शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 10:29 IST

Nagpur News व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे.

ठळक मुद्देव्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी आशेचा किरण मध्य भारतात पहिल्यांदाच नागपुरात दुसऱ्या टप्प्यातील चाचणी

सुमेध वाघमारे

नागपूर : व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील यशापयशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य भारतात पहिल्यांदाच २०० जणांवर ही चाचणी नागपुरात होणार आहे. मात्र सध्या तरी कोरोनाचे गंभीर रुग्ण नाहीत. संभाव्य तिसरी लाट आल्यावरच ही चाचणी होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक पेशीमध्ये स्वविभाजनाचा, पुन्हा वाढ होण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. पेशींचे विभाजन करून शरीराचे कार्य सुरू ठेवण्यासाठी लागणारी क्षमता या पेशींमध्ये असते. यादृष्टीने आता ‘स्टेम सेल्स’ (मूल पेशी) तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये संशोधन सुरू आहे. अंधत्व, बहिरेपणा, दातांचे विकार, मेंदूच्या व्याधी, अल्झायमर, सांधेदुखी, डायबेटिस अशा अनेक आजारांवर ही थेरपी मात करते, असा दावा काही जण करीत असले तरी या उपचार पद्धतीवर अद्यापही संशोधन सुरू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाच्या उपचारात ‘स्टेम सेल थेरपी’ चाचणीच्या पहिल्या टप्प्यात चांगले निकाल दिसून आल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.

- गंभीर रुग्ण पाच दिवसात बरे झाले

कोरोना उपचारावरील ‘स्टेम सेल थेरपी’च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे ‘प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर’ डॉ. निर्मल जयस्वाल यांनी सांगितले, अमेरिकेत या चाचणीचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. यात कोरोनाचे जे रुग्ण व्हेंटिलटरवर (एनआयव्ही) होते, ते रुग्ण पाच ते सहा दिवसात बरे झाल्याचे आढळून आले. यामुळे दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-दुसऱ्या टप्प्यासाठी ५० ऐवजी २००चा परवानगीचा प्रस्ताव

डॉ. जयस्वाल म्हणाले, भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) ‘स्टेम सेल थेरपी’च्या दुसऱ्या टप्प्यात ५० जणांवर मानवी चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. परंतु ही संख्या वाढवून २०० करण्याचा प्रस्ताव ‘डीसीजीआय’ला पाठविला आहे. मंजुरी मिळताच चाचणीला सुरुवात होईल. सध्या गंभीर लक्षणे असलेले रुग्ण फार कमी आढळून येत आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यावरच ही मानवी चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- अशी आहे थेरपी

कोरोनाचा विषाणू शरीरातील पेशी नष्ट करतो. ‘स्टेम सेल थेरपी’मध्ये इंजेक्शनच्या स्वरूपातून रुग्णाला अशा पेशी टोचल्या जातात, ज्यामुळे कोरोना विषाणू निकामी होतो. याची प्रक्रिया ‘अ‍ॅण्टिबॉडीज कॉकटेल’सारखीच आहे. परंतु त्याच्या तुलनेत चांगले निकाल दिसून आले आहेत, असेही डॉ. जयस्वाल म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस