शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:00 IST

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे.

मविआची आज नागपुरमध्ये वज्रमुठ सभा होत आहे. संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली होती. या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली तो सहा महिने परदेशात फरार झालेला, असे देशमुख म्हणाले. 

या सभेला मविआचे सर्व वरिष्ठ नेते हजर आहेत. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली त्याला कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. तो  न्यायालयात आलाच नाही. परदेशात सहा महिने फरार होता. परमबीर सिंगांना दबाव टाकून माझ्याविरोधात उभे करण्यात आले. वर्षभर मला आत टाकलेले. कोर्टात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा कोर्टाने त्यांची कागदपत्रे पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. कोर्टाने हे सर्व आरोप ऐकीव आहेत, असे सांगितले. मग ईडीने एक कोटी ७१ लाखांचा ठपका ठेवला, त्यावरही कोर्टाने पुरावे मागितले परंतू ते देखील दिले नाहीत, असा आरोप देशमुख यांनी केला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात येण्यापासून थोपवू शकणार नाही, असे आव्हान माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. आजच्या मविआच्या सभेला विरोध करण्याचा काहींनी प्रयत्न केला. संभाजीनगरची विराट सभा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यामुळे ते विरोध करत होते, असा आरोपही देशमुख यांनी केला. शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. पंचनामे झाले परंतू ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी सरकारकडून झालेली नाही. संत्रा मोसंबीचे सात आठ महिन्यांपूर्वी नुकसान झाले होते. रिपोर्ट जाऊनही आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विधानसभेत दीड महिन्यांपूर्वी फडणवीसांनी लवकरच देऊ असे सांगितले होते. परंतू आजवर मदत मिळालेली नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

कापसाचे भाव कर रद्द केल्याने पडले. निर्यात परदेशात केली गेली नाही, यामुळे देखील दर पडले. शेतकरी अडचणीत असताना बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले, परंतू परतफेड करू शकलेले नाही. त्यांच्या शेताचे लिलाव काढण्यात आले आहेत, यावर देखील सरकारने निर्णय घेतलेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर