शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 05:44 IST

भारत सरकारच्या अचानक संमतीवर प्रश्न; पाकिस्तानचे कंबरडे मोडले, लढाई सुरूच ठेवली तर पाकिस्तानचा पराभव होता अटळ

रवींद्र भजनी, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर : भारताने युद्धबंदी मान्य केली. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या सोशल मीडियावर ही घोषणा केली. असे का? हा प्रश्न प्रत्येक भारतीयाच्या मनात आहे. पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री इशाक डार यांनी याचे उत्तर दिले. त्यांनी एका टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, तीन डझन देश यासाठी सक्रिय होते. त्यांच्या या प्रयत्नांमुळेच युद्धबंदी शक्य झाली.

अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांच्या प्रयत्नांचा विशेष उल्लेख करून डार यांनी सर्वांचे आभार मानले. सुरक्षातज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भारताच्या हल्ल्यांमुळे पाकिस्तानचे कंबरडे मोडले होते. भारत चर्चेला तयार नव्हता, मग पाकिस्तानला इतर देशांकडे विनवणी करावी लागली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट केली. तोपर्यंत भारताने यावर सहमती दर्शविली नव्हती. ट्रम्प यांच्या पोस्टमुळेच १७ दिवसांपासून सुरू असलेला तणाव परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी यांच्या ६० सेकंदांच्या पत्रकार परिषदेने निवळला.

सिंधू पाणी करारासह इतर कठोर निर्णय भारताने घेतल्याने काहीतरी मोठे घडणार असे वाटत होते. ६ मे रोजी रात्री भारताने ऑपरेशन सिंदूर केले. पाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी अड्यांवर हवाई दलाच्या विमानांनी क्षेपणास्त्र हल्ले केले. देश आणि जगाला स्पष्ट संदेश देण्यात आला आहे की, आम्ही बदला घेतला.

ना पंतप्रधान बोलले ना संरक्षणमंत्री

पाकिस्तानवरील हल्ल्यांनंतर त्याचे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना त्यासाठी जबाबदार धरले जात होते. अनेक कमांडरनी एकप्रकारे त्यांच्याविरुद्ध बंड केले होते. तेव्हा बाजू सावरण्यासाठी उपपंतप्रधान आणि अन्य नेते टीव्हीवर समोर आले. ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी कर्नल सोफिया कुरैशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंह यांना पाठवण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी मीडियासमोर येऊन माहिती दिली नाही.

व्हान्स यांनी मानले आभार

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे. डी. व्हान्स यांनी या युद्धबंदीबद्दल समाधान व्यक्त करून भारत व पाकिस्तानच्या नेत्यांचे आभार मानले. परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी या कामी केलेले प्रयत्न फळाला आल्याचे सांगून व्हान्स यांनी रुबियो यांच्या कामगिरीचे कौतुक केले.

युद्धबंदीसाठी काय हालचाली ?

ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली दोन्ही देशांतील तणावावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू झाल्यावर शनिवारी दिवसभर वेगाने हालचाली सुरू झाल्या. अमेरिकी परराष्ट्रमंत्री मार्को रुबियो यांनी अगोदर पाकिस्तानचे लष्करप्रमुख असिम मुनीर यांच्याशी चर्चा केली. तिकडून सकारात्मक संकेत मिळताच त्यांनी भारतीय परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा केली.

पाकिस्तानी लष्करप्रमुखांचे धाडस अंगलट

भारताविरुद्ध निराधार विधाने करणारे लष्करप्रमुख असीम मुनीर यांना पडद्यामागे ठेवण्यात आले. पंतप्रधान शहाबाज शरीफ ते इतर नेत्यांनी किमान तीन डझन देशांसमोर विनवणी केली.

भारताचा मास्टर स्ट्रोक

भारताने सर्वप्रथम राजनैतिक आणि इतर संबंध समाप्त केले. त्यानंतर सीमा न ओलांडता क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांनी अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त केले.

वेळ दुपारी ३.३५ची, आला फोन अन्

शनिवारी दुपारी ३ वाजून ३५ मिनिटांनी भारतीय डीजीएमओंचा फोन खणाणला आणि युद्धावरील तोडग्यासाठी मार्ग निघाला. पाकिस्तानी डीजीएमओंचा हा फोन होता. युद्धबंदीचा प्रस्ताव येताच भारतानेही प्रतिसाद दिला.

 

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरCeasefire Violationशस्त्रसंधी उल्लंघनIndia vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाsurgical strikeसर्जिकल स्ट्राइक