शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
८०० दिवसांहून अधिक काळ सुरू असलेले युद्ध संपणार? व्लादिमीर पुतिन यांचं युक्रेनबाबत मोठं वक्तव्य
3
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
4
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
5
सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट; नांदुरघाटमध्ये दोन गटांत तुफान दगडफेक
6
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
7
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
8
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
9
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
10
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
11
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
12
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
13
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
14
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
15
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
16
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
17
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
18
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

पानठेले, 'बीअर बार'मधील गर्दीमुळे 'कोरोना' होत नाही का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 17, 2020 11:10 PM

‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद्याप दिलेले नाहीत.

ठळक मुद्देशाळा-महाविद्यालये बंद, यांनाच सूट का? : जिल्हा प्रशासनाचे दुर्लक्ष

 लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : ‘कोरोना’चा संसर्ग आणखी पसरू नये यासाठी राज्य सरकारने शाळा-महाविद्यालये, मॉल्स बंद करण्याचा स्तुत्य निर्णय घेतला. परंतु शहरातील रेस्टॉरेन्ट्स, मोठी हॉटेल्स, पानठेले, ‘वाईन शॉप्स’ व ‘बीअर बार’ येथील गर्दीवर प्रतिबंध घालण्याचे कुठलेही निर्देश सरकारने अद्याप दिलेले नाहीत. त्यामुळे या ठिकाणच्या गर्दीमुळे ‘कोरोना’चा संसर्ग होत नाही का, असा उपरोधिक सवाल सामान्य नागरिकांमध्ये उपस्थित होत आहे.एकीकडे सरकारी कार्यालयांमध्येही गर्दी टाळण्याचे आवाहन सरकारने केले आहे. परंतु कोरोनाला खरोखरच प्रतिबंध घालायचा असेल तर पानठेले, बीअर बार, वाईन शॉप्स व रेस्टॉरेन्ट्समधील गर्दीवरदेखील आळा घालणे तेवढेच आवश्यक असल्याचे आरोग्य क्षेत्रातील मान्यवरांनी म्हटले आहे.सध्या नागपूर शहरात ‘कोरोना’ दुसऱ्या टप्प्यात आहे. तो जर तिसºया किंवा चौथ्या टप्प्यामध्ये गेला तर नागपुरात हाहाकार माजेल. शहरातील फुटपाथवरील हातठेले, पानठेले, हॉटेल्स, बीअर बार आणि वाईन शॉप्स या ठिकाणी आरोग्याबाबत कुठलीही काळजी घेतली जात नसल्याचे ‘लोकमत’ चमूला आढळून आले आहे.शहरातील बहुतांश पानठेल्यांवर दिवसभर गर्दी असते. त्या परिसरात जागोजागी लोक थुंकताना दिसून येतात. शिवाय खर्रा खाणारे लोक शहरभर ‘पिचकाºया’ मारत असतात. ‘बीअर बार’ व ‘वाईन्स शॉप’मध्ये तर सायंकाळनंतर जास्त गर्दी होते. तेथे ना तपासणी होत आहे ना कुणी ‘मास्क’ किंवा ‘सॅनिटायझर’चा वापर करत आहे. येथून संक्रमित होऊन नागरिक शहरात वेगवेगळ््या ठिकाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे यासंदर्भात तातडीने पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत सामाजिक वर्तुळातूनदेखील व्यक्त होत आहे.दारू, खर्रा जीवनावश्यक बाबी नाहीत‘कोरोना’वर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने चार दिवस उपरोक्त ठिकाणे बंद केली तर काही आभाळ कोसळणार नाही किंवा कुणी मृत्युमुखीदेखील पडणार नाही. दारू, खर्रा या गोष्टी काही जीवनावश्यक वस्तू किंवा औषधे म्हणून गणली जात नाही. मग अशा वेळी जिल्हा प्रशासन याकडे का दुर्लक्ष करत आहे, असा सवाल नागरिकांमधून केला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर