शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
2
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
3
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
4
नॉक आऊट सामन्यात DC चा पलटवार; अभिषेक, होप, रिषभ, स्तब्स यांची फटकेबाजी
5
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
6
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
7
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
8
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
9
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
10
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
11
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
12
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
13
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
14
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
15
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
16
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
17
T20 World Cup मध्ये भारताची डोकेदुखी वाढवणारी बातमी! ICC च्या नियमामुळे गोंधळ 
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

अंडा बिर्याणीतून प्रवाशांना विषबाधा, ६० ते ७० प्रवासी अस्वस्थ

By नरेश डोंगरे | Published: April 28, 2024 4:43 PM

रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत.

नागपूर : रेल्वेच्या जन आहार स्टॉलवरून मागविण्यात आलेल्या अंडा बिर्याणीतून ६० ते ७० प्रवाशांना विषबाधा झाली. या सर्वांवर इटारसी, कानपूर, झांसी आधी ठिकाणी उपचार सुरू आहेत. शुक्रवारी घडलेल्या या घटनेची माहिती पुढे आल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाला प्रचंड हादरा बसला आहे.

संबंधित सूत्राच्या माहितीनुसार, यशवंतपुर एक्सप्रेस शुक्रवारी सकाळी गोरखपूरकडे जात असताना बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून जन आहार स्टॉल मधून अंडा बिर्याणीचे शंभर पार्सल मागविन्यात आले. नागपूर रेल्वे स्थानकावरच्या स्टॉल वर त्यातील काही उतरविण्यात आले होते. मागणीप्रमाणे बल्लारशाह, नागपूर, इटारसी आणि पुढे अंडा बिर्याणी वेगवेगळ्या प्रवाशांना देण्यात आली. न इटारसी जवळ ही गाडी पोहोचल्यानंतर अंडा बिर्याणी खाणाऱ्या प्रवाशांना पोटदुखी, मळमळ ओकाऱ्याचा त्रास सुरू झाला.

प्रवासी वेगवेगळ्या आसनावर, वेगवेगळ्या डब्यात असल्याने प्रारंभी या घटनेचे गांभीर्य कोणाच्या लक्षात आले नाही. मात्र, इटारसी स्टेशन सोडल्यानंतर विविध डब्यातून एक सारखा त्रास होऊ लागल्याने प्रवासी अस्वस्थ झाले. ही माहिती रेल्वे प्रशासनाला कळताच कानपूर रेल्वे स्थानकावर डॉक्टरांचे पथक गाडीत चढले आणि प्रवाशांचा उपचार सुरू झाला. काही प्रवाशांना फूड पॉईजनचे गंभीर लक्षण दिसू लागल्याने त्यांना वेगवेगळ्या रेल्वे स्थानकावरील रुग्णालयात दाखल करण्यात आले. दरम्यान, अंडा बिर्याणी खाल्ल्यानंतर प्रवाशांना विषबाधा झाल्याचे लक्षात येताच संबंधित अधिकाऱ्यांनी मध्य रेल्वेच्या सर्व वरिष्ठांना कळविले.

नागपूरच्या अधिकाऱ्यांना ही माहिती कळाल्यानंतर त्यांनी अंडा बिर्याणीचे पार्सल नेमके कुठून आले आणि प्रवाशांना कुठून देणे सुरू झाले त्याची चौकशी सुरू केली.. त्यानंतर १०० ते २०० प्लेट अंडा बिर्याणी पार्सलचा पुरवठा बल्लारशाह रेल्वे स्थानकावरून झाल्याचे आणि नागपूर रेल्वे स्थानकावरूनही जन आहार स्टॉल वरून बरेचसे पाकीट रेल्वे गाड्यात चढविण्यात आल्याचे सीसीटीव्हीतून स्पष्ट झाले. त्यामुळे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक मनीष अग्रवाल, वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी या घटनेची गंभीर दखल घेऊन संबंधित पार्सल विकणाऱ्या येथील जन आहार चा स्टॉल सिल केला.

सॅम्पल जप्त, तपासणीसाठी लॅबमध्ये 

या घटनेची मध्य रेल्वे प्रशासनाने गंभीर दखल घेतली असून नागपूर तसेच बल्लारशाह या दोन्ही केंद्रावरील विविध खाद्यपदार्थाचे सॅम्पल जप्त करण्यात आले. ते लॅब मध्ये टेस्टिंगसाठी पाठविण्यात आले असून मंगळवारपर्यंत त्याचा अहवाल मिळणार आहे. त्यानंतर कारवाईचे स्वरूप ठरविण्यात येईल, अशी माहिती वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक अमन मित्तल यांनी लोकमाशी बोलताना दिली. 

टॅग्स :nagpurनागपूरfood poisoningअन्नातून विषबाधाrailwayरेल्वे