शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : जड्डू -ब्रायडन कार्स यांच्यात टक्कर! मग वातावरण चांगलेच तापलं! नेमकं काय घडलं?
2
"तुला पक्षात यावं लागेल"; उद्धव ठाकरेंच्या ऑफरवर प्रवीण दरेकर म्हणाले, "मी बाळासाहेबांचा शिवसैनिक"
3
अस्तित्वातच नसलेला माणूस बनला जगातील बारावी सर्वात श्रीमंत व्यक्ती, कोण आहे तो? एवढी आहे एकूण संपत्ती
4
विमानांच्या इंजिन फ्यूल स्विचची तात्काळ तपासणी करावी; DGCA चा सर्व कंपन्यांना आदेश
5
याला म्हणतात ढासू शेअर...! 1 लाखाचे केले 3.7 कोटी, 5 वर्षांत दिला 36900% चा बंपर परतावा; करतोय मालामाल
6
7 रुपयांच्या शेअरची कमाल, 480% नं वाढलाय भाव; 19 दिवसांपासून लागतंय अप्पर सर्किट, करतोय मालामाल
7
IND vs ENG: लॉर्ड्सवर अक्षय कुमारसोबत मॅच बघायला आली 'ही' अभिनेत्री, एकेकाळी गाजवलंय बॉलिवूड
8
जिममध्ये चोरी करणं महागात पडलं, ट्रेनरनं अशी शिक्षा दिली की...; आता चोर कधी मनात चोरीचा विचारही आणणार नाही!
9
हिंदी-मराठी वादामुळे वाढलेला तणाव कमी करण्यासाठी काँग्रेसकडून आम्ही मराठी, आम्ही भारतीय भाषा, कार्यक्रमाचं मिरारोड येथे आयोजन
10
काव्या मारनचा अजब निर्णय ! ५० विकेट्सही न घेता आलेल्या गोलंदाजाला केलं SRH 'बॉलिंग कोच'
11
"सरकार आणि उद्योगपतींच्या फायद्यासाठी जनसुरक्षा कायदा, काँग्रेस त्याची प्रत्येक जिल्ह्यात होळी करणार”, हर्षवर्धन सपकाळ यांची घोषणा
12
पाकिस्तान जय श्रीरामच्या घोषणेने दुमदुमले; कराचीत मुस्लिम कलाकारांकडून रामलीलेचे सादरीकरण
13
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
14
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
15
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
16
नो टॅक्स, नो टेन्शन! 'या' देशांमध्ये श्रीमंत लोकही भरत नाहीत एक रुपयाही कर, मग पैसा कुठून येतो?
17
खऱ्या आयुष्यातही सचिवजी अन् रिंकी प्रेमात? सानविकाच्या 'त्या' उत्तरावर जितेंद्र लाजला
18
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा जास्त उकळणं आरोग्यासाठी हानिकारक, कारण...
19
वैभव सूर्यवंशीची स्फोटक फलंदाजीनंतर आता गोलंदाजीत कमाल! युवा टीम इंडियाकडून कसोटीत रचला इतिहास
20
"नाव घ्यायला भीती वाटते तर बोलू नका" ; आदित्य ठाकरेंनी चड्डी बनियन गॅँगचा उल्लेख करताच राणे संतापले

भारताबाहेरील लोकांना ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते

By योगेश पांडे | Updated: July 14, 2025 12:55 IST

सदानंद सप्रे : देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण, ‘लोकमत’चे डॉ. योगेश पांडे यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : अगदी प्राचीन काळापासून आपल्या देशात विविध क्षेत्रांत सक्षम व कर्तृत्ववान असलेले लोक होऊन गेले आहेत. मात्र, भारताबाहेरील लोकांना जाणूनबुजून ‘आयकॉन’ म्हणून माथी मारले जाते. अशा तत्त्वांचा विरोध करताना सकारात्मकतेतून आदर्श प्रस्थापित करण्यावर भर असला पाहिजे. अशाच सकारात्मक विचारसरणीतूनच देवर्षी नारद हे पत्रकारांचे आदर्श असल्याची बाब प्रस्थापित झाली आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा प्रवाह संस्थेचे अखिल भारतीय सदस्य सदानंद सप्रे यांनी केले. विश्व संवाद केंद्राच्या वतीने रविवारी आद्य पत्रकार देवर्षी नारद पत्रकारिता सन्मान पुरस्कारांचे वितरण झाले. त्यावेळी ते बोलत होते.

वनामती सभागृहात आयोजित या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, निवड समितीचे प्रमुख सुधीर पाठक व संघाचे प्रांत प्रचार प्रमुख संजय गुळवे प्रामुख्याने उपस्थित होते. याशिवाय प्रसिद्ध पत्रकार ऋचा अनिरुद्ध या ऑनलाइन माध्यमातून उपस्थित होत्या. मुद्रित माध्यमांतील उल्लेखनीय योगदानासाठी ‘लोकमत’चे मुख्य उपसंपादक डॉ. योगेश प्रकाश पांडे यांचा प्रमुख अतिथींच्या हस्ते सन्मान करण्यात आला. याशिवाय योगेंद्र तिवारी, नरेश शेळके, राखी चव्हाण, सतीश राऊत, आशिष भारतवंशी, दिवाकर सावरकर, तरुण जगनाडे, वैभव बावनकर, आरजे पल्लवी, ऐश्वर्या शिंदे, वेदिका मिश्रा, प्रियांशू चौधरी यांचाही पुरस्काराने सन्मान झाला. 

पत्रकारिता हे राष्ट्रसेवेचे माध्यम अनेक जण समजतात. मात्र, त्यातून केवळ व्यक्तिगत समाधान न मिळवता सर्वांनाच तसे करण्यावर भर असला पाहिजे, असे सप्रे म्हणाले. माध्यमांमध्ये वादविवाद दिसून येतो. मात्र कुटुंब व समाजातदेखील तशीच स्थितीत दिसून येते. जर माध्यमांत वाईट गोष्टी दाखविल्या जात असतील तर ते बघणे किंवा वाचणे आपण थांबवावे, असे मत राजेश लोया यांनी व्यक्त केले.पत्रकारांनी देशाकरिता काय योग्य आहे आणि काय नाही, याचा विचार करून बातम्या द्याव्या, असे आवाहन यावेळी सुधीर पाठक यांनी केले. जय गाला यांनी संचालन केले तर साक्षी सरोदेने वैयक्तिक गीत सादर केले.

‘रील’ संस्कृती पत्रकारितेसाठी घातक : ऋचा अनिरुद्धआजकाल प्रसारमाध्यमांतून एखादा मुद्दा महत्त्वाचा नसला तरी त्यावर चर्चा घडविले जाते. त्यातही सध्या रील संस्कृती वाढली असून, ही पत्रकारितेच्या तत्त्व व दर्जासाठी घातक आहे. पत्रकारितेतून नकारात्मकता न मांडता समाजातील चांगल्या गोष्टीही लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले. सध्या भाषेवरून होणारे वाद दुर्दैवी आहेत. पत्रकारांनी हा भाषावाद संपविण्याचा प्रयत्न केला पाहिजे, असेदेखील त्या म्हणाल्या.

टॅग्स :nagpurनागपूरJournalistपत्रकार