शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

पं. कुमार गंधर्व जन्म शताब्दी: संगीत महोत्सवाचा थाटात समारोप, शास्त्रीय सुरावटींची रसाळ मेजवानी ठरला ‘कालजयी’

By नरेश डोंगरे | Updated: February 18, 2024 22:52 IST

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली.

       नागपूर : शास्त्रीय संगिताची रुची असलेल्या श्रोत्यांसाठी नागपुरात दोन दिवसांपासून सुरू असलेला ‘कालजयी’ महोत्सव रसाळ संगीताची मेजवानी ठरला. आज या संगीत महोत्सवाचा समारोप झाला.

शनिवारी सायंकाळी या महोत्सवाला प्रारंभ झाला होता. आजच्या दुसऱ्या आणि समारोपीय दिवसाला प्रसिद्ध शास्त्रीय गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्री मध्ये विविध बंदिशी सादर करून श्रोत्यांची प्रचंड दाद मिळवली.

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पद्मविभूषण पं. कुमार गंधर्व यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कुमार गंधर्व प्रतिष्ठान व सप्तक, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कालजयी’ या दोन दिवसीय शास्त्रीय संगीत महोत्सवाचे आयोजन केले होते. दोन्ही दिवस कलावंतांच्या सादरीकरणाने श्रोते अक्षरश: चिंब झाले. गायिका सावनी शेंडे यांनी राग पुरिया धनश्रीने आज सुरूवात केली. त्यांनी विलंबित एकतालात निबद्ध बंदिश ‘केसर रंग श्याम छाई’ सादर करून सभागृहातील वातावरण भारावून टाकले. तबल्यावर संदेश पोपटकर, संवादिनीवर श्रीकांत पिसे आणि तानपु-यावर वैष्णवी भालेराव तसेच वल्लरी मांडवगणे यांनी त्यांना साथ दिली. कलापिनी कोमकली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला.

बनारस घराण्याचे युवा शास्त्रीय गायक बंधू डॉ. प्रभाकर व डॉ. दिवाकर कश्यप यांचे गायन झाले. राग गोरख कल्याण मध्ये निबद्ध विलंबित एकतालातील रचना ‘कैसे धीर धरू नाथ तुमरे बिन’ आणि त्यानंतर मध्य लय तीन तालातील बंदिश ‘कजरारे कारे’ सादर केली. संवादिनीवर श्रीकांत पिसे, तबल्यावर रामेंद्र सिंग सोलंकी, तानपु-यावर भरत बिदुवा व शुभम ठाकूर यांनी उत्तम साथ दिली. भुवनेश कोमकली यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवाचा समारोप जयपूर-अतरौली घराण्याच्या प्रसिद्ध शास्त्रीय गायिका श्रुती सडोलीकर यांच्या गायनाने झाला. त्यांच्या गायकीलाही रसिकांनी भरभरून दाद दिली.

कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार, पं. सतीश व्यास, डॉ. साधना शिलेदार, निवृत्त न्या. विकास सिरपूरकर यांच्यासह संगीत क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन रेणुका देशकर यांनी केले. महोत्सवाला यशस्वी करण्याकरीता श्रीकांत देशपांडे, नितीन सहस्त्रबुद्धे, प्रदीप मुन्शी, रवी डोंगरे, अॅड. गौरव बेलसरे, डॉ. उदय गुप्ते, विलास मानेकर, उदय पाटणकर यांनी परिश्रम घेतले.

कुमारजींच्या सांगीतिक योगदानावर चर्चा‘कालजयी’ अंतर्गत रविवारी सकाळी सायंटिफिक सभागृहात 'कुमारजींच्या सांगीतिक योगदान’ विषयावर चर्चासत्र पार पडले. यात डॉ. साधना नाफडे, पं. सतीश व्यास व केशव चैतन्य कुंटे यांनी सहभाग नोंदवला. स्वतःची गायकी समृद्ध करतानाच पं. कुमार गंधर्व यांनी संगीताच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न केला, असे डॉ. साधना शिलेदार म्हणाल्या. ग्वाल्हेर घराण्याचे असूनसुद्धा कुमारजींनी स्वतःची स्वतंत्र शैली तयार केली होती. गाण्यातील टोन्स, रागांचे प्रोफाइल, स्वरांची घनता, वेगवेगळ्या व्हॉल्युम्स याचा त्यांनी शोध घेतला आणि अभ्यास केला. लोकसंगीताला शास्त्रीय संगीताशी जोडून त्यांनी ११ रागांची निर्मिती केली. लोकसंगीताची धून यातून रागनिर्मितीची प्रेरणा मिळाल्याने ते धून-उगम राग म्हणवले गेले, असेही त्या म्हणाल्या.

पं. सतीश व्यास यांनी कुमार गंधर्व हे असामान्य प्रतिभेचे धनी असल्याचे म्हटले. त्यांची शिस्त, तत्व, प्रेमळ स्वभाव, लोकांमध्ये केवळ चांगले तेच बघण्याचा त्यांचा गुण त्यांना असामान्य बनविणारा ठरला. केशव चैतन्य कुंटे यांनी 'हे मोहना कान्हा' ही मराठी बंदीश ऐकवून कुमारजींनी निर्माण केलेले राग आणि त्यामागचा विचार यावर प्रकाश टाकला. कुमार गंधर्व यांच्या देहबोलीतून गाण्याबद्दलचा त्यांचा विचार व्यक्त व्हायचा, असेही ते म्हणाले. यावेळी चैतन्य कुंटे, पद्मश्री उमाकांत गुंदेचा, भुवनेश कोमकली, कलापिनी कोमकली आदी उपस्थित होते.

टॅग्स :musicसंगीतnagpurनागपूर