शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
4
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
5
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
6
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
7
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
8
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
9
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
10
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
11
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
12
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
13
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
14
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
15
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
16
कार, बस, ट्रेन की विमान...केदारनाथ यात्रेसाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? जाणून घ्या...
17
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
18
'राजा शिवाजी'च्या एका सीनवरुन भाजप कार्यकर्त्याचा सवाल, रितेश देखमुखचं थेट उत्तर; म्हणाला...
19
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
20
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना संसर्गाच्या भीतीतही सोडवला पेपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा अखेर रविवारी पार पडली. नागपुरात परीक्षार्थ्यांनी कोरोना ...

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : महाराष्ट्र लोक सेवा आयोगाची (एमपीएससी) पूर्व परीक्षा अखेर रविवारी पार पडली. नागपुरात परीक्षार्थ्यांनी कोरोना संसर्गाच्या भीतीतही पेपर सोडवला. परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर कोरोनाच्या

भीतीपासून मुक्त ठेवण्यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात आलेल्या होत्या. येथे विद्यार्थ्यांसाठी मास्क, हॅण्डग्लोव्हज्, सॅनिटायझर देण्यात आले होते. यासोबतच एमपीएससीतर्फे जारी गाईडलाईननुसार बैठक व्यवस्था करण्यात आली होती. कोरोना संसर्गित व कोविडची लक्षणे असलेल्या परीक्षार्थ्यांसाठी सुद्धा स्वतंत्र बैठक व्यवस्थेसह पीपीई किटचीही व्यवस्था ठेवण्यात आली होती. परंतु मिळालेल्या माहितीनुसार शहरात कुठल्याही केंद्रावर कोविड रुग्ण किंवा लक्षणे असलेला एकही विद्यार्थी आला नाही. बहुतांश केंद्रांवर परीक्षार्थ्यांची उपस्थिती ७० ते ७२ टक्के राहिली. काही परीक्षा केंद्रांवर ८० ते ९५ टक्के इतकी उपस्थिती होती. केंद्रांवर दोन सत्रात परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते. दोन्ही सत्रातील परीक्षा शांततेत पार पडली. कुठल्याही केंद्रावर अनुचित घटनेची तक्रार मिळाली नाही. पेपर सोडविल्यानंतर केंद्रातून बाहेर पडलेल्या काही परीक्षार्थ्यांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, अनेकदा ही परीक्षा रद्द झाली. त्यामुळे निराशा निर्माण झाली होती. तसेच तणावही होता. काही दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांनी आंदोलन केल्याने परीक्षा घेण्यात आली. परंतु पूर्वीसारखा उत्साह नव्हता. पेपर चांगला सोडवला. आता निकालच सांगेल की पेपर कसा गेला. परीक्षा केंद्रांवर करण्यात आलेल्या सुरक्षेच्या उपायांवर परीक्षार्थ्यांनी समाधान व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, केंद्रावर येण्यापूर्वी त्यांच्या मनात अनेक शंका होत्या. कोरोना संसर्गाची भीतीही होती. परंतु केंद्रावर केलेल्या सुरक्षेच्या व्यवस्थेमुळे समाधान वाटले.

बॉक्स

पोलिसांनी केले सहकार्य

कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरात ठिकठिकाणी पोलीस तैनात आहेत. यामुळे परीक्षा केंद्रांवर जाण्यासाठी त्रास सहन करावा लागेल, अशी परीक्षार्थ्यांना शंका होती. त्यांची ही चिंता लक्षात घेऊन एक दिवसापूर्वीच वाहतूक पोलीस विभागातर्फे परीक्षार्थ्यांना परीक्षा केंद्रांवर पोहोचण्यासाठी कुठलाही त्रास होणार नाही, असा विश्वास देण्यात आला होता. रविवारी हा विश्वास सार्थही ठरला. परीक्षेसाठी जाणाऱ्या परीक्षार्थ्यांना प्रवेशपत्र दाखवताच कुठलीही विचारपूस न करता जाऊ देण्यात आले. त्यामुळे सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षार्थी वेळेवर पोहोचले.