शहरं
Join us  
Trending Stories
1
'पूर्वी देशात दोन संविधान होते, एकानं देश चालायचा अन् दुसऱ्यानं...', PM मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला
2
What a Ball! भुवनेश्वर कुमारने ५ चेंडूंत निकाल लावला, संजू सॅमसनचा त्रिफळा उडवला, Video 
3
विशाल पाटील यांच्यावर खरेच कारवाई होणार का? नाना पटोलेंची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले...
4
ट्रॅव्हिस हेडची बॅट हवेत असूनही अम्पायरने नाबाद दिले, कुमार संगकारा भडकला; पुढच्याच चेंडूवर... 
5
सांगलीतील चुरशीच्या लढतीने प्रचार सभांचा धुराळा,  शेवटचे दोन दिवस दिग्गज नेत्यांची प्रचारात उडी
6
“तुम्हाला महाराष्ट्राचा हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही”; शरद पवारांची PM मोदींवर टीका
7
'काँग्रेसचा अजेंडा; पण तुम्ही ना कलम 370, ना CAA...', पीएम मोदींचे काँग्रेसला ओपन चॅलेंज
8
नितीश कुमार रेड्डीने SRH ची लाज वाचवली, ट्रॅव्हिस हेडची बॅट थंड राहिली; RR ची चांगली कामगिरी
9
“PM मोदी नेहमी फोन करून प्रकृतीबाबत उद्धव ठाकरेंची विचारपूस करायचे”: देवेंद्र फडणवीस
10
India's T20 World Cup Squad Press Conference - ...अभी मैं बोलकर क्या करूंगा! रोहितने घेतली फिरकी, विराटच्या स्ट्राईक रेटवर भारी रिॲक्शन 
11
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
12
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
13
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे
14
“...तर अशी वेळ येईल की देवेंद्र फडणवीसांना कुणी साधा नमस्कारही करणार नाही”: रवींद्र धंगेकर
15
India's T20 World Cup Squad Press Conference - रिंकू सिंग अन् शुबमन गिल यांचा काय गुन्हा? अजित आगरकर म्हणाला, दोघांबद्दल वाईट वाटतंय पण..
16
पाकिस्तानात पावसामुळे भिजलेले गव्हाचे पीक सुकविण्यासाठी वापरली लष्कराची हेलिकॉप्टर्स? जाणून घ्या दाव्यामागील सत्य
17
Amit Shah : "भारत जोडो यात्रेचा समारोप 4 जूनला काँग्रेस 'ढूंढो' यात्रेने होईल"; अमित शाह यांचा घणाघात
18
ब्रिजभूषण यांचा पत्ता कट; BJP ने त्यांच्या मुलाला दिले तिकीट, रायबरेलीचाही उमेदवार जाहीर
19
रस्त्यावर पाणीच पाणी, वीजपुरवठाही खंडित… मुसळधार पाऊस, वादळी वाऱ्याचा UAEला तडाखा!
20
Champions Trophy 2025 मध्ये भारतीय संघाचे सर्व सामने 'लाहोर'मध्ये; PCB ने ICC ला सोपवला ड्राफ्ट

पहुर विकास आघाडी  म्हणते, मनं काय जोडता; नदी जोडा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 15, 2017 9:53 PM

सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला.

ठळक मुद्देउपोषणाचे सहावे वर्ष : न्याय कधी मिळणार?

गणेश खवसे ऑनलाईन लोकमतनागपूर : सध्या ‘मन की बात’वर जोरदार चर्चा केली जाते. त्याद्वारे काय साध्य होणार, त्याचे फलित काय, हा प्रश्नच आहे. खरंच ‘मन की बात’ केल्याने मनं जुळतात काय, मनं जोडण्याऐवजी नदी जोडा, शेतकऱ्यांचे आशीर्वाद मिळतील, ही आशा आहे जामनेर (जि. जळगाव) येथील पहुर विकास आघाडीला. नदी जोड प्रकल्पासाठी या आघाडीतर्फे सातत्याने धरणे आंदोलन, उपोषण केले जात आहे. हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा ही समिती न्याय्य हक्कासाठी मैदानात उतरली आहे. या संघटनेचे आंदोलनाचे हे सहावे वर्ष आहे, हे विशेष!तापी ते वाघूर नदी जोड प्रकल्प राबविण्यात यावा, या मागणीसाठी सुकलाल बारी यांच्या नेतृत्वात गेल्या सहा वर्षांपासून आंदोलन करण्यात येत आहे. जळगाव जिल्ह्यातील जामनेर, पाचोरा, बोदवड, सोयगाव ही चारही तालुके कमी पर्जन्यमान क्षेत्रात येतात. त्यामुळे या तालुक्यांमध्ये सतत दुष्काळसदृश स्थिती असते. या तालुक्यांमध्ये पाण्याची पातळी ७०० फुटांपर्यंत खालावलेली असून भविष्यात पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार आहे.पिण्यासाठीच पाणी मिळणार नाही तिथे सिंचनासाठी तरी मिळणार काय, हा बिकट प्रश्न आहे. यामुळे यातून वाचण्यासाठी ‘नदी जोड’ प्रकल्प राबविणे आवश्यक आहे. मुक्ताईनगरपासून आलेल्या तापी नदीतील पाणी कांग नदीत आणि वाघूर नदीत पाटाद्वारे टाकावे. त्यामुळे वाघूर नदीत पाणी येऊन भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. विहिरी, तलावांमध्ये पाणी राहील. पिण्यासाठी पाणी उपलब्ध होऊन सिंचनासाठी त्याचा मोठा हातभार लागून शेतकरी संपन्न होईल. ही बाब पटवून देण्यासाठी धरणे आंदोलन, साखळी उपोषण, आमरण उपोषण असे आंदोलनाचे अस्त्र वापरून वाघूर विकास आघाडीने शासनाचे लक्ष वेधले. परंतु त्याचा काहीएक फायदा झालेला नाही. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या जिल्ह्यातील आणि त्यांच्याच मतदारसंघात चक्क पाणी मिळण्यासाठी अशाप्रकारचे आंदोलन करावे लागत आहे, हे विशेष! हिवाळी अधिवेशनानिमित्त पुन्हा एकदा वाघूर विकास आघाडीतर्फे धरणे आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यात सुकलाल बारी यांच्यासह भाऊराव गोंदनखेडे, रमेश पाटील, गजानन पाटील, अशोक जाधव, रामचंद्र पाटील, रवींद्र पांढरे, सुनील सोनार, भागवत पाटील, डॉ. मनोहर पाटील आदी सहभागी झाले आहेत.वैयक्तिक नव्हे जनहिताची मागणी!हिवाळी अधिवेशनानिमित्त धरणे - आंदोलन, उपोषण मंडपांनी पटवर्धन मैदान व्यापले आहे. धरणे आंदोलन करणाºया संघटना हा विशेषत: वैयक्तिक, स्वत:च्या मागण्यासाठी किंवा समाजाच्या, एका विशेष वर्गाच्या मागण्यांसाठी मैदानात उतरल्या आहेत. मात्र वाघूर विकास आघाडीतर्फे वैयक्तिक नव्हे तर जनहिताच्या मागणीसाठी साखळी उपोषण केले जात आहे. नदी जोड प्रकल्प राबविल्यास उपोषणकर्त्यांना त्याचा फायदा होणार असून त्यांच्या तालुक्यातील, जिल्ह्यातील नागरिकांना हितकारक ठरेल, हे विशेष! याच मागणीसाठी गेल्या सहा वर्षांपासून प्रत्येक हिवाळी अधिवेशनात धरणे आंदोलन, उपोषण करण्यात येत आहे. २०१२ मध्ये आमरण उपोषणाचा मार्गही सुकलाल बारी यांनी पत्करला. दरम्यान त्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन तीन दिवस रुग्णालयात तर एक दिवस पोलीस ठाण्यातही ठेवले. परंतु त्यानंतरही त्यांनी आंदोलनाचा मार्ग जनहितासाठी सोडला नाही. नदी जोड प्रकल्प राबवित नाही, तोपर्यंत स्वस्थ बसणार नाही, असा इशाराही त्यांनी यानिमित्ताने दिला.

टॅग्स :riverनदीNagpur Winter Sessionनागपूर हिवाळी अधिवेशन