शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

फटाक्यांची आतषबाजी जाेरात, उपराजधानीचा श्वास काेंडला

By निशांत वानखेडे | Updated: November 13, 2023 21:50 IST

रामनगर, महालात निर्देशांक १२०० ते १५०० वर : २४ तासात सरासरी ३९९ एक्युआय

नागपूर : वायु गुणवत्ता निर्देशांक २६० वर : महाल, रामनगरातील हवा खराब नागपूर दिवाळी उत्सवाच्या उत्साहात लाेकांनी फटाक्यांची जाेरात आतषबाजी केली. त्याचे परिणामही दिसून येत आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नागपूरच्या प्रदूषणाचा निर्देशांक सरासरी २६० एक्यूआयवर पाेहोचला. विशेष म्हणजे महाल व रामनगर परिसरात प्रदूषणाचा स्तर सर्वाधिक नाेंदविण्यात आला.

दिल्ली, मुंबईप्रमाणे नागपूरचे वातावरणही प्रदूषित हाेत आहे. हिवाळ्याच्या काळात त्यात अधिक वाढ हाेते. दिवाळीमध्ये ते धाेक्याच्या पातळीच्या वर जाते. वायू गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) ० ते ५० वर असेल तर श्वास घेण्यास चांगला असताे. ताे ५१ ते १०० पर्यंत गेला तरी समाधानकारक असताे. एक्यूआय १००च्या वर गेल्यास ज्येष्ठ नागरिक, आजारी व दमा रुग्णास श्वास घेण्याचा त्रास वाढताे आणि २००च्या वर गेल्यास प्रदूषित व ३००च्यावर गेल्यास अत्याधिक वाईट मानला जाताे. नागपुरात नाेव्हेंबर सुरू झाल्यापासून निर्देशांक १५० ते २०० च्या स्तरावर आहे. दिवाळी सुरू झाल्यापासून २०० एक्यूआयच्या जवळपास पाेहोचला आहे. रविवारी लक्ष्मीपूजनाच्या रात्री लाेकांनी जाेरात फटाके फाेडले आणि एक्यूआय २६० च्या धाेकादायक स्तरावर पाेहोचला. सकाळ हाेईपर्यंत २५० च्या आसपास हाेती. हा स्तर प्रदूषित मानला जात असून दमा राेगी, आजारी व्यक्ती व ज्येष्ठांसाठी धाेकादायक मानला जाताे.

प्रशासनाने रात्री ८ ते १० वाजतापर्यंत फटाके फाेडण्यास परवानगी दिली हाेती, मात्र फटाक्यांची आतषबाजी रात्री १२ पर्यंत सुरू हाेती. सायंकाळी ६ वाजतापर्यंत २३३ वर असलेला एक्युआय रात्री १ वाजतापर्यंत २६० वर पाेहचला. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ (सीपीसीबी) द्वारे शहरातील चार केंद्रावरून घेतलेल्या आकडेवारीवरून महाल केंद्रावर रविवारी रात्री १२ वाजता सर्वाधिक २६० एक्युआयची नाेंद झाली. महाल केंद्रावर साेमवारी १३ नाेव्हेंबर राेजीही प्रदूषणाचा स्तर २५० एक्युआयच्या आसपास हाेता. रामनगर, सिव्हील लाईन्स व अंबाझरी केंद्रावर रात्री १२ वाजता अनुक्रमे १९९, २०७ व २२० हाेता. हा स्तर १३ नाेव्हेंबरच्या सकाळपर्यंत कायम हाेता.

ग्रीन फटाक्यांच्या नावाने विकले साधे फटाके

मिळालेल्या माहितीनुसार बाजारात सामान्य फटाकेसुद्धा ग्रीन फटाक्यांच्या नावाने विकले गेले. महापालिकेने ग्रीन फटाके फाेडण्याचे आवाहन नागरिकांना केले हाेते. मात्र याचा प्रभावही दिसून आला नाही. तज्ज्ञांच्या मते ग्रीन फटाक्यांमुळे प्रदूषण ३० टक्के कमी हाेते, म्हणजे ७० टक्के प्रदूषणास कारणीभूत ठरतातच.

टॅग्स :environmentपर्यावरणpollutionप्रदूषणDiwaliदिवाळी 2023fire crackerफटाकेair pollutionवायू प्रदूषणnagpurनागपूर