शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
3
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
4
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
5
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
6
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
7
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
8
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
9
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
10
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
11
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
12
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
13
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
14
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
15
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
16
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
17
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
18
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
19
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
20
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई

आता मला कोणताही माइकालाल मैदानात रोखू शकणार नाही; अनिल देशमुखांचे ईडी कारवाईवरून आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 16, 2023 20:00 IST

Vajramuth Sabha in Nagpur: या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे.

मविआची आज नागपुरमध्ये वज्रमुठ सभा होत आहे. संभाजीनगरमध्ये पहिली सभा झाली होती. या सभेमध्ये ईडीच्या कारवाईतून दिलासा मिळालेले एनसीपीचे नेते आणि राज्याचे माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी ईडीवर शरसंधान साधले आहे. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली तो सहा महिने परदेशात फरार झालेला, असे देशमुख म्हणाले. 

या सभेला मविआचे सर्व वरिष्ठ नेते हजर आहेत. ईडीला काहीही पुरावे मिळलेले नाहीत. ज्या माणसाने माझ्याविरोधात तक्रार केलेली त्याला कोर्टाने हजर राहण्यास सांगितले होते. तो  न्यायालयात आलाच नाही. परदेशात सहा महिने फरार होता. परमबीर सिंगांना दबाव टाकून माझ्याविरोधात उभे करण्यात आले. वर्षभर मला आत टाकलेले. कोर्टात जेव्हा हे प्रकरण गेले तेव्हा कोर्टाने त्यांची कागदपत्रे पाहिली. त्यात काहीच सापडले नाही. कोर्टाने हे सर्व आरोप ऐकीव आहेत, असे सांगितले. मग ईडीने एक कोटी ७१ लाखांचा ठपका ठेवला, त्यावरही कोर्टाने पुरावे मागितले परंतू ते देखील दिले नाहीत, असा आरोप देशमुख यांनी केला. 

आता मला कोणताही माइकालाल मैदानात येण्यापासून थोपवू शकणार नाही, असे आव्हान माजी गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. आजच्या मविआच्या सभेला विरोध करण्याचा काहींनी प्रयत्न केला. संभाजीनगरची विराट सभा पाहून त्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती. यामुळे ते विरोध करत होते, असा आरोपही देशमुख यांनी केला. शेतकरी अडचणीत आहे. अवकाळी पाऊस झाला, गारपीट झाली. पंचनामे झाले परंतू ज्या पद्धतीने मदत व्हायला हवी तशी सरकारकडून झालेली नाही. संत्रा मोसंबीचे सात आठ महिन्यांपूर्वी नुकसान झाले होते. रिपोर्ट जाऊनही आतापर्यंत शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. विधानसभेत दीड महिन्यांपूर्वी फडणवीसांनी लवकरच देऊ असे सांगितले होते. परंतू आजवर मदत मिळालेली नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

कापसाचे भाव कर रद्द केल्याने पडले. निर्यात परदेशात केली गेली नाही, यामुळे देखील दर पडले. शेतकरी अडचणीत असताना बँकांच्या माध्यमातून कर्ज घेतलेले, परंतू परतफेड करू शकलेले नाही. त्यांच्या शेताचे लिलाव काढण्यात आले आहेत, यावर देखील सरकारने निर्णय घेतलेला नाही, असा आरोप देशमुख यांनी केला. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखNCPराष्ट्रवादी काँग्रेसShiv Senaशिवसेनाnagpurनागपूर