शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वेटर, कानटोपी, हातमोजे अन् ब्लँकेट...! तयार रहा, ८६ टक्के हिमालयाला बर्फाने आच्छादले
2
मंत्रिमंडळ मोठे निर्णय! बांबू उद्योग धोरण जाहीर, ५ लाख रोजगार; मुंबई HC मध्ये २२२८ पदांना मान्यता
3
"अशी निवडणूक पद्धत भारतात कुठेच नाही, मग फक्त महाराष्ट्रातच का लागू आहे?"; निवडणूक आयोगाला घेरले, 'मविआ'च्या पत्रात काय?
4
१९९० मध्ये १ किलो सोन्याची किंमत मारुती ८०० एवढी होती, आज लँड रोव्हरएवढी झालीय, २०४० मध्ये...; उद्योगपतीने हिशेबच मांडला
5
नाकेबंदीदरम्यान हवालाची रक्कम लुटली, बड्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह ५ जण अटकेत   
6
“डोळ्यांत पाणी, उद्ध्वस्त घरे, थंड पडलेले सरकार अन् शेतकऱ्यांचे दिवाळे”: विजय वडेट्टीवार
7
गुजरात कॅबिनेटमध्ये मोठा फेरबदल; रवींद्र जडेजाच्या पत्नीला मंत्रिपदाची लॉटरी...
8
दिवाळीला घरी आणा नवी कोरी दुचाकी! देशातील सर्वात स्वस्त ५ बाईक्स, मायलेज-फीचर्स सर्वच दमदार
9
4G आले तरी... २० वर्षांचा प्रवास थांबला, ग्राहक बीएसएनलच्या सेवेला वैतागला, अखेर पोर्टिंगचा निर्णय घेतला...
10
माओवादी चळवळीला मोठा हादरा ! नक्षल्यांचा नेता ‘भूपती’सह ६० जणांनी पोलिसांसमोर केले आत्मसमर्पण
11
इंटरनेटशिवाय करता येणार पेमेंट; RBI ने लॉन्च केला ‘ऑफलाइन डिजिटल रुपया’, जाणून घ्या...
12
उद्धव ठाकरे अन् मविआ नेत्यांसोबत राज ठाकरे मंत्रालयात; मुख्य निवडणूक अधिकाऱ्याशी एकत्र चर्चा, 'इंजिना'ची ठरली दिशा?
13
एकनाथ शिंदेंनी सुरू केलेल्या योजना खरेच बंद होणार का? CM फडणवीसांनी सरळ सांगितले; म्हणाले...
14
सोन्याचे दर ₹१.३० लाखांच्या जवळ, चांदीचा भाव ₹१.८१ लाखांच्या पुढे, कॅरेटनुसार पाहा नवे दर
15
रोहित-विराट संदर्भातील 'त्या' प्रश्नावर गंभीर यांचं मोठं वक्तव्य; नेमकं काय म्हणाले कोच? जाणून घ्या सविस्तर
16
Tata Motors Demerger: टाटा मोटर्सच्या शेअर्समध्ये दिसली ४०% ची घसरण, काय आहे यामगची खरी कहाणी आणि पुढे काय होणार? जाणून घ्या
17
Viral: बंगळुरुमध्ये घरकाम करणाऱ्या बाईचा पगार ₹४५,०००; महिलेच्या दाव्याने सोशल मीडियावर खळबळ...
18
धक्कादायक! पतीशी वाद, रागातून आईकडूनच जुळ्या मुलांची हत्या, स्वत: चौथ्या मजल्यावरुन मारली उडी
19
तंत्र-मंत्र, जारण-मारण, गेंडे आणि म्हशी! आसाममध्ये गूढ जंगलात काळी जादू करणारं गाव

भारताबाहेरील लोकांना ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते

By योगेश पांडे | Updated: July 14, 2025 12:55 IST

सदानंद सप्रे : देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’चे डॉ. योगेश पांडे यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात विविध क्षेत्रांत सक्षम व कर्तृत्ववान असलेले लोक होऊन गेले आहेत. मात्र, भारताबाहेरील लोकांना जाणूनबुजून ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते. अशा तत्त्वांचा विरोध करताना सकारात्मकतेतून आदर्श प्रस्थापित करण्यावर भर असला पाहिजे. अशाच सकारात्मक विचारसरणीतूनच देवर्षी नारद हे पत्रकारांचे आदर्श असल्याची बाब प्रस्थापित झाली आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाह संस्थेचे अखिल भारतीय सदस्य सदानंद सप्रे यांनी केले. विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वनामती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, निवड समितीचे प्रमुख सुधीर पाठक व संघाचे प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध पत्रकार ऋचा अनिरुद्ध या ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होत्या. मुद्रित माध्यमांतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक डॉ. योगेश प्रकाश पांडे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय योगेंद्र तिवारी, नरेश शेळके, राखी चव्हाण, सतीश राऊत, आशिष भारतवंशी, दिवाकर सावरकर, तरुण जगनाडे, वैभव बावनकर, आरजे पल्लवी, ऐश्वर्या शिंदे, वेदिका मिश्रा, प्रियांशू चौधरी यांचाही पुरस्काराने सन्मान झाला. 

पत्रकारिता हे राष्ट्रसेवेचे माध्यम अनेक जण समजतात. मात्र, त्यातून केवळ व्यक्तिगत समाधान न मिळवता सर्वांनाच तसे करण्यावर भर असला पाहिजे, असे सप्रे म्हणाले. माध्यमांमध्ये वादविवाद दिसून येतो. मात्र कुटुंब व समाजातदेखील तशीच स्थितीत दिसून येते. जर माध्यमांत वाईट गोष्टी दाखविल्या जात असतील तर ते बघणे किंवा वाचणे आपण थांबवावे, असे मत राजेश लोया यांनी व्यक्त केले.पत्रकारांनी देशाकरिता काय योग्य आहे आणि काय नाही, याचा विचार करून बातम्या द्याव्या, असे आवाहन यावेळी सुधीर पाठक यांनी केले. जय गाला यांनी संचालन केले तर साक्षी सरोदेने वैयक्तिक गीत सादर केले.

‘रील’ संस्कृती पत्रकारितेसाठी घातक : ऋचा अनिरुद्धआजकाल प्रसारमाध्यमांतून एखादा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी त्यावर चर्चा घडविले जाते. त्यातही सध्या रील संस्कृती वाढली असून, ही पत्रकारितेच्या तत्त्व व दर्जासाठी घातक आहे. पत्रकारितेतून नकारात्मकता न मांडता समाजातील चांगल्या गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सध्या भाषेवरून होणारे वाद दुर्दैवी आहेत. पत्रकारांनी हा भाषावाद संपविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेदेखील त्या म्हणाल्या.

टॅग्स :nagpurनागपूरJournalistपत्रकार