शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
3
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
4
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
5
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
6
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
7
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
8
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
9
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
10
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
11
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
12
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
13
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
14
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!
15
सोन्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा? SBI ची मोठी मागणी, म्हणाले घरांमध्ये पडून असलेलं सोनं..
16
मोठी बातमी! पार्थ पवार जमीन व्यवहार प्रकरणी तहसीलदार सूर्यकांत येवले निलंबित
17
बिहार निवडणूक 2025: व्होटर स्लीपशिवाय मतदान नाही! सकाळी ६.३० वाजल्यापासून रांगेत असलेल्या महिलांना रोखले
18
चारित्र्यावर संशय! रस्त्यात दुसऱ्या तरुणासोबत बोलली म्हणून संतापलेल्या पतीने ब्लेडने कापले पत्नीचे नाक
19
याला म्हणतात ऑफर...! Tata च्या इलेक्ट्रिक कारवर ₹1.30 लाखांपर्यंतची सूट, Curvv EV अन् Punch EV वर मोठा डिस्काउंट
20
तो प्रवास ठरला अखेरचा..; प्रसिद्ध ट्रॅव्हल इन्फ्लुएंसर अनुनय सूदचे 32व्या वर्षी निधन

पं. कुमार गंधर्व जन्म शताब्दी: संगीत महोत्सवाचा थाटात समारोप, शास्त्रीय सुरावटींची रसाळ मेजवानी ठरला ‘कालजयी’

By नरेश डोंगरे | Updated: February 18, 2024 22:52 IST

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली.

       नागपूर : शास्त्रीय संगिताची रुची असलेल्या श्रोत्यांसाठी नागपुरात दोन दिवसांपासून सुरू असलेला ‘कालजयी’ महोत्सव रसाळ संगीताची मेजवानी ठरला. आज या संगीत महोत्सवाचा समारोप झाला.

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मविभूषण पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान व सप्तक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कालजयी’ या दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन्ही दिवस कलावंतांच्या सादरीकरणाने श्रोते अक्षरश: चिंब झाले. गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्रीने आज सुरूवात केली. त्यांनी विलंबित एकतालात निबद्ध बंदिश ‘केसर रंग श्याम छाई’ सादर करून सभागृहातील वातावरण भारावून टाकले. तबल्यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तानपु-यावर वैष्णवी भालेराव तसेच वल्लरी मांडवगणे यांनी त्यांना साथ दिली. कलापिनी कोमकली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

बनारस घराण्याचे युवा शास्त्रीय गायक बंधू डॉ. प्रभाकर व डॉ. दिवाकर कश्यप यांचे गायन झाले. राग गोरख कल्याण मध्ये निबद्ध विलंबित एकतालातील रचना ‘कैसे धीर धरू नाथ तुमरे बिन’ आणि त्यानंतर मध्य लय तीन तालातील बंदिश ‘कजरारे कारे’ सादर केली. संवादिनीवर श्रीकांत पिसे, तबल्यावर रामेंद्र सिंग सोलंकी, तानपु-यावर भरत बिदुवा व शुभम ठाकूर यांनी उत्तम साथ दिली. भुवनेश कोमकली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवाचा समारोप जयपूर-अतरौली घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर यांच्या गायनाने झाला. त्यांच्या गायकीलाही रसिकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, पं. सतीश व्यास, डॉ. साधना शिलेदार, निवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाला यशस्वी करण्याकरीता श्रीकांत देशपांडे, नितीन सहस्त्रबुद्धे, प्रदीप मुन्शी, रवी डोंगरे, अॅड. गौरव बेलसरे, डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, उदय पाटणकर यांनी परिश्रम घेतले.

कुमारजींच्या सांगीतिक योगदानावर चर्चा‘कालजयी’ अंतर्गत रविवारी सकाळी सायंटिफिक सभागृहात 'कुमारजींच्या सांगीतिक योगदान’ विषयावर चर्चासत्र पार पडले. यात डॉ. साधना नाफडे, पं. सतीश व्यास व केशव चैतन्य कुंटे यांनी सहभाग नोंदवला. स्वतःची गायकी समृद्ध करतानाच पं. कुमार गंधर्व यांनी संगीताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. साधना शिलेदार म्हणाल्या. ग्वाल्हेर घराण्याचे असूनसुद्धा कुमारजींनी स्वतःची स्वतंत्र शैली तयार केली होती. गाण्यातील टोन्स, रागांचे प्रोफाइल, स्वरांची घनता, वेगवेगळ्या व्हॉल्युम्स याचा त्यांनी शोध घेतला आणि अभ्यास केला. लोकसंगीताला शास्त्रीय संगीताशी जोडून त्यांनी ११ रागांची निर्मिती केली. लोकसंगीताची धून यातून रागनिर्मितीची प्रेरणा मिळाल्याने ते धून-उगम राग म्हणवले गेले, असेही त्या म्हणाल्या.

पं. सतीश व्यास यांनी कुमार गंधर्व हे असामान्य प्रतिभेचे धनी असल्याचे म्हटले. त्यांची शिस्त, तत्व, प्रेमळ स्वभाव, लोकांमध्ये केवळ चांगले तेच बघण्याचा त्यांचा गुण त्यांना असामान्य बनविणारा ठरला. केशव चैतन्य कुंटे यांनी 'हे मोहना कान्हा' ही मराठी बंदीश ऐकवून कुमारजींनी निर्माण केलेले राग आणि त्यामागचा विचार यावर प्रकाश टाकला. कुमार गंधर्व यांच्या देहबोलीतून गाण्याबद्दलचा त्यांचा विचार व्यक्त व्हायचा, असेही ते म्हणाले. यावेळी चैतन्य कुंटे, पद्मश्री उमाकांत गुंदेचा, भुवनेश कोमकली, कलापिनी कोमकली आदी उपस्थित होते.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर