शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

पेंचच्या पाण्याचा पेच कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2018 22:53 IST

जिल्ह्यातील धानपट्टा म्हणून रामटेक आणि मौदा तालुक्याची काहीशी ओळख आहे. या दोन्ही तालुक्यांची भिस्त पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. पेंचमधून कालव्याद्वारे पाणी मिळाल्यास धानाचे भरघोस उत्पादन घेतले जाते. यासाठी चार पाळ्यांमध्ये धानाला पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र पाणीसाठा अल्प असल्याचे कारण समोर करीत पाण्याची काटकसर केली जाते. परिणामी धानाला याचा फटका बसतो. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी गेल्या वर्षी आंदोलनेही झाली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. दुसरीकडे पेंचच्या पाण्यावरून वर्षभरापासून राजकारण केले जात असल्याचे वास्तव दिसून येते.

ठळक मुद्देधान उत्पादकांना पाण्याची प्रतीक्षा : पाण्यावरून होतेय वर्षभरापासून राजकारण

गणेश खवसे ।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जिल्ह्यातील धानपट्टा म्हणून रामटेक आणि मौदा तालुक्याची काहीशी ओळख आहे. या दोन्ही तालुक्यांची भिस्त पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर आहे. पेंचमधून कालव्याद्वारे पाणी मिळाल्यास धानाचे भरघोस उत्पादन घेतले जाते. यासाठी चार पाळ्यांमध्ये धानाला पाणी मिळणे गरजेचे आहे. मात्र पाणीसाठा अल्प असल्याचे कारण समोर करीत पाण्याची काटकसर केली जाते. परिणामी धानाला याचा फटका बसतो. ही बाब लक्षात घेता शेतकऱ्यांना पाणी मिळावे, यासाठी गेल्या वर्षी आंदोलनेही झाली. परंतु त्याचा काहीएक फायदा झाला नाही. दुसरीकडे पेंचच्या पाण्यावरून वर्षभरापासून राजकारण केले जात असल्याचे वास्तव दिसून येते.एकट्या रामटेक तालुक्यात पिकाचे लागवडीखालील क्षेत्र २८ हजार ५०० हेक्टर एवढे असून, त्यापैकी तब्बल १५ हजार १०१ हेक्टरमध्ये धानाची लावगड केली जाते. हीच स्थिती मौदा तालुक्यात आहे. लागवडीच्या क्षेत्रापैकी अर्ध्यापेक्षा जास्त क्षेत्रामध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. धान पीक हे पूर्णत: निसर्गावर अवलंबून असते. त्यातच या पिकाला पुरेपूर आणि वेळेवर पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे दोन्ही तालुके हे पेंच प्रकल्पाच्या पाण्यावर विसंबून असतात. पेंच प्रकल्पात सध्याच्या घडीला ५५.३५ टक्के पाणीसाठा आहे. दरवर्षी पावसाळ्यात या प्रकल्पात १०० टक्के पाणीसाठा होतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून मध्य प्रदेशातील चौराई धरणाचा फटका या प्रकल्पाला बसत आहे. सिंचनासोबतच नागपूरकरांची तहान पेंच प्रकल्पातील पाण्याने भागते. त्यामुळे आधी पिण्यासाठी पाणी की सिंचनासाठी, असा प्रश्न प्रशासनाला पडतो. त्यातूनच सिंचनामध्ये काटकसर करून पिण्याच्या पाण्याला प्राधान्य दिले जाते. त्यामुळेच धान पिकाला चार पाळ्यांऐवजी तीन पाळ्यांमध्ये पाणी दिले जाते. त्याचा फटका धानाला प्रचंड प्रमाणात बसतो. ऐन गरजेच्या वेळी आणि धान निघण्याच्या काही दिवसांपूर्वी पाण्याची गरज असताना पाणी मिळत नाही, ही वस्तुस्थिती आहे.धानाला चार पाळ्यांमध्ये पाणी मिळावे, यासाठी मागील वर्षी रामटेक, मौदा तालुक्यात ठिकठिकाणी आंदोलने झाली. त्याचे लोण पारशिवनीतही पोहोचले. पाण्याच्या मुद्यावर गेल्या वर्षभरापासून राजकारण केले जात आहे. आंदोलन, आंदोलनाचा इशारा हा ‘राजकीय स्टंट’ आहे, हे आता धान उत्पादकांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे ही राजकीय नौटंकी थांबवा, अशी मागणी धान उत्पादक करू लागले आहे. आम्हाला चार पाळ्यांमध्ये पाणी द्या, अशी रास्त मागणी शेतकरी करू लागले आहे.चार पाळ्यांमध्ये पाण्याची आवश्यकतारामटेक क्षेत्राचे माजी आ. आशिष जयस्वाल यांनी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाकडे गेल्या वर्षी अर्थात २०१७ मध्येच याचिका दाखल केली. त्यात त्यांनी शेतकऱ्याच्या हक्काचे पाणी नागपूर शहराला पळवून लावल्याचा आरोप केला. नागपूर शहराला १९० दलघमी पाणी आरक्षित केले असून ते अवैध आहे, असे त्यांनी याचिकेत नमूद केले. धरणाचा पाणीसाठा ९६५ दलघमी एवढा असून त्यातील १५ टक्के म्हणजेच १०५ दलघमी पाणी हे घरगुती वापरासाठी देता येईल, असे प्राधिकरणने म्हटले होते. परंतु तुटीचे वर्ष असल्यास त्यात कपात करण्याची मागणी जयस्वाल यांनी केली. शेतकऱ्यांना पाणी द्यावे, ही त्यांची मागणी आहे. गेल्या वर्षभरापासून त्यांचा एकतर्फी लढा सुरू आहे. परंतु यावर सुनावणी, आदेश एवढेच सुरू आहे. अंतिम निर्णयापर्यंत हे प्रकरण पोहोचले नाही. दुसरीकडे या एका मुद्यावरून रामटेक तालुक्यात राजकारण सुरू आहे. रामटेकमध्ये मागासलेलीे, अविकसित अशी अनेक गावे आहेत. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मात्र कुणीही पुढाकार घेत नाही. राजकीय नेत्यांनी पाण्यासाठी राजकारण न करता शेतकऱ्यांना चार पाळ्यांमध्ये पाणी कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.

टॅग्स :WaterपाणीFarmerशेतकरी