शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

पेंचच्या पाण्याचा पेच कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:53 IST

जिल्ह्यातील धानपट्टा म्हणून रामटेक आणि मौदा तालुक्याची काहीशी ओळख आहे. या दोन्ही तालुक्यांची भिस्त पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. पेंचमधून कालव्याद्वारे पाणी मिळाल्यास धानाचे भरघोस उत्पादन घेतले जाते. यासाठी चार पाळ्यांमध्ये धानाला पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र पाणीसाठा अल्प असल्याचे कारण समोर करीत पाण्याची काटकसर केली जाते. परिणामी धानाला याचा फटका बसतो. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी गेल्या वर्षी आंदोलनेही झाली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. दुसरीकडे पेंचच्या पाण्यावरून वर्षभरापासून राजकारण केले जात असल्याचे वास्तव दिसून येते.

ठळक मुद्देधान उत्पादकांना पाण्याची प्रतीक्षा : पाण्यावरून होतेय वर्षभरापासून राजकारण

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील धानपट्टा म्हणून रामटेक आणि मौदा तालुक्याची काहीशी ओळख आहे. या दोन्ही तालुक्यांची भिस्त पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. पेंचमधून कालव्याद्वारे पाणी मिळाल्यास धानाचे भरघोस उत्पादन घेतले जाते. यासाठी चार पाळ्यांमध्ये धानाला पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र पाणीसाठा अल्प असल्याचे कारण समोर करीत पाण्याची काटकसर केली जाते. परिणामी धानाला याचा फटका बसतो. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी गेल्या वर्षी आंदोलनेही झाली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. दुसरीकडे पेंचच्या पाण्यावरून वर्षभरापासून राजकारण केले जात असल्याचे वास्तव दिसून येते.एकट्या रामटेक तालुक्यात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र २८ हजार ५०० हेक्टर एवढे असून, त्यापैकी तब्बल १५ हजार १०१ हेक्टरमध्ये धानाची लावगड केली जाते. हीच स्थिती मौदा तालुक्यात आहे. लागवडीच्या क्षेत्रापैकी अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. धान पीक हे पूर्णत: निसर्गावर अवलंबून असते. त्यातच या पिकाला पुरेपूर आणि वेळेवर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे दोन्ही तालुके हे पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबून असतात. पेंच प्रकल्पात सध्याच्या घडीला ५५.३५ टक्के पाणीसाठा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा होतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मध्य प्रदेशातील चौराई धरणाचा फटका या प्रकल्पाला बसत आहे. सिंचनासोबतच नागपूरकरांची तहान पेंच प्रकल्पातील पाण्याने भागते. त्यामुळे आधी पिण्यासाठी पाणी की सिंचनासाठी, असा प्रश्न प्रशासनाला पडतो. त्यातूनच सिंचनामध्ये काटकसर करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच धान पिकाला चार पाळ्यांऐवजी तीन पाळ्यांमध्ये पाणी दिले जाते. त्याचा फटका धानाला प्रचंड प्रमाणात बसतो. ऐन गरजेच्या वेळी आणि धान निघण्याच्या काही दिवसांपूर्वी पाण्याची गरज असताना पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.धानाला चार पाळ्यांमध्ये पाणी मिळावे, यासाठी मागील वर्षी रामटेक, मौदा तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्याचे लोण पारशिवनीतही पोहोचले. पाण्याच्या मुद्यावर गेल्या वर्षभरापासून राजकारण केले जात आहे. आंदोलन, आंदोलनाचा इशारा हा ‘राजकीय स्टंट’ आहे, हे आता धान उत्पादकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ही राजकीय नौटंकी थांबवा, अशी मागणी धान उत्पादक करू लागले आहे. आम्हाला चार पाळ्यांमध्ये पाणी द्या, अशी रास्त मागणी शेतकरी करू लागले आहे.चार पाळ्यांमध्ये पाण्याची आवश्यकतारामटेक क्षेत्राचे माजी आ. आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेल्या वर्षी अर्थात २०१७ मध्येच याचिका दाखल केली. त्यात त्यांनी शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी नागपूर शहराला पळवून लावल्याचा आरोप केला. नागपूर शहराला १९० दलघमी पाणी आरक्षित केले असून ते अवैध आहे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले. धरणाचा पाणीसाठा ९६५ दलघमी एवढा असून त्यातील १५ टक्के म्हणजेच १०५ दलघमी पाणी हे घरगुती वापरासाठी देता येईल, असे प्राधिकरणने म्हटले होते. परंतु तुटीचे वर्ष असल्यास त्यात कपात करण्याची मागणी जयस्वाल यांनी केली. शेतकऱ्यांना पाणी द्यावे, ही त्यांची मागणी आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचा एकतर्फी लढा सुरू आहे. परंतु यावर सुनावणी, आदेश एवढेच सुरू आहे. अंतिम निर्णयापर्यंत हे प्रकरण पोहोचले नाही. दुसरीकडे या एका मुद्यावरून रामटेक तालुक्यात राजकारण सुरू आहे. रामटेकमध्ये मागासलेलीे, अविकसित अशी अनेक गावे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र कुणीही पुढाकार घेत नाही. राजकीय नेत्यांनी पाण्यासाठी राजकारण न करता शेतकऱ्यांना चार पाळ्यांमध्ये पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी