शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेला धक्का देण्याच्या नादात नाशिकमध्ये भाजपत राडा; पक्षप्रवेशावरून तीन तास हाय व्होल्टेज ड्रामा
2
मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांना देखील मेरी ख्रिसमस; नायजेरियात ISIS वर बॉम्ब हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २६ डिसेंबर २०२५: आनंद व उत्साहाचे वातावरण; कामात यश मिळेल!
4
गरिबीमुळे आई-वडिलांचा गळफास; तर दोन तरुण मुलांची रेल्वेखाली आत्महत्या; हृदय पिळवटून टाकणारी नांदेड जिल्ह्यातील घटना
5
पवार ‘पाॅवर’ एकत्र? आघाडीची घोषणा लांबणीवर, अद्याप अंतिम प्रस्तावच नाही 
6
कुख्यात गणेश उईकेसह  ६ नक्षलवाद्यांचा खात्मा; मृतांमध्ये दोन महिला; ओडिशात कारवाई
7
हजारो प्रवासी बनले ऐतिहासिक क्षणांचे साक्षीदार; विमानतळावर उत्साह, कुतूहल; नवी मुंबईच्या अवकाशात विमानाची पहिली झेप 
8
जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
9
नातेवाईकांसाठी दिग्गजांची ‘लॉबिंग’; मुंबईच्या रिंगणात कोणाचे नशीब उजळणार?
10
ठाकरे बंधूंची युती महाविकास आघाडीकरिता नाकापेक्षा मोती जड? वाटाघाटीत तणाव : शरद पवार गटाचा काँग्रेसवर कमी जागा स्वीकारण्याचा दबाव
11
कुणाला देवदर्शन, कुणाला फार्म हाऊसवर पार्ट्या, भेटवस्तू, सहली
12
दोन्ही राष्ट्रवादींचा ठाण्यातही ‘हम साथ साथ है...’चा नारा? नजीब मुल्ला म्हणतात, आव्हाड शत्रू नाहीत..!
13
भाजप माेठा पक्ष, त्यांनी जास्त जागा घेतल्या तर हरकत नाही : सरनाईक
14
दस्ताचा नोंदणी क्रमांक द्या, अन्‌ मिळवा बँकेकडून कर्ज
15
श्रीलंकेविरूद्ध टी-२० मालिका विजयासाठी भारत सज्ज; खराब फॉर्मशी झुंजणाऱ्या श्रीलंकेविरुद्ध आज तिसरा टी-२० सामना
16
आता प्रतिष्ठा जपण्याचे इंग्लंड संघापुढे आव्हान...
17
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
18
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
19
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
20
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
Daily Top 2Weekly Top 5

अबब! शेतकऱ्याची विहीर गेली चोरी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2018 01:19 IST

आदल्या दिवशीच ‘ती’ विहीर शेतात होती. शेतातील गोठा जाळल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ‘त्या’ विहिरीत डोकावून बघितले. अशातच दुसऱ्याच दिवशी सकाळपासून विहीर अचानक गायब झाल्याने शेतकरी हतबल झाला. अखेरीस पोलीस ठाणे गाठून त्या शेतकऱ्याने ‘विहीरच चोरीला गेली’ अशी आधी तोंडी आणि नंतर लेखी तक्रार करीत पोलिसांकडे दाद मागितली.

ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील प्रकाराने प्रशासन हादरलेरस्ता अडवला, गोठा जाळल्याचीही तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आदल्या दिवशीच ‘ती’ विहीर शेतात होती. शेतातील गोठा जाळल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दिल्यानंतर पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनीही ‘त्या’ विहिरीत डोकावून बघितले. अशातच दुसऱ्याच दिवशी सकाळपासून विहीर अचानक गायब झाल्याने शेतकरी हतबल झाला. अखेरीस पोलीस ठाणे गाठून त्या शेतकऱ्याने ‘विहीरच चोरीला गेली’ अशी आधी तोंडी आणि नंतर लेखी तक्रार करीत पोलिसांकडे दाद मागितली. विहीर चोरीला गेल्याच्या या अफलातून तक्रारीमुळे पोलीस प्रशासन तसेच प्रशासकीय यंत्रणेच्या भुवया उंचावल्या आहे. विहीर चोरी कशी काय जाऊ शकते, असा सवालही उपस्थित केला जात आहे.उमरेडच्या इतवारी पेठ अभ्यंकर चौक येथील गुलाब परसराम लाडेकर या शेतकऱ्याने आपली कैफियत शनिवारी (दि. ५) पत्रकार परिषदेत मांडली. गुलाब यांची बेलगाव शिवारात केवळ दोन एकर वडिलोपार्जित शेती आहे. त्यांचा लहान भाऊ गणेश याने आपल्या मालकीची शेतजमीन विक्रीचा करारनामा एका बिल्डरशी केला. गुलाबचीही शेतजमीन लागूनच असल्याने बिल्डरने गुलाबकडे त्याच्या दोन एकर शेतीचाही सौदा करण्यासाठी विचारणा केली. गुलाबने स्पष्ट शब्दात नकार दिल्यानंतरही वारंवार दबावतत्रांचा वापर करण्याचा प्रकार करण्यात आला, असा आरोप गुलाब लाडेकर याने केला. बिल्डरच्या कुरापतींमुळे मी आणि माझे संपूर्ण कुटुंब दहशतीत असल्याचेही शेतकºयाने यावेळी सांगितले.जेसीबीने शेतातील पीक नेस्तनाबूत करणे, बळजबरीने कुंपण टाकणे, शेतकरी आणि त्याच्या पत्नीस धक्काबुक्की करणे, वडिलोपार्जित वहिवाटीचा मार्ग बंद करणे आणि त्यानंतर शेतातील गोठा जाळणे या संपूर्ण घटनाक्रमामुळे आम्ही कमालीचे हतबल झालो आहे. या संपूर्ण प्रकाराची पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली. वारंवार तक्रारीनंतरही पोलिसांनी प्रकरण गुलदस्त्यातच ठेवले. मानसिक, आर्थिक आणि शारिरीक त्रासामुळे हतबल झालेल्या शेतकऱ्याने अखेरीस आमदार बच्चू कडू यांच्याकडे निवेदन दिले. स्थानिक प्रहार संघटनेने दखल घेत पत्रकार परिषदेच्या माध्यमातून या प्रकरणाला वाचा फोडली. पोलीस तक्रारीनंतर शेतात कसेतरी पोलीस शेतापर्यंत पोहोचले. त्यांनीही ही विहीर बघितली. मात्र त्यानंतर बिल्डरने ती विहीरच अक्षरश: बुजविली. परिणामी विहीर चोरीचीही तक्रार करण्यात आली.आंदोलनाचा इशारासदर अल्पभूधारक शेतकऱ्यांने ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकापासून ते थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत निवेदन देत न्याय मिळविण्यासाठी कंबर कसली आहे. या संपूर्ण घडामोडींमुळे प्रशासन हादरले असून विहीर गेली कुणीकडे, याचा शोध घेणेही सुरू झाले आहे. याप्रकरणी पत्रकारांनी प्रकाश हाके यांच्याशी संपर्क साधला असता, ‘कुणाचीही हयगय केली जाणार नाही. जे निष्पन्न होईल, त्यानुसार गुन्हा दाखल होईल’, असा शब्द दिला.आणि ती रडली!पत्रकार परिषदेत गुलाबची पत्नी आपल्या दोन चिमुकल्यांसह हजर होती. मागील अनेक दिवसांपासून भीतीपोटी शेतात पाय ठेवला नाही, असे ती म्हणाली. काही दिवसांपूर्वीच शेतात गेल्यावर मुलांनीही ‘आई, आपली विहीर कुठे गेली?’, असा प्रश्न केला. त्या विहिरीच्याच भरोशावर आमची शेती होती. केवळ दोन एकरात आम्ही कशीबशी आपली उपजीविका करतो. विहीरच नसल्याने आता आम्ही जगायचे कसे असा प्रश्न उपस्थित करीत ती पत्रकार परिषदेत ढसाढसा रडायला लागली.अन्यथा प्रहार रस्त्यावरया प्रकरणात गुलाब लाडेकर आणि त्याच्या कुटुंबीयांना १५ दिवसात न्याय मिळाला नाही, तर प्रहार संघटना रस्त्यावर उतरेल, असा इशारा प्रहारचे संदीप कांबळे, राजेंद्र रणदिवे, पंकज राऊत, निखिल नवनागे, प्रमोद रोहणकर, किशोर मराठे, सुभाष साखरकर, शुभम चिमूरकर, नितीन अवचट, संजय अतकरी, रामेश्वर शेंदरे आदींनी दिला. यानंतर त्या शेतकऱ्यांला तसेच त्यांच्या कुटुंबीयांना कोणताही त्रास होऊ नये, याची काळजीही प्रहार घेणार असल्याचे स्पष्ट केले. यावेळी उमरेड - भिवापूर आणि कुही तालुक्यातील प्रहारचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :theftचोरीFarmerशेतकरी