शहरातील कचरा उचल करणाऱ्या कंपन्यांच्या गाड्यांमध्ये स्वतंत्रपणे जैविक कचरा स्वीकारण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र अनेक असंवेदनशील माणसे कुठेही मास्क फेकतात. या प्रदूषित मास्कमुळे इतरांना किंवा प्राण्यांना संसर्ग होण्याचा धोका आहे. दुसरीकडे काही लोक तो कचºयाच्या डब्यात जमा करतात, पण तो घरगुती कचºयासोबतच टाकला जातो. पुढे भांडेवाडीमध्ये तो जमा केला जातो किंवा जाळला जातो. ही व्यवस्थासुद्धा प्रदूषणास कारणीभूत ठरणारी आहे. रिक्षाप्रमाणे ओढणाऱ्या अनेक स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या गाड्यामध्ये जैविक कचरा गोळा करण्याची स्वतंत्र व्यवस्थासुद्धा नाही. अशा अनेक अडचणींमुळे मास्कचा हा जैविक कचरा येत्या काळात अधिक अडचणीचा ठरण्याची भीती कौस्तुभ चटर्जी यांनी व्यक्त केली आहे.काय आहे पॉलिप्रॉपिलीन व त्याचा धोका?कापडाचे मास्क वगळता इतर सर्व प्रकारचे मास्क हे ‘पॉलिप्रॉपिलीन’चा वापर करून तयार केले जातात. पॉलिप्रॉपिलीन हा प्लास्टिकचा असा घटक आहे ज्याचे सहजासहजी विघटन होत नाही. काही वर्षानंतर याचे मायक्रोप्लास्टिक म्हणजे प्लास्टिकच्या कणांमध्ये रूपांतर होते. हे कण तलाव किंवा इतर जलसाठ्यात मिसळले तर तेथील सजीवांना धोकादायक आहेत. मात्र हे प्लास्टिक कण शेतात मिसळले तर माणसाच्या अन्नात पोहचण्याचा धोका आहे. हा घटक अनेक वर्षे वातावरणात राहत असल्याचे चटर्जी यांनी स्पष्ट केले.असा नष्ट करावा कचराचटर्जी यांनी सांगितले, नागरिकांनी सॅनिटरी नॅपकिन्सप्रमाणे मास्क व ग्लोव्हज स्वतंत्रपणे जमा करावे. स्वच्छता कर्मचाऱ्यांनीही तो वेगळाच गोळा करावा. हा कचरा नष्ट करण्यासाठी भांडेवाडीत नेऊ नये. त्यापेक्षा रुग्णालयातील कचरा जिथे जातो, तेथे नेला जावा. या ठिकाणीइन्सिनरेटरमध्ये ८०० ते ११०० डिग्री तापमानात तो जाळला जावा. धूर बाहेर जाऊ नये म्हणून क्लीन डिव्हाईस लावणेही गरजेचे असल्याचा सल्ला त्यांनी दिला.शहरातून दररोज १२०० मेट्रिक टन कचरा निघतो. यात १५० ते २०० मेट्रिक टन प्लास्टिक वेस्ट असते. यात मास्क, ग्लोव्हजच्या कचऱ्याची भर पडली आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याenvironmentपर्यावरणpollutionप्रदूषण