शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
3
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
4
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
5
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
6
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
7
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
8
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
9
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
10
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
11
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
12
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
13
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
14
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
15
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
16
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
17
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
18
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
19
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
20
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'

हे तर धार्मिक व मानसिक गुलामगिरीकडे नेणारे धोरण : कमलताई गवई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 05, 2019 11:50 PM

मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न नवीन शिक्षण धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.

ठळक मुद्देमहिला धम्म मेळाव्यात नवीन शिक्षण धोरणावर चर्चा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : गुणवत्तापूर्ण शिक्षण हे कोणत्याही काळात महत्त्वाचे असते कारण शिक्षणामुळेच माणसात निर्भयता व स्वतंत्रवृत्ती निर्माण होते. मात्र शासनाने आणलेले नवीन शिक्षण धोरण हे विपरीत आहे. मूल्य व संस्काराच्या नावावर धार्मिक व मानसिक गुलामगिरी लादण्याचा प्रयत्न या धोरणाच्या माध्यमातून केला जात असल्याची टीका आंबेडकरी चळवळीच्या ज्येष्ठ कार्यकर्त्या डॉ. कमलताई गवई यांनी दीक्षाभूमीवर झालेल्या कार्यक्रमात केली.६३ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि महिला संघटनेच्यावतीने दीक्षाभूमीवर आयोजित महिला धम्म मेळाव्याच्या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. याप्रसंगी वक्ता म्हणून वंदना वनकर तसेच डॉ. सरोज आगलावे, रेखा खोब्रागडे, तक्षशीला वाघधरे, ओबीसी महासंघाच्या महिला अध्यक्षा सुषमा भड, छाया खोब्रागडे, वंदना जीवने प्रामुख्याने उपस्थित होत्या. डॉ. कमलताई म्हणाल्या, मानवी मूल्य ही तथागत बुद्धाच्या केंद्रस्थानी होते. शिक्षणाच्या माध्यमातून संविधानाला अनुरूप मानवी मूल्य रुजविणे गरजेचे आहे. मात्र नवे शिक्षण धोरण धार्मिक मूल्य रुजविणारे आहे, ज्यात धर्मनिरपेक्षतेला पायदळी तुडविले जात आहे. हिंदू धर्म व संस्कृतीला अनुकूल करून धर्माची मानसिक गुलामी विद्यार्थीदशेपासून लादली जाणार असल्याचा आरोप त्यांनी केला.वंदना वनकर यांनी नव्या शिक्षण धोरणातील अनेक तरतुदींचे सविस्तर विश्लेषण केले. हे धोरण अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, भटके विमुक्त व गरिबांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्यासाठी कारणीभूत ठरणार असल्याचा आरोप त्यांनी केला. सरकारी शाळा बंद करून शिक्षणात खासगीकरणाला चालना देण्यात येत आहे. पारंपरिक सण, संस्कृतीचा आदर्श जोपासण्याच्या नावावर वर्णव्यवस्थेला बळकट करण्याचा प्रयत्न या धोरणातून केला जात आहे. पुरातन काळातील गुरुकुल पद्धती आदर्श असण्याचा उल्लेख करून शिक्षणातून जातीभेदाचा पुरस्कार करण्यात येत आहे. पुरुषसत्ताक जातीव्यवस्थेला बळकट करून स्त्रियांची गुलामगिरी अधिक घट्ट करण्यात येत असल्याचा आरोप करीत हे धोरण म्हणजे जनतेच्या शिक्षणाच्या कत्तलीचा व गुलामगिरीचा जाहीरनामाच असल्याचा घणाघाती आरोप त्यांनी केला.छाया खोब्रागडे यांनी धोरणातील भाषिक तरतुदींवर विचार मांडले तर डॉ. सरोज आगलावे यांनी शिक्षणाच्या भगवीकरणाच्या प्रयत्नाकडे लक्ष वेधले. इतर मान्यवरांनीही आपले विचार मांडले. संचालन शामला वाघधरे यांनी तर संघमित्रा नगरकर यांनी आभार मानले. सविता कांबळे, सुजाता लोखंडे, मायाताई थोरात आदींचा सहभाग होता.

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमीWomenमहिला