शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोनाच्या गंभीर रुग्णांवर आता ‘स्टेम सेल थेरपी’!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 10:29 IST

Nagpur News व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे.

ठळक मुद्देव्हेंटिलेटरवरील रुग्णांसाठी आशेचा किरण मध्य भारतात पहिल्यांदाच नागपुरात दुसऱ्या टप्प्यातील चाचणी

सुमेध वाघमारे

नागपूर : व्हेंटिलेटरवर असलेल्या कोरोनाचा रुग्णांवर ‘स्टेम सेल थेरपी’ ही नवीन उपचार पद्धती उपयुक्त ठरत असल्याचे मानवी चाचणीच्या पहिल्या टप्प्यात दिसून आले आहे. यामुळे दुसऱ्या टप्प्यातील यशापयशाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मध्य भारतात पहिल्यांदाच २०० जणांवर ही चाचणी नागपुरात होणार आहे. मात्र सध्या तरी कोरोनाचे गंभीर रुग्ण नाहीत. संभाव्य तिसरी लाट आल्यावरच ही चाचणी होण्याची शक्यता आहे.

प्रत्येक पेशीमध्ये स्वविभाजनाचा, पुन्हा वाढ होण्याचा नैसर्गिक गुणधर्म असतो. पेशींचे विभाजन करून शरीराचे कार्य सुरू ठेवण्यासाठी लागणारी क्षमता या पेशींमध्ये असते. यादृष्टीने आता ‘स्टेम सेल्स’ (मूल पेशी) तंत्रज्ञानाच्या वापरामध्ये संशोधन सुरू आहे. अंधत्व, बहिरेपणा, दातांचे विकार, मेंदूच्या व्याधी, अल्झायमर, सांधेदुखी, डायबेटिस अशा अनेक आजारांवर ही थेरपी मात करते, असा दावा काही जण करीत असले तरी या उपचार पद्धतीवर अद्यापही संशोधन सुरू असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु कोरोनाच्या उपचारात ‘स्टेम सेल थेरपी’ चाचणीच्या पहिल्या टप्प्यात चांगले निकाल दिसून आल्याने अपेक्षा वाढल्या आहेत.

- गंभीर रुग्ण पाच दिवसात बरे झाले

कोरोना उपचारावरील ‘स्टेम सेल थेरपी’च्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणीचे ‘प्रिंसिपल इन्व्हेस्टीगेटर’ डॉ. निर्मल जयस्वाल यांनी सांगितले, अमेरिकेत या चाचणीचा पहिला टप्पा नुकताच पूर्ण झाला आहे. यात कोरोनाचे जे रुग्ण व्हेंटिलटरवर (एनआयव्ही) होते, ते रुग्ण पाच ते सहा दिवसात बरे झाल्याचे आढळून आले. यामुळे दुसऱ्या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

-दुसऱ्या टप्प्यासाठी ५० ऐवजी २००चा परवानगीचा प्रस्ताव

डॉ. जयस्वाल म्हणाले, भारतीय औषध महानियंत्रकने (डीसीजीआय) ‘स्टेम सेल थेरपी’च्या दुसऱ्या टप्प्यात ५० जणांवर मानवी चाचणीसाठी मंजुरी दिली आहे. परंतु ही संख्या वाढवून २०० करण्याचा प्रस्ताव ‘डीसीजीआय’ला पाठविला आहे. मंजुरी मिळताच चाचणीला सुरुवात होईल. सध्या गंभीर लक्षणे असलेले रुग्ण फार कमी आढळून येत आहेत. कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आल्यावरच ही मानवी चाचणी पूर्ण होण्याची शक्यता आहे.

- अशी आहे थेरपी

कोरोनाचा विषाणू शरीरातील पेशी नष्ट करतो. ‘स्टेम सेल थेरपी’मध्ये इंजेक्शनच्या स्वरूपातून रुग्णाला अशा पेशी टोचल्या जातात, ज्यामुळे कोरोना विषाणू निकामी होतो. याची प्रक्रिया ‘अ‍ॅण्टिबॉडीज कॉकटेल’सारखीच आहे. परंतु त्याच्या तुलनेत चांगले निकाल दिसून आले आहेत, असेही डॉ. जयस्वाल म्हणाले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस