शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

दीडपट हमीभाव ही दिशाभूल : अनिल देशमुख

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 20:46 IST

केंद्र सरकारच्यावतीने नुकतीच शेतीमालाची आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली. यात उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा या आधारावर ही आधारभूत किंमत जाहीर केल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या उत्पादन खर्चावरून आधारभूत किंमत देण्यात आली आहे तो उत्पादन खर्च कमी दाखवून आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

ठळक मुद्देकृषी मूल्य आयोगाच्या शिफारशी स्वीकारल्या नाहीत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : केंद्र सरकारच्यावतीने नुकतीच शेतीमालाची आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली. यात उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा या आधारावर ही आधारभूत किंमत जाहीर केल्याचा दावा केंद्र सरकारने केलेला आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र ज्या उत्पादन खर्चावरून आधारभूत किंमत देण्यात आली आहे तो उत्पादन खर्च कमी दाखवून आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली असल्याचा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.२०१४ मध्ये लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकीच्या दरम्यान भाजपाच्या नेत्यांनी शेतमालास उत्पादन खर्च व त्यावर ५० टक्के नफा या आधारावर आधारभूत किंमत देऊ असे आश्वासन दिले होते. चार वषार्पासून विरोधक तथा शेतकरी भाजपाच्या नेत्यांना वारंवार आधारभूत किमतीबाबत त्यांनी दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देत होते. परंतु यावर त्यांनी कोणताही निर्णय घेतला नाही. आता २०१९ ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून त्यांनी परत शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देण्याचे काम सुरू केले असल्याचा आरोप सुद्धा अनिल देशमुख यांनी केला आहे.केंद्र सरकारने कापसाचा प्रति क्विंटल उत्पादन खर्च हा ३४३३ रुपये दाखविला आहे. परंतु प्रत्यक्षात साधारणत: ५८०० रुपये प्रति क्विंटल उत्पादन खर्च येतो. यात केवळ वेचणीचा खर्चच हा १० रुपये प्रति किलो आहे. राज्यातील कृषी मूल्य आयोगाने केंद्राला कापसाचा भाव हा ७२७२ रुपये देण्याची शिफारस ही केंद्र सरकारला केली होती. दुसरीकडे सोयाबीनला ४७४९ रुपये आधाभूत किंमत देण्याची मागणी ही कृषी मूल्य आयोगाने केंद्राकडे केली होती. सोयाबीन उत्पादनाचा खर्च हा २२६६ रुपये येत असल्याचे केंद्र सरकारने म्हटले आहे. परंतु प्रत्यक्षात साधरणता ३५०० रुपये खर्च प्रति क्विंटल येत आहे. धानाच्या बाबतीही हीच परिस्थिती आहे. कृषी मूल्य आयोगाने केंद्राकडे ३२७० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली होती. परंतु केंद्र सरकारने ११६६ रुपये उत्पादन खर्च येतो असे सांगून १७५० रुपये हमीभाव जाहीर केला. कृषी मूल्य आयोगाने ज्या आधारभूत किमतीची मागणी केंद्र सरकारकडे केली होती त्यात ५० टक्के नफा हा गृहितच धरण्यात आला नव्हता. तरीसुध्दा राज्य सरकार केंद्राने जाहीर केलेला हमीभाव चांगला असल्याचे सांगत आहे. केंद्रसरकार आश्वासन दिल्याप्रमाणे दीडपट हमीभाव दिल्याचे सांगत असले तरी नेहमीप्रमणे भाजपा सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पानेपुसल्याचा आरोप सुध्दा अनिल देशमुख यांनी केला आहे.

 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखFarmerशेतकरी