शहरं
Join us  
Trending Stories
1
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
2
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
3
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
4
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
5
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
6
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
7
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
8
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
9
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
10
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
11
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
12
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
13
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
14
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
15
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
16
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
17
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
18
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
19
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
20
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा

पाईल्स, फिशरने केली अनेकांची शिकार; अति'काढा'ही ठरला कारणीभूत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2020 10:24 IST

Health Nagpur News पाईल्स व फिशर आजाराच्या रुग्णात १५ टक्के वाढ झाली आहे. उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे.

ठळक मुद्दे१५ टक्के रुग्ण वाढलेतरुणांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनाचा प्रभाव आता कमी होऊ लागला आहे. परिणामी, बहुसंख्य लोक घराबाहेर पडत आहेत. विशेषत: आतापर्यंत अंगावर आजार काढलेले रुग्ण डॉक्टरांकडे गर्दी करीत आहेत. यात पाईल्स व फिशर आजार असलेल्या रुग्णांची संख्या मोठी आहे. गुदारोग तज्ज्ञ डॉ. नीलेश जुननकर यांच्यानुसार, या आजाराचे १५ टक्के रुग्णात वाढ झाली आहे. याला बैठी जीवनशैली, तिखट व मसालेदार खाद्यपदार्थांचे सेवन, कोरोनाच्या बचावासाठी उठसूठ सर्वांनीच सुचविलेल्या काढ्याचे अतिसेवन व व्यायामाचा अभाव, हे कारणीभूत ठरले आहे.

बदलती जीवनशैली आणि चुकीच्या आहाराच्या सवयीमुळे पाईल्स म्हणजेच मूळव्याधीची समस्या दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. शौचाच्या वेळी वेदना होणे, रक्तस्राव होणे, गुदद्वाराचा भाग फुगीर होणे, गाठी निर्माण होणे, ही मूळव्याधीची सर्वसामान्य लक्षणे आहेत. कोरोनाच्या काळातील सुरुवातीचे चार महिने लॉकडाऊन व नंतर पूर्णत: अनलॉक होण्यास आणखी तीन महिन्याचा लागलेल्या कालावधीमुळे बहुसंख्य लोक घरीच होते. त्यांचा जास्तीत जास्त वेळ टीव्ही, लॅपटॉप, संगणक व मोबाईल पाहण्यात गेला. मूळव्याध हा आजार विशेषकरून बैठेकाम करणाऱ्यांना जास्त होतो. यातच बाहेरून मागविण्यात आलेले तिखट व मसालेदार  व विविध काढ्याच्या अतिसेवनाने या आजाराने अनेकांना विळख्यात घेतले. विशेष म्हणजे, कोरोनाची लागण होईल या भीतीने सुरुवातीला बहुसंख्य रुग्णांनी डॉक्टरांकडे जाणे टाळले. काहींनी स्वत:हून औषधी घेतली. परिणामी, आजार वाढल्याची अनेक उदाहरणे असल्याचे डॉ. जुननकर यांनी सांगितले. ते म्हणाले, आॅक्टोबर महिन्याच्या मागील २० दिवसात अनेक रुग्णांनी लेजरद्वारे उपचार करून घेतले आहेत.१८ ते ३५ वयोगटातील सर्वाधिक रुग्णडॉ. जुननकर म्हणाले, एक काळ असा होता की मूळव्याध हा विशिष्ट वयानंतर म्हणजे साधारण चाळिशीनंतर उद्भवणारा आजार होता. पण, आता परिस्थिती बदलली आहे. १८ ते ३५ या वयोगटातील स्त्री-पुरुषांनाही मूळव्याध आजार होऊ लागला आहे. त्यामुळे वेळीच सावध होणे गरजेचे आहे. भारतात आजघडीस सुमारे चार कोटी लोकांना हा आजार आहे. दरवर्षी या आजारात जवळपास १० लाख नव्या रुग्णांची भर पडत आहे. बदललेले राहणीमान आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे युवावगार्तील मूळव्याधीची मुख्य कारणे आहेत.तंतूमय पदार्थ आहारामध्ये आवश्यकरोजच्या आहारामध्ये फळे, भाजीपाला, कडधान्ये यासारखे तंतूमय पदार्थ आवश्यक असतात. मात्र, आजच्या प्रोसेस्ड फूडच्या काळात आहारातून तंतूमय पदार्थ गायब झाले आहेत आणि त्याचा परिणाम पचनसंस्थेवर होत आहे. परिणामी, आपण जे खातो ते सहज पचून जाते व शरीरात तयार होणारी विष्ठा कमी प्रमाणात होते. त्यामुळे शौचाला जाण्याचे प्रमाणही कमी होते. हेच कारण मूळव्याधीला कारणीभूत ठरत आहे. याशिवाय, अनैसर्गिक सेक्सही हेही एक कारण आहे.

टॅग्स :Healthआरोग्य