शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
‘सर्व भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढा, अन्यथा…’, अमेरिकन पत्रकाराचं वादग्रस्त विधान   
3
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
4
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
5
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
6
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
7
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
8
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
9
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
10
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
11
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
12
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
13
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
14
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
15
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
16
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
17
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
18
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
19
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
20
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
Daily Top 2Weekly Top 5

लोखंडी साहित्य बनविणाऱ्यांची दैना : जगण्याच्या संघर्षात बैल विकण्याची पाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2020 21:24 IST

लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच्या संघर्षात हा आधार वाहणारे जीवाभावाचे बैल विकण्याची पाळी त्यांच्यावर आली.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोखंडाचे पावडे, कुदळ, विळा, कुऱ्हाड, घमेले, नांगराचे फासे, वखर, बैलगाडीची चाके अशी अनेक अवजारे, साहित्य बनवून शहरात, गावागावात भ्रमंती करीत विकायचे आणि पुन्हा आपल्या बैलगाडीत बसून दुसरे गाव गाठायचे. ही बैलगाडीच त्यांच्या भटकंतीचा आधार. मात्र जगण्याच्या संघर्षात हा आधार वाहणारे जीवाभावाचे बैल विकण्याची पाळी त्यांच्यावर आली.

कधी काळी राजेरजवाडे यांच्या काळात शस्त्र बनविणारे हात, महाराणा प्रताप यांचे वंशज म्हणून अभिमान बाळगणारी माणसे. परंतु काळ बदलला आणि गौरवाच्या गाथा मागे पडल्या. सुरू झाला तो जगण्याचा संघर्ष. या संघर्षात शस्त्र बनविणारी कला शेती आणि घरगुती उपयोगाची लोखंडाची अवजारे बनविण्यात लागली. मग या गावातून त्या गावी, या राज्यातून त्या राज्यात पायपीट चालली. यात आधार मिळाला तो बैलगाडीचा. ही बैलगाडी त्यांच्या जगण्याचा आधार झाली. संपूर्ण संसार या बैलगाडीत सामावलेला. एवढी की अनेक महिलांच्या प्रसुती अशा बैलगाडीत झाल्या. ही अवजारे विकण्यासाठी एखाद्या गावात, शहरात अनेक दिवसांचा मुक्काम. गाडीलोहार, गडूलिया लोहार, चित्तोडिया लोहार, पांचाळ लोहार, खाती, खतवाडी आदी भटक्या जमातीचे हे जगणे.कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे या जमातीवरही मोठे संकट कोसळले आहे. शहरात रस्त्यावर अवजारे विकणारे हे लोक आपल्या गावाकडे परतले आहेत आणि काही परतण्याच्या प्रयत्नात आहेत. या प्रयत्नांतही अनेकांना अत्यंत कठीण संकटाला सामोरे जावे लागत आहे. राजस्थान, मध्य प्रदेश राज्यातील विविध गावात त्यांचा अधिवास. पण अवजार विक्रीसाठी सर्वत्र भटकंती. मोरगाव अर्जुनी तालुक्याच्या बारभाटी गावात मुक्काम ठोकून सरदार चव्हाण, कल्लूभाई चव्हाण, लल्लूभाई राठोड यांनी नागपूरच्या आसपास अवजार विक्रीचे काम चालविले होते. अशा ६ कुटुंबाच्या जवळपास ६० व्यक्ती २३ बैलगाड्यातून भटकंती करीत होते. लॉकडाऊनच्या दोन महिन्यात कसाबसा संसार सांभाळत त्यांनी दिवस काढले. माल विक्री नाही आणि घरातून बाहेर पडण्यासही मनाई, त्यामुळे खिशात पैसाही राहिला नाही. दान मिळालेल्या अन्नातून उपासमार थांबली पण बैलांचे काय, हा प्रश्न कायम. बैलांना चाऱ्याविना तडफडत मरताना बघणे ही असह्य करणारी गोष्ट. त्यामुळे त्यांना विकण्याशिवाय पर्याय नव्हता. एरवी ४०-५० हजारात विकली असती अशी बैलजोडी त्यांना ५-७ हजाराला विकावी लागली. काळजावर दगड ठेवून त्यांना हा सौदा करावा लागला. हे सहाही कुटुंब आता मध्य प्रदेशातील गावाकडे निघाले. पावसाळा सुरू व्हायच्या अगोदर अश्रू डोळ्यात घेऊन आणि बैलगाड्यांचे सांगाडे ट्रकमध्ये घालून हे सर्व कुटुंब त्यांच्या गावाकडे रवाना झाले. संघर्ष वाहिनीच्या कार्यकर्त्यांशी झालेल्या संवादातून त्यांची ही व्यथा समोर आली.

टॅग्स :nagpurनागपूरSocialसामाजिक