शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

महारॅलीसाठी काँग्रेस नेत्यांची ‘वज्रमूठ’; युवक काँग्रेसची शहरात बाइक रॅली, नेत्यांनी केली सभास्थळाची

By जितेंद्र ढवळे | Updated: December 26, 2023 23:09 IST

पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

नागपूर : काँग्रेसच्या स्थापना दिनानिमित्त २८ डिसेंबर रोजी नागपुरात ‘है तयार हम’ ही महारॅली होत आहे. बहादुरा येथील ‘भारत जोडो मैदाना’वर होणाऱ्या या रॅलीच्या दमदार आयोजनासाठी काँग्रेस नेत्यांनी ताकद लावली आहे. मंगळवारी युवक काँग्रेसने बाइक रॅली काढून महारॅलीसाठी शहरात जागर केला. दरम्यान, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, यांच्यासह पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी सभास्थळाची पाहणी करीत आवश्यक त्या सूचना दिल्या.

तत्पूर्वी राधिकाताई पांडव अभियांत्रिकी महाविद्यालयात काँग्रेस नेत्यांची बैठक झाली. तीत विविध समित्या जाहीर करीत सभेच्या आयोजनासंदर्भात जबाबदाऱ्या निश्चित करण्यात आल्या. उपरोक्त वरिष्ठ नेत्यांसह माजी मंत्री विलास मुत्तेमवार, सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे, काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र मुळक, आ. राजू पारवे, गिरीश पांडव यांच्यासह विदर्भातील प्रमुख नेते उपस्थित होते.

‘भारत जोडो बाइक’ रॅलीने लक्ष वेधले२८ डिसेंबर रोजी होणाऱ्या महारॅलीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी यांच्यासह काँग्रेस कार्यसमितीचे प्रमुख नेते सहभागी होणार आहेत. या पार्श्वभूमीवर युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी शहरात ‘भारत जोडो’ बाइक रॅली काढण्यात आली. तीत युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष कुणाल राऊत, प्रदेश प्रभारी उदयभानू चिब, राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके, राष्ट्रीय सचिव अजित सिंह, एहसान खान, आतिशा पैठनकर, शिवराज मोरे, श्रीनिवासन नालंवार, मिथिलेश कन्हेरे, तौसीफ खान, आसिफ शेख यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

संघभूमीतून भाजपला उत्तर देणार : चव्हाणकेंद्रातील भाजप सरकार बेरोजगारी, महागाई तसेच शेतकरी आत्महत्या रोखण्यात अपयशी ठरले आहे. संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरातून काँग्रेस भाजपला चोख उत्तर देणार असल्याचे काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी सांगितले.

सत्ता परिवर्तनाचा बिगुल फुंकणार : वडेट्टीवारविजय वडेट्टीवार यांनीही सभास्थळी दाखल होत तयारीचा आढावा घेतला. विदर्भातील जनतेने काँग्रेसला नेहमीच साथ दिली आहे. महारॅलीच्या माध्यमातून काँग्रेस देशात सत्ता परिवर्तनाचा बिगुल फुंकणार असल्याचे वडेट्टीवार म्हणाले.

‘वंचित’साठीही तयारमहारॅलीपूर्वी ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. ‘वंचित’ला इंडिया आघाडीत सहभागी करून घेण्याबाबत अशोक चव्हाण यांनीही सकारात्मकता दर्शविली. यासंदर्भात दिल्ली येथे दि. २९ रोजी होणाऱ्या बैठकीत चर्चा होणार असल्याची माहिती विजय वडेट्टीवार यांनी दिली.

विविध समित्यांची स्थापनामहारॅलीच्या यशस्वीतेसाठी काँग्रेसने विविध समित्यांची स्थापना केली. यात ७५ सदस्यांच्या आयोजन समितीचाही समावेश आहे. यात राष्ट्रीय महासचिव मुकुल वासनिक, अविनाश पांडे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, विरोध पक्षनेते विजय वडट्टीवार, आजी-माजी खासदार आणि आमदारांचा समावेश आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसnagpurनागपूर