शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
2
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
3
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
4
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
5
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
6
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
7
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
8
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
9
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   
10
आता पश्चाताप करून काय उपयोग? रोखण्याचा प्रयत्न करूनही तरुणीनं खोल पाण्यात उडी घेतली; थरकाप उडवणारा VIDEO
11
सासऱ्यावर गोळी झाडली, स्वतःला वाचवण्यासाठी पळत सुटला अन् पुराच्या पाण्यात पडला जावई! पुढे जे झालं...
12
असुरक्षित! पहाटे पुणे स्टेशनला उतरलेल्या तरुणाने पैसे न दिल्याने पोटात चाकूने वार
13
उल्हासनगरातील हॅन्ड्रेड बारमध्ये महिला वेटर्सचे अश्लील चाळे, महिला वेटर्ससह ९ जणांवर गुन्हा 
14
घरात ‘टॉप टू बॉटम’ डॉक्टर ; पण आयएएस झाले आणि लोकसेवेत आले...
15
योगेश आळेकरी यांना मिळाली नवीकोरी दुचाकी; पुढच्या प्रवासाला सुरुवात करणार पण...
16
Sonu Sood : दिलदार सुपरहिरो! "रोटी का कर्ज चुकाना है"; पंजाबमधील पूरग्रस्तांसाठी सोनू सूदचा पुढाकार
17
मध्य प्रदेश मुख्यमंत्र्यांचा 'ऑन द स्पॉट' निर्णय; महिंद्राचा रतलामचा डीलर ४२० मध्ये तुरुंगात जाणार...
18
'तुम्ही जीआरमध्ये फेरफार करून बघा, मग तुम्हाला मराठे कळतील'; मनोज जरांगेंचा इशारा
19
VIRAL : चोरांनी कार चालकावर झाडली गोळी, पण पुढे जे झालं त्यानं स्वतःच घाबरले! Video बघून सगळेच झाले हैराण
20
या सुंदर प्रदेशावर हिंसाचाराची सावली पडलेली; पंतप्रधान नरेंद्र मोदी मणिपूरमध्ये, म्हणाले...

पालकांना मराठी माध्यमाची ॲलर्जी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:11 IST

खेडोपाडी उघडली कॉन्व्हेंट : सरकारनेच निर्माण केली स्पर्धा नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याचे अनेक उच्चपदस्थ मंडळी मोठ्या अभिमानाने ...

खेडोपाडी उघडली कॉन्व्हेंट : सरकारनेच निर्माण केली स्पर्धा

नागपूर : जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकल्याचे अनेक उच्चपदस्थ मंडळी मोठ्या अभिमानाने सांगतात. आता काळ बदलला, खासगी शाळांचे पेव फुटले. आता इंग्रजी माध्यमाच्या शाळा खेड्यापाड्यापर्यंत पोहोचल्या. तिथले स्टॅण्डर्ड पालकांना भावले. इंग्रजी शिक्षणाचे महत्व वाढल्याने मराठी शाळांकडे पालकांनी दुर्लक्ष केले.

अशात निर्माण झालेल्या स्पर्धेत जिल्हा परिषदेच्या शाळा तग धरू शकल्या नाहीत. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांचा पट

दरवर्षी घसरायला लागला. सध्या जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या जेवढ्या शाळा आहेत, तेवढ्याच शाळा खासगी अनुदानित व विना

अनुदानितच्या आहेत. तेथील विद्यार्थी संख्या आणि जिल्हा परिषदेच्या विद्यार्थी संख्येत कमालीची तफावत आहे.

विशेष म्हणजे जिल्हा परिषदेच्या शाळांवर दरवर्षी कोट्यावधी रुपयांचा खर्च केला जातो. विद्यार्थ्यांच्या आरोग्याची तपासणी,

पौष्टीक आहार, मोफत गणवेश, मोफत पुस्तके, अपघात विमा अशा अनेक सुविधा देत असतानाही जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या घसरतच आहे.

-मोठ्या शिक्षण संस्थांचे ग्रामीणमध्ये वाढते प्रस्थ

कमी किमतीत जमिनी मिळत असल्याने मोठमोठ्या शिक्षण संस्थांनी ग्रामीणमध्ये आपले प्रस्थ निर्माण केले आहे.

आकर्षक शाळा, भव्य पटांगण, सोयी सुविधा या संस्थांनी उपलब्ध केल्या आहेत. वाहनांची व्यवस्था उपलब्ध करून दिल्याने

शहरातील विद्यार्थीदेखील ग्रामीण भागात शिकायला जात आहेत. या शाळांचे आकर्षण ग्रामीण पालकांमध्ये वाढत

आहे.

- जिल्ह्यातील शाळा

जिल्हा परिषदेच्या शाळा - १,५३० विद्यार्थी संख्या ६६,००० एकूण शिक्षक ४,३००

अनुदानित शाळा - १,२०२ विद्यार्थी संख्या ४,३४,०००, एकूण शिक्षक - १४,९७२

विनाअनुदानित शाळा - १,१५५ विद्यार्थी संख्या ३,२४,०००, एकूण

शिक्षक १३,४५०

- इंग्रजीचे शिक्षण चांगले असे पालकांचे मत आहे. सोबतच स्टॅण्डर्डपणा वाढला आहे. आजच्या घडीला जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची सरासरी सेवा २० वर्षांची झाली आहे. गाठीशी दांडगा अनुभव आहे. पण, पालक त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे पालकांचे मत परिवर्तन करणे गरजेचे आहे.

अनिल नासरे, शिक्षक

- सरकारने शाळा वाटल्या त्या मुलांचे शिक्षण व्हावे, या उद्देशाने वाटल्या नाहीत, तर जिल्हास्तरावरील

कार्यकर्त्यांना सांभाळण्यासाठी संस्था दिल्या आणि शाळा उभ्या केल्या. या राजकारण्यांच्या शाळा चालल्या पाहिजेत म्हणून अधिकाऱ्यांवर दबाव असतो. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळांकडे त्यांचे दुर्लक्ष असते.

प्रसन्नजित गायकवाड, शिक्षक