शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विदर्भातील अध्ययन अक्षमता केंद्राला सरकारी खोडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2018 11:19 IST

डिस्लेक्सियाग्रस्ताना त्यांच्या जिल्ह्यातच आजाराचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, परंतु दोन वर्ष होत असतानाही विदर्भात एकाही ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही.

ठळक मुद्देउच्च न्यायालयाच्या आदेशालाच खोप्रमाणपत्रासाठी डिस्लेक्सियाग्रस्तांची मुंबईवारी सुरूच

सुमेध वाघमारे।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डिस्लेक्सियाग्रस्ताना त्यांच्या जिल्ह्यातच आजाराचे प्रमाणपत्र मिळावे यासाठी प्रत्येक जिल्ह्यात ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले, परंतु दोन वर्ष होत असतानाही विदर्भात एकाही ठिकाणी हे केंद्र सुरू झाले नाही. विशेष म्हणजे, हे केंद्र सुरू करण्यासाठी आवश्यक मनुष्यबळाच्या पदनिर्मिती झालीच नसल्याने हे केंद्र खोळंबले आहे. परिणामी, प्रमाणपत्रासाठी रुग्णांना पुणे किंवा मुंबई गाठावी लागत आहे.‘डिस्लेक्सियाग्रस्त’ व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. आमीर खान यांच्या ‘तारे जमीनपर’ या चित्रपटातून या विकाराची माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचली. ‘डिस्लेक्शिया’ या अवस्थेत मेंदूचा डावा भाग पुरेसे काम करत नाही किंवा त्या भागातील संदेश उजव्या भागाकडे वहन करून नेणारे मज्जातंतू पुरेसे कार्यक्षम नसतात. यामुळे ही बाधा झालेल्या व्यक्तीला अक्षर ओळख करण्यात अडचण येते. सामान्य माणसाला पटकन समजणारी आणि त्याच्या सहजपणे लक्षात राहणारी अक्षरे त्याला वेडीवाकडी दिसतात, नाचत आहेत असे वाटतात. त्यातला फरक त्यांना ओळखू येत नाही. शब्दांची रचना त्याच्या लक्षात रहात नाही. त्यामुळे काहीही लिहिताना वेगवेगळ्या असंख्य चुका करतात.सर्वसामान्य शिक्षणपद्धतीत तो अक्षरओळखीमध्येच अडकून पडतो. हा विकार वेळीच ओळखता आल्यास व त्याला विशेष तज्ज्ञाकडून प्रशिक्षण दिल्यास या विकारांची मुले आपल्या असामान्य बुद्धिमत्तेचे धनी होऊ शकतात. या आजाराच्या रुग्णांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विविध शासकीय योजना आहेत. परंतु याचा फायदा पुणे, मुंबईच्याच रुग्णांना मिळत आहे. कारण या ठिकाणच्या इस्पितळातच ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू आहे. येथेच रुग्णांची चार ते पाच वेळा तपासणी करून हा आजार असल्याचे प्रमाणपत्र दिले जाते. याला घेऊन २०१५ मध्ये एक जनहित याचिका दाखल करण्यात आली.१ फेब्रुवारी २०१६ मध्ये यावर उच्च न्यायालयाने निर्णय देत सर्व जिल्ह्यांमध्ये हे केंद्र सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार नागपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) मानसोपचार विभागात हे केंद्र सुरू करण्याचे प्रयत्न झाले. परंतु या केंद्रासाठी लागणाऱ्या स्वतंत्र मानसोपचारतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ आणि विशेष शिक्षक (स्पेशल एज्युकेटर) असे तीन पदांची निर्मितीच झाली नसल्याने हे केंद्र आजही रखडलेलेच आहे.

सुरू झालेले केंद्र पडले बंदमिळालेल्या माहितीनुसार, मेडिकलमध्ये आॅक्टोबर-२०१६ मध्ये ‘अध्ययन अक्षमता केंद्र’ सुरू झाले. सुरुवातीला २५ विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर विद्यार्थ्यांच्या नेमक्या चुका माहिती करून घेण्यासाठी मानसोपचारतज्ज्ञ, मानसतज्ज्ञ व विशेष शिक्षकाचे पदच भरण्यात आले नाहीत. यामुळे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया खोळंबली आहे. मेडिकल प्रशासनाने या दोन्ही पदांचा प्रस्ताव पाठविला आहे. परंतु अद्यापही मंजुरी मिळाली नाही. यामुळे प्रमाणपत्रासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुणे, मुंबईचा रस्ता दाखविला जात आहे.

प्रमाणपत्र असल्यास असे मिळतात लाभ

  • ‘डिस्लेक्सियाग्रस्ता’चे प्रमाणपत्र असल्यास विद्यार्थ्यांना परीक्षेत जास्त वेळ दिला जातो.
  • शाळेत विशेष शिक्षक दिले जातात.
  • अभ्यासक्रमात जे विषय खूपच कठीण वाटतात, त्या विषयाची सूट दिली जाते.
  • अशा मुलांच्या आई-वडिलांना करातून सूट मिळते.
  • नोकरी बदलीचे नियमही शिथिल होतात.
टॅग्स :Healthआरोग्यGovernmentसरकार