शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
4
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
5
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
6
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
7
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
8
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
9
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
10
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
11
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
12
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
13
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
14
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
15
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
16
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
17
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
18
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
19
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
20
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:00 IST

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे.

मविआची आज नागपुरमध्ये वज्रमुठ सभा होत आहे. संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली होती. या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली तो सहा महिने परदेशात फरार झालेला, असे देशमुख म्हणाले. 

या सभेला मविआचे सर्व वरिष्ठ नेते हजर आहेत. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली त्याला कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. तो  न्यायालयात आलाच नाही. परदेशात सहा महिने फरार होता. परमबीर सिंगांना दबाव टाकून माझ्याविरोधात उभे करण्यात आले. वर्षभर मला आत टाकलेले. कोर्टात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा कोर्टाने त्यांची कागदपत्रे पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. कोर्टाने हे सर्व आरोप ऐकीव आहेत, असे सांगितले. मग ईडीने एक कोटी ७१ लाखांचा ठपका ठेवला, त्यावरही कोर्टाने पुरावे मागितले परंतू ते देखील दिले नाहीत, असा आरोप देशमुख यांनी केला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात येण्यापासून थोपवू शकणार नाही, असे आव्हान माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. आजच्या मविआच्या सभेला विरोध करण्याचा काहींनी प्रयत्न केला. संभाजीनगरची विराट सभा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यामुळे ते विरोध करत होते, असा आरोपही देशमुख यांनी केला. शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. पंचनामे झाले परंतू ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी सरकारकडून झालेली नाही. संत्रा मोसंबीचे सात आठ महिन्यांपूर्वी नुकसान झाले होते. रिपोर्ट जाऊनही आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विधानसभेत दीड महिन्यांपूर्वी फडणवीसांनी लवकरच देऊ असे सांगितले होते. परंतू आजवर मदत मिळालेली नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

कापसाचे भाव कर रद्द केल्याने पडले. निर्यात परदेशात केली गेली नाही, यामुळे देखील दर पडले. शेतकरी अडचणीत असताना बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले, परंतू परतफेड करू शकलेले नाही. त्यांच्या शेताचे लिलाव काढण्यात आले आहेत, यावर देखील सरकारने निर्णय घेतलेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर